शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या मुलाने पन्नास वर्षांनी राजकारण करायचे काय?

By admin | Updated: February 20, 2017 01:00 IST

सदाभाऊ खोत : राजू शेट्टी यांच्याबद्दल नेहमीच आदर

वारणानगर : खासदार राजू शेट्टी हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे. भाजपमुळे माझ्यात व खासदार राजू शेट्टी यांच्यात फूट पडेल असे जे बोलतात हे त्यांचे अज्ञान आहे. काळाच्या ओघात आमच्याबद्दलचा तो संभ्रम दूर होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच चळवळीत सक्रिय असलेल्या माझ्या मुलाने अजून पन्नास वर्षांनी निवडणूक लढवायची काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला.वारणानगर येथे रविवारी जनसुराज्यचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वारणानगर येथे दुपारी विनय कोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेत सदाभाऊ यांनी बागणी (ता. वाळवा, जि. सांगली) जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेला सुपुत्र सागर खोत यांच्या मागे सांगली जिल्ह्यातील जनसुराज्यची ताकद लावावी, अशी विनंती विनय कोरे यांना केल्याचे कळते. मात्र, तपशीलाबाबत गोपनीयता पाळत खोत यांनी भाजप-स्वाभिमानी-जनसुराज्य सत्तेतील मित्रपक्ष असल्याने कोरे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले. खोत म्हणाले, खासदार राजू शेट्टी आमचे नेते असून, मी त्यांचा आदर करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांची जाण आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून ‘स्वाभिमानी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडत आहे. सरकारही सकारात्मक आहे. त्यामुळे मी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गेली अनेक वर्षे राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळीचे काम करीत आहे. माझा मुलगा सागर आता सव्वीस वर्षांचा आहे. मी आणखीन वीस-पंचवीस वर्षे राजकारण करीन. त्यानंतर म्हणजे ५० व्या वर्षी माझ्या मुलाने राजकारण करावे काय, असा सवाल त्यांनीकेला. माझ्यात व खासदार शेट्टी यांच्यात जे काही बोलले जात आहे ते काळाच्या ओघात दूर होईल. यापुढेही संघटनेशी एकनिष्ठ राहून चळवळीसाठी काम करण्याची ग्वाही खोत यांनी दिली. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश युवकाध्यक्ष सुमित कदम, विश्वासराव जाधव आदी उपस्थित होते. भाजप प्रवेशाबद्दल योग्य वेळी बोलेन : खोतसदाभाऊ खोत हा सुज्ञ आहे. तो संघर्षातूनच निर्माण झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे संघर्ष हा मला नवीन नाही. सध्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी बोलू, असे सदाभाऊ खोत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.सांगली जिल्ह्यातील ठिकठिकाणी मतदारसंघात भाजपसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जास्त फटका बसला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप, स्वाभिमानी व मित्रपक्षाला चांगले दिवस आले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक जास्त जागा जिंकून सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजप, स्वाभिमानी, मित्रपक्षाची सत्ता येणार असल्याची ग्वाहीही मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.