शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

मराठा आरक्षणासाठी पुन्हा जोमाने लढा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:25 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी पुन्हा जोमाने लढा उभारणार. रस्त्यावर उतरून तीव्र लढा देणार, अशा विविध प्रतिक्रिया बुधवारी कोल्हापुरातील ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी पुन्हा जोमाने लढा उभारणार. रस्त्यावर उतरून तीव्र लढा देणार, अशा विविध प्रतिक्रिया बुधवारी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातील समन्वयक, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. मराठा समाजातील राज्य, जिल्हा पातळीवरील समन्वयक, शिलेदारांसमवेत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्याची कार्यवाही त्यांनी सुरू केली.

सर्वांनी मराठा समाजाला पाठबळ द्यावे

मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचे मोठे दु:ख होत आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला सामोरे जाऊन चर्चा करावी. सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठबळ द्यावे. आरक्षणासाठीच्या या पुढील लढ्याची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी सकल मराठा समाजातील समन्वयकांशी चर्चा करण्यात येईल.

-वसंतराव मुळीक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ.

आता, ‘ओबीसी’तून आरक्षणाची मागणी

केंद्र, राज्य सरकार आणि राजकारण्यांनी मराठा समाजाचा घात केला आहे. न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. या व्यवस्थेने दिलेला निर्णय आम्ही मानतो. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा जोमाने लढा उभारला जाईल. तालुका, जिल्हा पातळीवर बैठका घेतल्या जातील. कोणत्याही राजकीय नेत्याच्या भडकाऊ भाषणाला बळी पडून समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य मराठा समाजातील बांधव-भगिनींनी करू नये.

-दिलीप देसाई, समन्वयक, सकल मराठा समाज दसरा चौक.

मराठा समाजाने शांतपणे भूमिका घ्यावी

आम्ही पहिल्यांदाच सांगितले होते की, मराठा समाजाचे हे आरक्षण टिकणार नाही. मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. आता यापुढे मराठा समाजाने शांतपणे आणि फायदा होणारी भूमिका घ्यावी. कोणत्या राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवू नये. राज्य सरकारने आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे शैक्षणिक, नोकरी आदी स्वरूपातील सर्व सवलती द्याव्यात. सारथी संस्थेला सक्षम करावे.

-इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक.

कायदेशीर पर्यायांचा विचार व्हावा

आरक्षण रद्द होणे हे मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षांनी एकमेकांना दोष देणे, आरोप करण्याऐवजी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत. या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करता येते का? हे तपासून पहावे. सरकारने कायदेशीर पर्यायांचा विचार करावा. आम्ही शौर्यपीठाच्या माध्यमातून मुंबईतील उच्च न्यायालयातील वकीलांसमवेत चर्चा करणार आहोत. आरक्षण मिळविण्यासाठी आम्ही पुन्हा तीव्र लढा देणार आहोत.

-प्रसाद जाधव, समन्वयक, शौर्यपीठ सकल मराठा समाज, शिवाजी चौक.

रस्त्यावर उतरून तीव्र लढा देणार

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले आहे. योग्य पद्धतीने म्हणणे सरकारने मांडले नाही. आज राजकारण जिंकले असून मराठा समाज हरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी समाज आता शांत बसणार नाही. रस्त्यावर उतरून तीव्र लढा दिला जाणार आहे.

-सचिन तोडकर, समन्वयक, सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा.

ओबीसीमध्ये समावेश करावा

मराठा आरक्षण रद्दचा निर्णय खूप दुर्दैवी आहे. अन्य राज्यांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडलेली चालते. मग, महाराष्ट्रात का चालत नाही? आता राज्य सरकारने लवकर ठोस पावले उचलून मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा समाजावर झालेला अन्याय दूर करावा.

-ऋतुराज माने, निमंत्रक, मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती.