शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचे ऐनपावसाळ्यात पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. कळंबा, कसबा बावडा ...

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचे ऐनपावसाळ्यात पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. कळंबा, कसबा बावडा व शिवाजी विद्यापीठ, अशा तीन ठिकाणांहून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला, तर काही कार्यकर्त्यांनी थेट टँकरचाच ताबा घेतल्यामुळे पाणीपुरवठ्याचे तोकडे प्रयत्नही निष्फळ ठरले. त्यामुळे रविवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात टँकरचे प्रभागनिहाय वाटप सुरू केले.

पाणीपुरवठा बंद असल्यामुळे काही माजी नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या टँकरचाच ताबा घेऊन आपापल्या भागात पाणीवाटप सुरू केले. कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांना आपल्याच भागात येण्याची सक्ती केली. त्यामुळे काही मोजक्याच माजी नगरसेवकांना टँकर मिळत होते. सर्वसामान्य नागरिकांना मात्र पाणी मिळणे दुरापास्त झाले होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पोलीस बंदोबस्तात समान पाणी वाटप करण्याच्या सक्त सूचना दिल्या.

प्रशासक बलकवडे यांनी रविवारी दुपारपर्यंत कळंबा फिल्टर हाउस येथे ठिय्या मारला. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त विनायक औंधकर, उपरचनाकार नारायण भोसले, जलअभियंता अजित साळोखे यांच्याबरोबर बैठक घेऊन पाणी वाटपावर सूक्ष्म नियोजन करण्यावर भर दिला. फिल्टर हाउस परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणाही कार्यकर्त्याला आत सोडले जात नव्हते. केवळ टँकरच आत घेऊन त्यांना पाणी दिले जात होते.

टँकरचा क्रमांक, चालकाचे नाव, कोणत्या भागात पाणी दिले जात आहे, याच्या नोंदी करून घेतल्या जात होत्या. खासगी टँकरनासुद्धा पाणी भरून दिले जात होते. महापालिकेचे २९ टँकर सध्या शहरात पाणी वितरण करत आहेत, तर सोलापूर, सांगली व सातारा येथून भाड्याने घेतलेले ३० टँकर महामार्गावर पाणी आल्याने शिरोली येथे अडकले आहेत. आज, सोमवारपर्यंत सर्व टँकर पाणी वितरणाच्या कामास सहभागी होतील, असे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले.

भावी नगरसेवकांचा पुढाकार

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, माजी तसेच भावी नगरसेवक पाणीटंचाई ही संधी मानून मतदारांसमोर पाण्याचे टँकर घेऊन जात आहेत. अनेक प्रभागांत माजी, तसेच भावी नगरसेवकांनी चार ते पाच हजार रुपये भाड्याने टँकर घेऊन आपली बॅनर्स त्यावर लावली आहेत. काही का असेना; पण त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा भार काहीसा हलका होत आहे.