शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रात्रभर वाहतात पाण्याचे लोट

By admin | Updated: November 30, 2014 23:56 IST

शहरात पाण्याचा अपव्यय : ना महापालिकेला जाणीव, ना नागरिकांत जागरूकता

गणेश शिंदे - कोल्हापूर -कोल्हापूर शहरात पाण्याची प्रचंड उपलब्धता असतानाही केवळ निकृष्ट यंत्रणा व पाणी बचतीबाबत जनजागृतीचा अभावामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.शहरात एकूण एक लाख सहा हजार पाणी कनेक्शन आहेत. त्यापैकी घरगुती एक लाख दोन हजार, औद्योगिक बाराशे तर व्यावसायीक दोन हजार कनेक्शन आहेत. महापालिकेला शिंगणापूर योजनेतून रोज १२० एमएलडी (म्हणजे १२ कोटी लिटर) पाणी उपसा होते. त्यातील शहराला सुमारे ८५ एमएलडी पाण्याचा वापर होतो. त्यातील हजारो लिटर पाणी घरगुती नळ बंद नसल्याने तर कांही नळांच्या चाव्याच गायब असल्याने वाया जाते. तर जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. यामुळे सांडपाण्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. ‘गळक्या’ योजनेचा हातभारशिंगणापूर योजनेमधून शहराला पाणी येते; पण महिन्यातून एकदा तरी या गळक्या योजनेला महापालिकेला सामोरे जावे लागते. कधी व्हॉल्व्हचे काम, तर कधी पाणी उपसा केंद्रातील गाळ काढण्याचे काम, अशी कारणे आहेत. त्यासाठी प्रशासन पैसे खर्च करते; पण हा पैसा पाण्यासारखा वाहून जातो.ग्राहकांनी नळाला उच्च दर्जाच्या चाव्या बसवाव्यात. जेणेकरून पाण्याच्या अपव्ययाचा भुर्दंड त्यांना बसणार नाही.- मनीष पवार, जलअभियंता, महापालिकापहाटे पाणी आल्यानंतर तातडीने उठून चावी बंद करण्याची तसदी लोक घेत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती चाव्यांचे पाणीही वाहत असते. वृत्तपत्र विक्रेते पहाटे अनेक ठिकाणी रोज हे नळ बंद करतात; परंतु दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थीती असते.- किरण व्हनगुत्ते,ज्येष्ठ वृत्तपत्र विके्रते, कोल्हापूर.वृत्तपत्र विक्रेते, ज्येष्ठ नागरिकांची मदतशहरात सुमारे एक लाख २६ हजार मिळकतधारक आहेत. त्यांतील एक लाख सहा हजार हजार नळ कनेक्शन आहेत. मात्र, या नळाच्या तोट्या कधी गायब, तर कधी नळ अखंडपणे सुरू असतात. रात्री दोन वाजल्यापासून पाणी सुरू होते; ते सकाळी सहा वाजेपर्यंत तसेच वाहून जाते. याचवेळी प्रत्येकाच्या घरोघरी वृत्तपत्र टाकणारे विक्रेते, सकाळी फिरण्यासाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक या सुरू असलेल्या चाव्या बंद करून पाण्याचा अपव्यय टाळताना दिसतात.