शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

निपाणीला सोमवारपासून तीन दिवसांआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क निपाणी ‌‌: निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाची पातळी १ एप्रिल रोजी ३७ फूट ११ इंच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

निपाणी ‌‌: निपाणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाची पातळी १ एप्रिल रोजी ३७ फूट ११ इंच इतकी आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावातील पाण्याची पातळी ३९ फूट ३ इंच होती. सध्याच्या परिस्थितीची पाहणी करता, येत्या काळात निपाणी शहराला पाणीटंचाई होऊ नये यासाठी येत्या सोमवार (दि. ५) पासून निपाणी शहर व उपनगरांत तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिली. आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयुक्त महावीर बोरनवर, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगराध्यक्ष भाटले पुढे म्हणाले की, जवाहर तलावातून निपाणी शहराला पाणीपुरवठा होत असतो. प्रतिदिवसागणिक तलावातील पाण्याची पातळी एक इंच अशी कमी होत आहे. सोळा वर्षांनंतर प्रथमच फिल्टर बेड पूर्णपणे बदलण्यात आले असल्याने यापुढे गढूळ पाणीपुरवठा होणार नाही. शहरात होत असलेली गळती काढून सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. शनिवारपासून गळती काढण्यासाठी कामकाज सुरू होणार आहे. यमगर्णी येथून तलावात होणारा पाणीपुरवठा सध्या सुरू आहे; पण शिरगुपी जलाशयातून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे जूनअखेर या पाण्याचा वापर होणे गरजेचे आहे. यामुळे तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन

जूनअखेर तलावातील पाणी नागरिकांना पुरविणे हे मुख्य काम आहे. पाणीटंचाई होऊ नये यासाठी नागरिकांनी पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या नळाला चाव्या बसवून घेणे व पाण्याचा वापर गरजेपुरता करणे आवश्यक आहे. गाड्या धुणे व इतर अनावश्यक कारणांसाठी पाणी वापरणे नागरिकांनी बंद करावे, असे आवाहन सर्व नगरसेवकांच्या वतीने नगराध्यक्षांनी केले.

३ कोटी २१ लाख वसुली

सन २०२०-२१ मध्ये मार्चअखेर नगरपालिकेने ३ कोटी २४ लाख रुपयांची वसुली पूर्ण केली आहे. एप्रिल २०२१ मध्ये या महिन्याचा फाळा भरणाऱ्या नागरिकांना पाच टक्के डिस्काउंट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये घरफाळा, दुकानफाळा, इंडस्ट्री फाळा, प्रॉपर्टी टॅक्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फाळ्याच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नसून नागरिकांना त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.