शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही; आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:28 IST

विविध कारणांनी नैराश्य येऊन जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. २०१९ मध्ये सुमारे ५७० जणांनी आत्महत्या केल्या तर २०२० या ...

विविध कारणांनी नैराश्य येऊन जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. २०१९ मध्ये सुमारे ५७० जणांनी आत्महत्या केल्या तर २०२० या कोरोना संकटात अर्थचक्रच बंद पडल्याने अनेक उद्योगधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या, आर्थिक नुकसान झाले, जवळचे कोरोनाने गेले, माणसे व्यसनाधीन बनली, परिणामी माणसात प्रचंड नैराश्य येऊन स्वत:ला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. नकारात्मकता वाढल्याने अनेकांनी जगण्याची उमेद हरवली, त्यातून आत्महत्या केल्या. २०२० मध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले, वर्षभरात सुमारे ६१९ जणांनी आत्महत्या केल्या. आता २०२१ च्या सुरुवातीस अनेकजण सावरत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. हे संकट फक्त आपल्यावरच नाही, सारेच अडचणीत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली, त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत कोरोना संकटामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.

पॉईंटर...

- २०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या : ५७०

- २०२० मध्ये झालेल्या आत्महत्या : ६१९

- २०२१ जानेवारी ते मार्च : ११४

संकट माझ्या एकट्यावर नाही

कोरोना संकटात मी एकटा अडचणीत नाही तर सारेच अडचणीत आहेत अशी भावाना प्रत्येकात निर्माण झाली पाहिजे. वस्तुस्थितीची जाणीव करून सकारात्मक विचार करून मार्ग काढणे, नैराश्येत मानसोपचार तज्ज्ञ अगर समुपदेशकांकडून उपचार घेणे, कौटुंबीक संवाद, सकारात्मक छंद वाढविणे, अशामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी येऊ शकेल.

- डॉ. निखिल चौगले, मानसोपचार तज्ज्ञ

कोरोना संकटात १३ आत्महत्या

कोरोना संकटात अडचणीत आल्याने गेल्या वर्षभरात नैराश्येतून जिल्ह्यात तेरा जणांनी कोरोनाचे कारण देऊन आत्महत्या केल्या. इतरही आत्महत्या झाल्या, पण त्यासाठी ठोस कारण प्रशासनाच्या हाती लागले नाही.