शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘खोगीर’ भरतीतून सभासदांच्या हातात काय?

By admin | Updated: October 13, 2015 00:26 IST

भोगावतीचे राजकारण : कारखान्याची आर्थिक प्रगती कशी साधणार

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती कारखान्याची नोकर भरती कोणाच्या हिताची आणि फायद्याची हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. नोकर भरतीतून सभासदांच्या हातात काय मिळणार आणि कारखान्याची आर्थिक प्रगती काय होणार, यावर प्रश्नचिन्ह असून यात काही जणांचे हात ओले होणार हे मात्र निश्चित.भोगावती कारखान्याकडे सध्या ६५० कर्मचारी आहेत. संचालकांनी सिव्हीलच्या नावावर काही जागा भरल्या आहेत. त्या वाढल्यास कामगाराची संख्या सातशेच्या वर जाते. सध्या साडेसहाशे कामगारांना १ कोटी ८० लाख पगाराची एकूण रक्क्म द्यावी लागते. यात कामगार भरती केल्यास भोगावती कारखान्याच्या कामगारांची पगाराची रक्कम दोन कोटीच्या वर जाते. राज्यात सार्वाधिक पगाराची रक्कम असणारा भोगावती हा एकवेम कारखाना आहे, इतर चार हजार गाळप क्षमतेचा कारखान्याच्या पगाराची रक्कम ४० लाखांच्या घरात आहे. कारखान्यात काही अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. पदावर संचालकांनी आपल्या नातेवाइकांची वर्णी लावली आहे. आता या जागा सोडून जादा जागांची ही मागणी काही संचालक करीत आहेत. त्यामुळे भरती झालीच तर पुन्हा नातेवाइकांची खोगीर भरती होणार हे निश्चित. निवडणुकीत खळ लावणारा कार्यकर्ता बाजूलाच राहणार आहे. कारखान्यात काँगे्रसची सत्ता असताना युवकांना रोजंदारीवर कामावर घेतले. त्यांना कायम करता आले नाही म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सदर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दोनवेळा आंदोलन केले ;पण त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. नोकर भरतीवरून अशोकराव पाटील आणि विश्वास वरूटे यांनी दिलेला राजीनामा यातून संचालक मंडळ आणि शे. का. पक्षातील अंतर्गत धुसफुस दिसून येत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असे अशोक पाटील यांनी म्हंटले आहे. मुळात उपाध्यक्ष हे केरबाभाऊ पाटील हे शे. का. पक्षाचे आहेत. त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अशोक पाटील यांनी फायद्यासाठी विश्वास वरूटे यांचे नाव पुढे आणून माजी आमदार संपतराव पाटील यांनाचा आवाहन दिले होते. आता मध्यंतरीच्या काळात दोघांच्यात फारसे सख्य काय जमलेले नाही. सामान्य ऊस उत्पादक सभासद मात्र शांत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मात्र तो आपली पत्ते खोलून दाखवील यात शंक नाही. नोकर भरतीच्या एवढ्या गंभीर प्रश्नाबाबात या पॅनेलचे नेते माजी. आ . के. पी. पाटील, संपतराव पाटील, अरूण सोनाळकर, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांचे अद्याप मौन आहे. शे. का. पक्षाची अशी अवस्था असताना राष्ट्रवादी देखिल फारसे आलबेल नाही, या भरतीला जरा दमान घ्यावे, असे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आ. हसन मुश्रीफ यांची सूचना असताना काही संचलकांना नोकर भरती व्हावी, अशी भावना आहे. यात कारखान्याचा विचार किती हे मात्र गुलदस्त्यात आहे.