शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

मला काय होतंय ही वृत्ती जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:24 IST

पुण्यामुंबईसह बाहेरून येणाऱ्या नातेवाईकांना थेट घरात राहण्यासाठी घेणे धोकादायक आहे. अनेकांची घरे लहान असतात. एकत्रित कुटुंबे असतात. त्यांनी तर ...

पुण्यामुंबईसह बाहेरून येणाऱ्या नातेवाईकांना थेट घरात राहण्यासाठी घेणे धोकादायक आहे. अनेकांची घरे लहान असतात. एकत्रित कुटुंबे असतात. त्यांनी तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घर स्वच्छ ठेवले पाहिजे. वारंवार ज्यांना बाहेर जाण्यावाचून गत्यंतर नसेल अशांनी घरातील ज्येष्ठ, आजारी व्यक्ती, लहान मुले यांच्यापासून लांब रहावे. घरातही मास्क वापरला पाहिजे. अनेकजण एक मास्क काळाकुट्ट् होईपर्यंत वापरतात. तसे न करता तो प्रत्येक दिवशी बदलून धुतला पाहिजे.

रोजच्या जेवणात अंडी, मिळतील ती फळे, भाजीपाला याचा वापर केला पाहिजे. पातळ पदार्थ घेतले पाहिजेत. ताक, आंबील घेतली, लिंबू सरबत घेतले तरी चालेल. शक्य तितका व्यायाम केला पाहिजे. वाफ घेणे, गरम पाणी पिणे या काही गोष्टी सहज शक्य आहेत त्या केल्या पाहिजेत. मुळात या काळात कोणताही घरगुती, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित करू नये किंवा असे कोणी आयोजन केले असेल तर जाऊही नये.

रोज सकाळी आणि संध्याकाळी किमान दहा मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. चालताना जर श्वास घेणे जड जाऊ लागले तर आपल्या तब्येतीचा काही तरी प्रश्न आहे असे ओळखावे आणि गावातील डॉक्टर, आरोग्य उपकेंद्राशी संपर्क साधावा. एखादा नागरिक पॉझिटिव्ह आला म्हणजे फार मोठे काही होत नाही. परंतु काळजी घेण्याचे प्रमाण वाढवावे लागते. घरात जर त्याच्यासाठी स्वतंत्र खोली, जोडूनच शौचालय नसेल तर मग ग्रामसमिती किंवा डॉक्टरांशी बोलून रुग्णालयात किंवा जेथे घरापासून दूर स्वतंत्र राहता येईल अशा ठिकाणी रहावे. या दरम्यान दिलेली औषधे, ताकद देणारे जेवण आणि ‘मी यातून ठणठणीत होणार’ ही भावना मनात ठेवली तर रुग्ण आठ, दहा दिवसांत बरा होतोच. ज्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार किंवा अन्य व्याधी असतात त्यांच्यासाठी जरा जास्त जोखीम असते. या रुग्णांनी दिवसभरात प्रत्येक वेळी अर्धा तास असे पाच, सहा वेळा पालथे झोपावे. त्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन जादा घेतला जातो आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. कोरोना होऊ नये यासाठी दक्षता घेणे आपल्या हातात आहे. ती घेऊनही जर झालाच तर त्याला तितक्याच समर्थपणे सामोरे जा..

१९०४२०२१ कोल डॉ. योगेश साळे

(लेखक काेल्हापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत)