शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

‘खोगीर’ भरतीतून सभासदांच्या हातात काय?

By admin | Updated: October 13, 2015 00:26 IST

भोगावतीचे राजकारण : कारखान्याची आर्थिक प्रगती कशी साधणार

भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती कारखान्याची नोकर भरती कोणाच्या हिताची आणि फायद्याची हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. नोकर भरतीतून सभासदांच्या हातात काय मिळणार आणि कारखान्याची आर्थिक प्रगती काय होणार, यावर प्रश्नचिन्ह असून यात काही जणांचे हात ओले होणार हे मात्र निश्चित.भोगावती कारखान्याकडे सध्या ६५० कर्मचारी आहेत. संचालकांनी सिव्हीलच्या नावावर काही जागा भरल्या आहेत. त्या वाढल्यास कामगाराची संख्या सातशेच्या वर जाते. सध्या साडेसहाशे कामगारांना १ कोटी ८० लाख पगाराची एकूण रक्क्म द्यावी लागते. यात कामगार भरती केल्यास भोगावती कारखान्याच्या कामगारांची पगाराची रक्कम दोन कोटीच्या वर जाते. राज्यात सार्वाधिक पगाराची रक्कम असणारा भोगावती हा एकवेम कारखाना आहे, इतर चार हजार गाळप क्षमतेचा कारखान्याच्या पगाराची रक्कम ४० लाखांच्या घरात आहे. कारखान्यात काही अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. पदावर संचालकांनी आपल्या नातेवाइकांची वर्णी लावली आहे. आता या जागा सोडून जादा जागांची ही मागणी काही संचालक करीत आहेत. त्यामुळे भरती झालीच तर पुन्हा नातेवाइकांची खोगीर भरती होणार हे निश्चित. निवडणुकीत खळ लावणारा कार्यकर्ता बाजूलाच राहणार आहे. कारखान्यात काँगे्रसची सत्ता असताना युवकांना रोजंदारीवर कामावर घेतले. त्यांना कायम करता आले नाही म्हणून त्या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सदर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दोनवेळा आंदोलन केले ;पण त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. नोकर भरतीवरून अशोकराव पाटील आणि विश्वास वरूटे यांनी दिलेला राजीनामा यातून संचालक मंडळ आणि शे. का. पक्षातील अंतर्गत धुसफुस दिसून येत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असे अशोक पाटील यांनी म्हंटले आहे. मुळात उपाध्यक्ष हे केरबाभाऊ पाटील हे शे. का. पक्षाचे आहेत. त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अशोक पाटील यांनी फायद्यासाठी विश्वास वरूटे यांचे नाव पुढे आणून माजी आमदार संपतराव पाटील यांनाचा आवाहन दिले होते. आता मध्यंतरीच्या काळात दोघांच्यात फारसे सख्य काय जमलेले नाही. सामान्य ऊस उत्पादक सभासद मात्र शांत आहे. येणाऱ्या निवडणुकीत मात्र तो आपली पत्ते खोलून दाखवील यात शंक नाही. नोकर भरतीच्या एवढ्या गंभीर प्रश्नाबाबात या पॅनेलचे नेते माजी. आ . के. पी. पाटील, संपतराव पाटील, अरूण सोनाळकर, जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांचे अद्याप मौन आहे. शे. का. पक्षाची अशी अवस्था असताना राष्ट्रवादी देखिल फारसे आलबेल नाही, या भरतीला जरा दमान घ्यावे, असे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आ. हसन मुश्रीफ यांची सूचना असताना काही संचलकांना नोकर भरती व्हावी, अशी भावना आहे. यात कारखान्याचा विचार किती हे मात्र गुलदस्त्यात आहे.