शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

निपाणीला सोमवारपासून तीन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी ‌‌: निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाची पातळी १ एप्रिल रोजी ३७ फूट ११ इंच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी ‌‌: निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाची पातळी १ एप्रिल रोजी ३७ फूट ११ इंच इतकी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावातील पाण्याची पातळी ३९ फूट ३ इंच होती. सध्याच्या परिस्थितीची पाहणी करता, येत्या काळात निपाणी शहराला पाणीटंचाई होऊ नये यासाठी येत्या सोमवार (दि. ५) पासून निपाणी शहर व उपनगरांत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली. आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयुक्त महावीर बोरनवर, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगराध्यक्ष भाटले पुढे म्हणाले की, जवाहर तलावातून निपाणी शहराला पाणीपुरवठा होत असतो. प्रतिदिवसागणिक तलावातील पाण्याची पातळी एक इंच अशी कमी होत आहे. सोळा वर्षांनंतर प्रथमच फिल्टर बेड पूर्णपणे बदलण्यात आले असल्याने यापुढे गढूळ पाणीपुरवठा होणार नाही. शहरात होत असलेली गळती काढून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. शनिवारपासून गळती काढण्यासाठी कामकाज सुरू होणार आहे. यमगर्णी येथून तलावात होणारा पाणीपुरवठा सध्या सुरू आहे; पण शिरगुपी जलाशयातून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे जूनअखेर या पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे. यामुळे तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन

जूनअखेर तलावातील पाणी नागरिकांना पुरविणे हे मुख्य काम आहे. पाणीटंचाई होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या नळाला चाव्या बसवून घेणे व पाण्याचा वापर गरजेपुरता करणे आवश्यक आहे. गाड्या धुणे व इतर अनावश्यक कारणांसाठी पाणी वापरणे नागरिकांनी बंद करावे, असे आवाहन सर्व नगरसेवकांच्या वतीने नगराध्यक्षांनी केले.

३ कोटी २१ लाख वसुली

सन २०२०-२१ मध्ये मार्चअखेर नगरपालिकेने ३ कोटी २४ लाख रुपयांची वसुली पूर्ण केली आहे. एप्रिल २०२१ मध्ये या महिन्याचा फाळा भरणाऱ्या नागरिकांना पाच टक्के डिस्काउंट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये घरफाळा, दुकानफाळा, इंडस्ट्री फाळा, प्रॉपर्टी टॅक्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फाळ्याच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नसून नागरिकांना त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.