शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

‘खोगीर’ भरतीतून सभासदांच्या हातात काय?

By admin | Updated: October 13, 2015 00:26 IST

भोगावतीचे राजकारण : कारखान्याची आर्थिक प्रगती कशी साधणार

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती कारखान्याची नोकर भरती कोणाच्या हिताची आणि फायद्याची हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. नोकर भरतीतून सभासदांच्या हातात काय मिळणार आणि कारखान्याची आर्थिक प्रगती काय होणार, यावर प्रश्नचिन्ह असून यात काही जणांचे हात ओले होणार हे मात्र निश्चित.भोगावती कारखान्याकडे सध्या ६५० कर्मचारी आहेत. संचालकांनी सिव्हीलच्या नावावर काही जागा भरल्या आहेत. त्या वाढल्यास कामगाराची संख्या सातशेच्या वर जाते. सध्या साडेसहाशे कामगारांना १ कोटी ८० लाख पगाराची एकूण रक्क्म द्यावी लागते. यात कामगार भरती केल्यास भोगावती कारखान्याच्या कामगारांची पगाराची रक्कम दोन कोटीच्या वर जाते. राज्यात सार्वाधिक पगाराची रक्कम असणारा भोगावती हा एकवेम कारखाना आहे, इतर चार हजार गाळप क्षमतेचा कारखान्याच्या पगाराची रक्कम ४० लाखांच्या घरात आहे. कारखान्यात काही अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. पदावर संचालकांनी आपल्या नातेवाइकांची वर्णी लावली आहे. आता या जागा सोडून जादा जागांची ही मागणी काही संचालक करीत आहेत. त्यामुळे भरती झालीच तर पुन्हा नातेवाइकांची खोगीर भरती होणार हे निश्चित. निवडणुकीत खळ लावणारा कार्यकर्ता बाजूलाच राहणार आहे. कारखान्यात काँगे्रसची सत्ता असताना युवकांना रोजंदारीवर कामावर घेतले. त्यांना कायम करता आले नाही म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सदर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दोनवेळा आंदोलन केले ;पण त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. नोकर भरतीवरून अशोकराव पाटील आणि विश्वास वरूटे यांनी दिलेला राजीनामा यातून संचालक मंडळ आणि शे. का. पक्षातील अंतर्गत धुसफुस दिसून येत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असे अशोक पाटील यांनी म्हंटले आहे. मुळात उपाध्यक्ष हे केरबाभाऊ पाटील हे शे. का. पक्षाचे आहेत. त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अशोक पाटील यांनी फायद्यासाठी विश्वास वरूटे यांचे नाव पुढे आणून माजी आमदार संपतराव पाटील यांनाचा आवाहन दिले होते. आता मध्यंतरीच्या काळात दोघांच्यात फारसे सख्य काय जमलेले नाही. सामान्य ऊस उत्पादक सभासद मात्र शांत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मात्र तो आपली पत्ते खोलून दाखवील यात शंक नाही. नोकर भरतीच्या एवढ्या गंभीर प्रश्नाबाबात या पॅनेलचे नेते माजी. आ . के. पी. पाटील, संपतराव पाटील, अरूण सोनाळकर, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांचे अद्याप मौन आहे. शे. का. पक्षाची अशी अवस्था असताना राष्ट्रवादी देखिल फारसे आलबेल नाही, या भरतीला जरा दमान घ्यावे, असे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आ. हसन मुश्रीफ यांची सूचना असताना काही संचलकांना नोकर भरती व्हावी, अशी भावना आहे. यात कारखान्याचा विचार किती हे मात्र गुलदस्त्यात आहे.