शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

माझ्या मुलाने पन्नास वर्षांनी राजकारण करायचे काय?

By admin | Updated: February 20, 2017 01:00 IST

सदाभाऊ खोत : राजू शेट्टी यांच्याबद्दल नेहमीच आदर

वारणानगर : खासदार राजू शेट्टी हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे. भाजपमुळे माझ्यात व खासदार राजू शेट्टी यांच्यात फूट पडेल असे जे बोलतात हे त्यांचे अज्ञान आहे. काळाच्या ओघात आमच्याबद्दलचा तो संभ्रम दूर होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच चळवळीत सक्रिय असलेल्या माझ्या मुलाने अजून पन्नास वर्षांनी निवडणूक लढवायची काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.वारणानगर येथे रविवारी जनसुराज्यचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वारणानगर येथे दुपारी विनय कोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेत सदाभाऊ यांनी बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेला सुपुत्र सागर खोत यांच्या मागे सांगली जिल्ह्यातील जनसुराज्यची ताकद लावावी, अशी विनंती विनय कोरे यांना केल्याचे कळते. मात्र, तपशीलाबाबत गोपनीयता पाळत खोत यांनी भाजप-स्वाभिमानी-जनसुराज्य सत्तेतील मित्रपक्ष असल्याने कोरे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले. खोत म्हणाले, खासदार राजू शेट्टी आमचे नेते असून, मी त्यांचा आदर करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची जाण आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून ‘स्वाभिमानी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडत आहे. सरकारही सकारात्मक आहे. त्यामुळे मी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेली अनेक वर्षे राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळीचे काम करीत आहे. माझा मुलगा सागर आता सव्वीस वर्षांचा आहे. मी आणखीन वीस-पंचवीस वर्षे राजकारण करीन. त्यानंतर म्हणजे ५० व्या वर्षी माझ्या मुलाने राजकारण करावे काय, असा सवाल त्यांनीकेला. माझ्यात व खासदार शेट्टी यांच्यात जे काही बोलले जात आहे ते काळाच्या ओघात दूर होईल. यापुढेही संघटनेशी एकनिष्ठ राहून चळवळीसाठी काम करण्याची ग्वाही खोत यांनी दिली. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश युवकाध्यक्ष सुमित कदम, विश्वासराव जाधव आदी उपस्थित होते. भाजप प्रवेशाबद्दल योग्य वेळी बोलेन : खोतसदाभाऊ खोत हा सुज्ञ आहे. तो संघर्षातूनच निर्माण झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघर्ष हा मला नवीन नाही. सध्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी बोलू, असे सदाभाऊ खोत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.सांगली जिल्ह्यातील ठिकठिकाणी मतदारसंघात भाजपसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप, स्वाभिमानी व मित्रपक्षाला चांगले दिवस आले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक जास्त जागा जिंकून सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजप, स्वाभिमानी, मित्रपक्षाची सत्ता येणार असल्याची ग्वाहीही मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.