शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

चौपदरीकरणातील त्रुटीमुळे शेतात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क किणी : किणी (ता. हातकणंगले) येथे महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक तीन दिवस ठप्प झाली होती. नदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

किणी : किणी (ता. हातकणंगले) येथे महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक तीन दिवस ठप्प झाली होती. नदी अथवा ओढा जवळपास नसतानाही केवळ चौपदरीकरणातील त्रुटींमुळे शेतामध्ये साचून राहणारे पावसाचे पाणी टोलनाक्याजवळ महामार्गावर आल्याने वाहनधारकांना फटका बसला.

कागल ते सातारा चौपदरीकरण राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले. मात्र, सुरुवातीपासून विविध कारणांनी असुविधांचा मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख बनली आहे. त्यापैकी पाणी निर्गती ही एक प्रमुख समस्या आहे. चौपदरीकरण करतेवेळी नैसर्गिक ओघळी, नाले बुजविण्यात आले, मात्र पाणी निर्गतीसाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने गेली अनेक वर्षे किणी टोल नाक्याजवळील शेतामध्ये पावसाळ्यात पाणी साचून राहत आहे. यामुळे शेती नापीक होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे तर शेतकऱ्यांना मोटरच्या साह्याने पाणी बाहेर काढावे लागते. याबाबत अनेक वर्षे शेतकरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडे व देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या कंपनीकडे निवेदन देऊन तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांची कोणतीही दखल घेतली गेली नाही. मात्र, २०१९ साली महामार्गावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. मात्र, यावर्षी जवळपास नदी किंवा ओढा नसतानाही किणी टोल नाक्यावर महामार्गाच्या दोन्ही बाजूला जवळपास तीन ते चार फूट पाणी साचून महापुरासारखी परिस्थिती निर्माण होऊन तब्बल दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही महापुरांवेळी महामार्गावर पाणी आल्याने पाणी निर्गतीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा किणी टोल नाक्यावरील पाण्यामुळे प्रत्येक वर्षी वाहतूक ठप्प होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

चौकट .. चौपदरीकरणानंतर नैसर्गिक ओघळी, नाले बुजल्यामुळे टोल नाक्याजवळील शेतीमध्ये अनेक वर्षे पाणी साचून राहते. मात्र, आता महामार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होत असल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने याची दखल घेणे गरजेचे आहे.

.

चौपदरीकरणानंतर महामार्गालगतच्या शेतामध्ये पावसाळ्यात गेली पंधरा-सोळा वर्षे पाणी साचून शेती नापीक बनली असून, याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र, आजअखेर याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले आहे. पाणी निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी अशोक दणाणे (किणी) यांनी केली आहे.

.

पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्याजवळील शेतामध्ये पावसाचे पाणी साचून महामार्गावर आल्याने बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली होती.

पावसाचे शेतामध्ये साचणारे पाणी महामार्गावर आल्याने किणी टोलनाक्यावर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.