शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गाळप झाले बिलाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:21 IST

निपाणी : निपाणी सीमाभाग हा उसाच्या शेतीसाठी अतिशय चांगला असल्याने अनेक साखर कारखाने येथील ऊसतोड करण्यासाठी आघाडीवर असतात. येथील ...

निपाणी : निपाणी सीमाभाग हा उसाच्या शेतीसाठी अतिशय चांगला असल्याने अनेक साखर कारखाने येथील ऊसतोड करण्यासाठी आघाडीवर असतात. येथील उसाचा उताराही नऊ ते साडेबाराच्या वर नेहमी पडत असतो. यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखान्यांची ऊसतोडीसाठी झुंबड उडालेली असते. यावर्षीही कारखान्यांनी गाळप केले आहे; मात्र ऊस बिल देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यातच पहिली उचलही जाहीर केली नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे कारखानदारांनी लवकरात लवकर ऊस बिले द्यावीत, अशी मागणी होत आहे.

यावर्षीच्या कोरोना महामारी, महापूर व वादळी वाऱ्याने ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी उताऱ्यातही घट झाली असून, ऊसतोड मजूर नसल्याने तोडणीलाही विलंब होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना या भागातील कारखाने मात्र शेतकऱ्यांना ऊस बिल देण्यात अजून विलंब करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी कारखानदारांनी उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत; पण सीमाभागातील कारखाने मात्र ऊस बिल जमा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. एवढेच नव्हे तर अजून पहिली उचलही कारखान्यांनी जाहीर केलेली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर जाहीर करून बिलेही अदा केली आहेत; पण सीमाभागातील कारखान्यानी मात्र पहिली उचलही जाहीर केलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पाठविणे व त्यानंतर बिलाची वाट पाहत बसणे एवढेच काम राहिले आहे.

प्रतिक्रिया-

दर किती द्यायचा याबाबत अजून निर्णय झालेला नाही, पण इतर कारखान्यांच्या तुलनेत योग्य दर देऊ. लवकर यावर निर्णय होईल.

चंद्रकांत कोठीवाले

अध्यक्ष हालशुगर

१९६६ च्या साखर कायदा कलम ३ नुसार ऊस तोडणीनंतर १४ दिवसांत बिल अदा करणे गरजेचे आहे. पण दीड महिना झाला तरी कारखानदार बिले अदा करीत नाहीत, हे चुकीचे आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब कारवाई करावी.

प्रा. सचिन खोत

स्वाभिमानी शेतकरी संघटना