शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात तहान भागण्याइतपत जिल्ह्यात पाणीसाठा

By admin | Updated: February 27, 2015 23:24 IST

पंच्याहत्तर टक्के साठा शिल्लक : गतवर्षीपेक्षा पाच टक्के जादा; पाणी जपून वापरण्याचे ‘पाटबंधारे’चे आवाहन

प्रकाश पाटील- कोपार्डे -फेब्रुवारी महिना संपता संपताच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याच्या शक्यता शासकीय पातळीवर वर्तविण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्हा मात्र सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण असणार आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांतील व जलाशयातील पाणीसाठा समाधानकारक असून, मागील वर्षी याच कालावधीत असणाऱ्या पाणीसाठ्यापेक्षा तो पाच टक्क्यांनी जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात सध्या जवळपास ७५ टक्के पाणीसाठा आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा हे कोल्हापूर पाटबंधारे विभागांतर्गत येणारे मोठे चार प्रकल्प आहेत. तर कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्री, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा हे आठ मध्यम प्रकल्प आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रकल्पामध्ये ७१ टक्के सरासरी पाणीसाठा आज शिल्लक असून याच दिवशी मागील वर्षी तो ६६ टक्के होता. तर मध्यम प्रकल्पामध्ये तो आजच्या दिवशी ७५ टक्के असून मागील वर्षी याच दिवशी तो ७० टक्के होता. सरासरी पाहता मोठ्या व मध्यम प्रकल्पामध्ये मागील वर्षापेक्षा पाच टक्के पाणीसाठा आजच्या घडीला जादा आहे. पाणीसाठा समाधानकारक असला तरी विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिबक पद्धतीचा वापर करून पाटपद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीला फाटा द्यावा व पाणी बचत करावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. प्रकल्प आजचा पाणीसाठाटक्केवारीमागील वर्षी याच टक्केवारी (द. ल. घ. मीटरमध्ये)दिवशीचा पाणीसाठा राधानगरी१४५.८७६६ %१७३.८७७९ %तुळशी६४.४५७० %५७६२ %वारणा ५९४.७१७६ %५४१६९ %दूधगंगा४४५.७२६६%३८८.८०५७ %एकूण१२५०.७५७१ %११६१.०५६६ %