शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

आजऱ्यातील ७ गावे व १३ वाफ्यांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST

आजरा : आजरा तालुक्यातील ७ गावे व १३ वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कोरोनाची महामारी त्यातच पाणीटंचाई ...

आजरा :

आजरा तालुक्यातील ७ गावे व १३ वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. कोरोनाची महामारी त्यातच पाणीटंचाई यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पंचायत समितीच्या वतीने एप्रिल ते जूनअखेरच्या सादर केलेल्या पाणीटंचाई आराखड्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.

तालुक्यातील बहिरेवाडी, मुमेवाडी, पेंढारवाडी, मलिग्रे, किणे, चितळे, सोहाळे ही गावे गेली अनेक वर्षे तहानलेलीच आहेत.

सकाळी उठल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या गावातील नागरिकांना वणवण फिरावे लागते. पारपोलीपैकी गावठाण, दाभिलपैकी दाभिलवाडी, सुळेरानपैकी माऊली हायस्कूल वसाहत, वाटंगीपैकी शाहू वसाहत, खानापूर पैकी रायवाडा, उचंगी पैकी हुडे, गवसे पैकी वास्करवाडी, चाफवडेपैकी आदर्श वसाहत, या वाड्यांना नवीन विंधन विहिरीचा प्रस्ताव आहे. तर वाटंगी मोरेवाडीपैकी धनगरवाडा येथे विहीर व विंधन विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहे.

विंधन विहीर काढणे, विहीर अधिग्रहण करणे, नवीन पाणीपुरवठा योजना राबविणे यासाठी २१ लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. पाणी टंचाईमधून जि.प.कडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही. तालुक्यात पावसाळ्यात दररोज १५० मि.मी. पाऊस पडतो. पण उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या भीषण टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

--------------------------

* कोरोनाबरोबर पाणीटंचाईची समस्या

तालुक्यातील ७ गावे व १३ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. गावात असणारा कोरोना व पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी नागरिकांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. पाणी आणण्यासाठीच्या ढकल गाड्यातून ८ घागरी ठेवून पाणी आणले जात आहे. सकाळची वेळ पाण्यासाठीच जात असल्याने शेतीच्या मशागतीच्या कामावर याचा परिणाम होत आहे.

--------------------

* बहिरेवाडीचा ३ कोटी ४० लाखांचा प्रस्ताव

मंत्रालयात

बहिरेवाडी गाव गेले अनेक वर्षापासून तहानलेले आहे. गावाला नदी नाही. ओढा आहे पण फेब्रुवारीतच पाणी संपते. तलाव आहे पण मार्चपासून यातील साठविलेले पाणी हिरवे होते. नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागतात. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ३ कोटी ४० लाखांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यांच्याच प्रयत्नाने या पाणी योजनेला मंजुरी मिळून गावकऱ्यांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.