शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

पाण्यासाठी शनिवार उजाडणार

By admin | Updated: August 19, 2016 00:36 IST

जलवाहिनी जोडली तरीही प्रतीक्षाच : टॅँकरसाठी नगरसेवकांत चढाओढ; वादावादीचे प्रसंग

कोल्हापूर : चंबुखडी परिसरात फुटलेली ११०० एम.एम. जाडीची मुख्य जलवाहिनी जोडण्यात पाणीपुरवठा विभागास गुरुवारी सायंकाळी यश आले खरे पण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास उद्या, शनिवार उजाडावा लागणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील निम्म्या भागास पाणीपुरवठा होत नसल्याने गुरुवारी पाण्याचे टॅँकर मिळविण्यात नगरसेवकांतच चढाओढ लागली. काहीवेळा वादाचे प्रसंग निर्माण झाल्याने कळंबा जलशुद्धिकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला. कोल्हापूर शहराच्या उपनगर आणि ई वॉर्ड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी मंगळवारी दुपारी चंबुखडी येथे फुटली. पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी असल्याने ती तातडीने दुरुस्त करण्यात आली; परंतु त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता त्याच ठिकाणापासून वीस फुटांवर पुन्हा जलवाहिनी फुटली. त्यामुळे चंबुखडी परिसरातील अनेक घरांतून पाणी शिरले. बुधवारी सकाळी वीस फूट अंतरातील जलवाहिनीचा फुटलेला भाग जेसीबीच्या सहायाने काढण्यात आला. त्यानंतर त्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. गेले दोन दिवस जलवाहिनीचे जोडकाम, वेल्डिंगचे काम सुरू असून, गुरुवारी दुपारी हे काम पूर्ण झाले. त्यानंतर जोडलेल्या भागात सिमेंट कॉँक्रीट टाकण्यात आले. कॉँक्रीट वाळण्यास काही तास जावे लागतात. आज, शुक्रवारी सकाळी हळूहळू पाणी उपसा सुरू केला जाणार आहे. त्यामुळे उद्या, शनिवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. गुरुवारी सायंकाळी महापौर अश्विनी रामाणे, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांनी जलवाहिनी दुरुस्तीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच कामाची माहिती करून घेतली. यावेळी महानगरपालिकेचे जलअभियंता मनीष पवार, शाखा अभियंता बी. जी. कुऱ्हाडे, कनिष्ठ अभियंता कुंभार उपस्थित होते. दरम्यान, शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेचे आठ, तर खासगी सोळा असे एकूण चोवीस टॅँकर वापरण्यात आले. कळंबा जलशुद्धिकरण केंद्रात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. या ठिकाणी महापौर अश्विनी रामाणे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दिवसभरात चोवीस टॅँकरच्या १०० हून अधिक फेऱ्या झाल्या होत्या. आज, शुक्रवारीसुद्धा उपनगर आणि ई वॉर्डातील पूर्वभागाला टॅँकरचाच आधार घ्यावा लागणार आहे. पोलिस बंदोबस्तकसबा बावडा व कळंबा जलशुद्धिकरण केंद्रातून टॅँकर वाटप होत होते; परंतु टॅँकरला जादा मागणी असल्याने अनेक नगरसेवक केंद्रावर थांबून होते. काही नगरसेवक तर टॅँकरमध्ये बसूनच होते. त्यामुळे वादावादी होत होती. त्यामुळे कळंबा जलशुद्धिकरण केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.