शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

आजऱ्यातील ७ गावे व १३ वाफ्यांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST

आजरा : आजरा तालुक्यातील ७ गावे व १३ वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कोरोनाची महामारी त्यातच पाणीटंचाई ...

आजरा :

आजरा तालुक्यातील ७ गावे व १३ वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कोरोनाची महामारी त्यातच पाणीटंचाई यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पंचायत समितीच्या वतीने एप्रिल ते जूनअखेरच्या सादर केलेल्या पाणीटंचाई आराखड्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.

तालुक्यातील बहिरेवाडी, मुमेवाडी, पेंढारवाडी, मलिग्रे, किणे, चितळे, सोहाळे ही गावे गेली अनेक वर्षे तहानलेलीच आहेत.

सकाळी उठल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या गावातील नागरिकांना वणवण फिरावे लागते. पारपोलीपैकी गावठाण, दाभिलपैकी दाभिलवाडी, सुळेरानपैकी माऊली हायस्कूल वसाहत, वाटंगीपैकी शाहू वसाहत, खानापूर पैकी रायवाडा, उचंगी पैकी हुडे, गवसे पैकी वास्करवाडी, चाफवडेपैकी आदर्श वसाहत, या वाड्यांना नवीन विंधन विहिरीचा प्रस्ताव आहे. तर वाटंगी मोरेवाडीपैकी धनगरवाडा येथे विहीर व विंधन विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहे.

विंधन विहीर काढणे, विहीर अधिग्रहण करणे, नवीन पाणीपुरवठा योजना राबविणे यासाठी २१ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. पाणी टंचाईमधून जि.प.कडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही. तालुक्यात पावसाळ्यात दररोज १५० मि.मी. पाऊस पडतो. पण उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या भीषण टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

--------------------------

* कोरोनाबरोबर पाणीटंचाईची समस्या

तालुक्यातील ७ गावे व १३ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. गावात असणारा कोरोना व पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. पाणी आणण्यासाठीच्या ढकल गाड्यातून ८ घागरी ठेवून पाणी आणले जात आहे. सकाळची वेळ पाण्यासाठीच जात असल्याने शेतीच्या मशागतीच्या कामावर याचा परिणाम होत आहे.

--------------------

* बहिरेवाडीचा ३ कोटी ४० लाखांचा प्रस्ताव

मंत्रालयात

बहिरेवाडी गाव गेले अनेक वर्षापासून तहानलेले आहे. गावाला नदी नाही. ओढा आहे पण फेब्रुवारीतच पाणी संपते. तलाव आहे पण मार्चपासून यातील साठविलेले पाणी हिरवे होते. नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागतात. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ३ कोटी ४० लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यांच्याच प्रयत्नाने या पाणी योजनेला मंजुरी मिळून गावकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.