शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

रात्रभर वाहतात पाण्याचे लोट

By admin | Updated: November 30, 2014 23:56 IST

शहरात पाण्याचा अपव्यय : ना महापालिकेला जाणीव, ना नागरिकांत जागरूकता

गणेश शिंदे - कोल्हापूर -कोल्हापूर शहरात पाण्याची प्रचंड उपलब्धता असतानाही केवळ निकृष्ट यंत्रणा व पाणी बचतीबाबत जनजागृतीचा अभावामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.शहरात एकूण एक लाख सहा हजार पाणी कनेक्शन आहेत. त्यापैकी घरगुती एक लाख दोन हजार, औद्योगिक बाराशे तर व्यावसायीक दोन हजार कनेक्शन आहेत. महापालिकेला शिंगणापूर योजनेतून रोज १२० एमएलडी (म्हणजे १२ कोटी लिटर) पाणी उपसा होते. त्यातील शहराला सुमारे ८५ एमएलडी पाण्याचा वापर होतो. त्यातील हजारो लिटर पाणी घरगुती नळ बंद नसल्याने तर कांही नळांच्या चाव्याच गायब असल्याने वाया जाते. तर जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. यामुळे सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. ‘गळक्या’ योजनेचा हातभारशिंगणापूर योजनेमधून शहराला पाणी येते; पण महिन्यातून एकदा तरी या गळक्या योजनेला महापालिकेला सामोरे जावे लागते. कधी व्हॉल्व्हचे काम, तर कधी पाणी उपसा केंद्रातील गाळ काढण्याचे काम, अशी कारणे आहेत. त्यासाठी प्रशासन पैसे खर्च करते; पण हा पैसा पाण्यासारखा वाहून जातो.ग्राहकांनी नळाला उच्च दर्जाच्या चाव्या बसवाव्यात. जेणेकरून पाण्याच्या अपव्ययाचा भुर्दंड त्यांना बसणार नाही.- मनीष पवार, जलअभियंता, महापालिकापहाटे पाणी आल्यानंतर तातडीने उठून चावी बंद करण्याची तसदी लोक घेत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती चाव्यांचे पाणीही वाहत असते. वृत्तपत्र विक्रेते पहाटे अनेक ठिकाणी रोज हे नळ बंद करतात; परंतु दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थीती असते.- किरण व्हनगुत्ते,ज्येष्ठ वृत्तपत्र विके्रते, कोल्हापूर.वृत्तपत्र विक्रेते, ज्येष्ठ नागरिकांची मदतशहरात सुमारे एक लाख २६ हजार मिळकतधारक आहेत. त्यांतील एक लाख सहा हजार हजार नळ कनेक्शन आहेत. मात्र, या नळाच्या तोट्या कधी गायब, तर कधी नळ अखंडपणे सुरू असतात. रात्री दोन वाजल्यापासून पाणी सुरू होते; ते सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच वाहून जाते. याचवेळी प्रत्येकाच्या घरोघरी वृत्तपत्र टाकणारे विक्रेते, सकाळी फिरण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक या सुरू असलेल्या चाव्या बंद करून पाण्याचा अपव्यय टाळताना दिसतात.