शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

गाळप झाले बिलाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:21 IST

निपाणी : निपाणी सीमाभाग हा उसाच्या शेतीसाठी अतिशय चांगला असल्याने अनेक साखर कारखाने येथील ऊसतोड करण्यासाठी आघाडीवर असतात. येथील ...

निपाणी : निपाणी सीमाभाग हा उसाच्या शेतीसाठी अतिशय चांगला असल्याने अनेक साखर कारखाने येथील ऊसतोड करण्यासाठी आघाडीवर असतात. येथील उसाचा उताराही नऊ ते साडेबाराच्या वर नेहमी पडत असतो. यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखान्यांची ऊसतोडीसाठी झुंबड उडालेली असते. यावर्षीही कारखान्यांनी गाळप केले आहे; मात्र ऊस बिल देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यातच पहिली उचलही जाहीर केली नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे कारखानदारांनी लवकरात लवकर ऊस बिले द्यावीत, अशी मागणी होत आहे.

यावर्षीच्या कोरोना महामारी, महापूर व वादळी वाऱ्याने ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. यावर्षी उताऱ्यातही घट झाली असून, ऊसतोड मजूर नसल्याने तोडणीलाही विलंब होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना या भागातील कारखाने मात्र शेतकऱ्यांना ऊस बिल देण्यात अजून विलंब करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी कारखानदारांनी उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत; पण सीमाभागातील कारखाने मात्र ऊस बिल जमा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. एवढेच नव्हे तर अजून पहिली उचलही कारखान्यांनी जाहीर केलेली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर जाहीर करून बिलेही अदा केली आहेत; पण सीमाभागातील कारखान्यानी मात्र पहिली उचलही जाहीर केलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पाठविणे व त्यानंतर बिलाची वाट पाहत बसणे एवढेच काम राहिले आहे.

प्रतिक्रिया-

दर किती द्यायचा याबाबत अजून निर्णय झालेला नाही, पण इतर कारखान्यांच्या तुलनेत योग्य दर देऊ. लवकर यावर निर्णय होईल.

चंद्रकांत कोठीवाले

अध्यक्ष हालशुगर

१९६६ च्या साखर कायदा कलम ३ नुसार ऊस तोडणीनंतर १४ दिवसांत बिल अदा करणे गरजेचे आहे. पण दीड महिना झाला तरी कारखानदार बिले अदा करीत नाहीत, हे चुकीचे आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब कारवाई करावी.

प्रा. सचिन खोत

स्वाभिमानी शेतकरी संघटना