शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलाने पन्नास वर्षांनी राजकारण करायचे काय?

By admin | Updated: February 20, 2017 01:00 IST

सदाभाऊ खोत : राजू शेट्टी यांच्याबद्दल नेहमीच आदर

वारणानगर : खासदार राजू शेट्टी हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे. भाजपमुळे माझ्यात व खासदार राजू शेट्टी यांच्यात फूट पडेल असे जे बोलतात हे त्यांचे अज्ञान आहे. काळाच्या ओघात आमच्याबद्दलचा तो संभ्रम दूर होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच चळवळीत सक्रिय असलेल्या माझ्या मुलाने अजून पन्नास वर्षांनी निवडणूक लढवायची काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.वारणानगर येथे रविवारी जनसुराज्यचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वारणानगर येथे दुपारी विनय कोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेत सदाभाऊ यांनी बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेला सुपुत्र सागर खोत यांच्या मागे सांगली जिल्ह्यातील जनसुराज्यची ताकद लावावी, अशी विनंती विनय कोरे यांना केल्याचे कळते. मात्र, तपशीलाबाबत गोपनीयता पाळत खोत यांनी भाजप-स्वाभिमानी-जनसुराज्य सत्तेतील मित्रपक्ष असल्याने कोरे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले. खोत म्हणाले, खासदार राजू शेट्टी आमचे नेते असून, मी त्यांचा आदर करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची जाण आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून ‘स्वाभिमानी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडत आहे. सरकारही सकारात्मक आहे. त्यामुळे मी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेली अनेक वर्षे राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळीचे काम करीत आहे. माझा मुलगा सागर आता सव्वीस वर्षांचा आहे. मी आणखीन वीस-पंचवीस वर्षे राजकारण करीन. त्यानंतर म्हणजे ५० व्या वर्षी माझ्या मुलाने राजकारण करावे काय, असा सवाल त्यांनीकेला. माझ्यात व खासदार शेट्टी यांच्यात जे काही बोलले जात आहे ते काळाच्या ओघात दूर होईल. यापुढेही संघटनेशी एकनिष्ठ राहून चळवळीसाठी काम करण्याची ग्वाही खोत यांनी दिली. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश युवकाध्यक्ष सुमित कदम, विश्वासराव जाधव आदी उपस्थित होते. भाजप प्रवेशाबद्दल योग्य वेळी बोलेन : खोतसदाभाऊ खोत हा सुज्ञ आहे. तो संघर्षातूनच निर्माण झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघर्ष हा मला नवीन नाही. सध्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी बोलू, असे सदाभाऊ खोत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.सांगली जिल्ह्यातील ठिकठिकाणी मतदारसंघात भाजपसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप, स्वाभिमानी व मित्रपक्षाला चांगले दिवस आले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक जास्त जागा जिंकून सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजप, स्वाभिमानी, मित्रपक्षाची सत्ता येणार असल्याची ग्वाहीही मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.