शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

आमच्या पोरांनी आयुष्यभर दगडचं फोडायची काय?

By admin | Updated: September 11, 2014 23:02 IST

जनार्दन पोवार यांचा सवाल : दगडावर रॉयल्टीतून सूट देण्याऐवजी आरक्षण देण्याची मागणी

प्रदीप शिंदे- कोल्हापूर -महाराष्ट्रात वडार समाजाची लोकसंख्या ५० लाख आहे. मात्र, वडार समाजाच्या मालकीच्या शंभर सुद्धा दगड-खाणी नाहीत, तर शासनाने दगडावर रॉयल्टी आकारणीपासून सूट देऊन काय साधले आहे? रॉयल्टी माफ करण्याचे जाहीर करून आमच्या पोरांनी आयुष्यभर काही दगड फोडायचे काय? शासनाला खरंच आमच्या समाजाचा उद्धार करायचा असेल, तर त्यांनी वडार समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र वडार समाज संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पोवार आज, गुरुवारी केली. ते म्हणाले, भारतीय संस्कृतीचा खरा रचनाकार व रक्षक असलेला आमचा समाज विकासापासून कोसो दूर असून आजही जगण्यासाठी धडपडत आहे. २१ व्या शतकातही समाज शासनासह इतर पुढारलेल्या घटकांपासून दुर्लक्षित राहिला असल्यामुळे भटकंती करण्याची वेळ आजही कायम आहे. उखळ, जाती, पाटे-वरवंटे यांचे मार्केट तसे मर्यादित कारण या वस्तू दगडाच्या असल्याने त्यांचे आयुष्य मोठे. फारतर टाके घालण्याचे काम दरवर्षी एकदाच. त्यासाठी पोट भरण्यासाठी पुन्हा भटकंती करावी लागते. रेल्वे, रस्ते, घरे यांसाठी दगडफोडी, तळी, विहिरी खोदणे एवढेच सामान्य दर्जाचे काम या समाजाला उरले आहे. पिढ्या दर पिढ्या कौशल्ये विस्मरणात गेली. एकेकाळी भव्य आणि कलात्मक लेणी, किल्ल, वास्तू, मंदिरे निर्माण करणारे वडार सामान्य मजूर बनले. दगडांच्या खाणी त्यांच्या हातून जात ठेकेदारांच्या हातात गेल्या आहेत. त्यामुळे समाजाकडे आता किती खाणी आहेत. अवघ्या महाराष्ट्रामध्ये १०० सुद्धा खाणी समाजाच्या मालकीच्या नाहीत, तर या रॉयल्टीतून सूट देण्याच्या निर्णयचा काय उपयोग होणार आहे, असा सवाल पोवार यांनी केला. ते म्हणाले, वडार समाजाला संविधानिक हक्कांपासून केवळ महाराष्ट्रातच अन्याय होत आहे. कर्नाटक व इतर राज्यांत या समाजाला अनुसूचित जाती-जमातीचा दर्जा मिळाला आहे. कालेकर, बापट, रेणके आयोगाने आपल्या शिफारशीत समाजाची स्थिती मांडली आहे, तरीही शासन ठोस निर्णय घेत नाही. वडार समाजाचे नैसर्गिक हक्क डावलले गेले आहेत. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे विविध अंधश्रद्धा आजही या समाजात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात आणि का पाहण्यास मिळू नयेत? जो समाज देवाच्या मूर्ती तयार करतो, तो अंधश्रद्धेच्या आहारी जाणारच. यासाठी समाजाची उन्नती होण्यासाठी समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. आरक्षण मिळाल्यास आमचा समाज शिक्षण घेईल, त्यांना नोकरी मिळेल, अन्य सुविधा मिळतील, त्यामुळे आमच्या समाजाची नक्कीच सुधारण होईल. आपल्या अस्तित्वाच्या शोधात असलेला आमचा समाज आपले पर्यायी अस्तित्व उभारण्याचा अयशस्वी का होईना प्रयत्न करीत आहे. मात्र, याला आरक्षणाची जोड मिळल्यास नक्कीच हा आमचा समाज प्रगती करेल, असा विश्वास पोवार यांनी व्यक्त केला. देशभर वडार समाजवडार समाज हा तसा देशभर पसरला असला, तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भाषा भेदांमुळे या समाजाला वेगवेगळी नावे मिळालेली दिसतात. उदा. महाराष्ट्रात ‘वडार’ म्हणत असले, तर कर्नाटकात त्यांनाच ‘वड्डर’ म्हणून ओळखले जाते. आंध्रात याच समाजाला ‘वड्डोल्लु वा ओड्डर’ असे म्हटले जाते, तर तमिळनाडूत ‘ओट्टन नायकन’ वा ‘ओड्डर’ म्हणून ओळखले जाते. गुजरात व उत्तरेतील इतर राज्यांत त्यांना ‘ओड’ अथवा ‘ओडिया’ म्हणून ओळखले जाते. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हाताने दगडफोडीचा व्यवसाय करत असलेल्या वडार समाजातील कुटुंबाना शासकीय आणि खासगी जमिनीवर २०० ब्रासपर्यंतच्या दगडावर स्वामित्व धन (रॉयल्टी) आकारणीपासून सूट देण्यास मान्यता देण्यात आली. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने वडार समाजाचे मत जाणून घेण्यासाठी पोवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समाजाला अनुसूचीत जातीत समावेश करण्याची मागणी पुढे केली.