शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कासारी नदीचे पाणी दूषित, आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवलूज वार्ताहर - दिगवडे ते कसबा ठाणे (ता. पन्हाळा) दरम्यानच्या कासारी नदीतील पाणी दूषित झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

यवलूज वार्ताहर - दिगवडे ते कसबा ठाणे (ता. पन्हाळा) दरम्यानच्या कासारी नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. कासारी नदीवरील पुनाळ-तिरपण धरणापासून ते ठाणे-आळवे धरणापर्यंत कासारी नदीतील पाणी दूषित झाले असून पाण्यावर तेलकट रंगाचा काळपट तवंग दिसत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची परिसरातील लोकांची मागणी होत आहे.

पुनाळ-तिरपण धरणापासून ते ठाणे-आळवे धरणापर्यंतच्या कासारी नदी परिसरातील दिगवडे, पुशिरे, म्हाळुंगे, महाडिकवाडी, कसबा ठाणे, आळवे, कोतोली या गावांना नदीतून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. नदीतील दूषित पाण्यामुळे या गावांतील नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याचा घातक परिणाम होत असल्याने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

सध्या सर्वत्र कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव, वातावरणातील रोजचा बदल अशा विविध कारणांमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत असताना अशातच नदीतील दूषित पाण्यामुळे परिसरातील लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना करून दूषित पाण्याऐवजी शुद्ध पाणी मिळावे, अशी लोकांची मागणी आहे.

चौकट –

दूषित पाण्याबद्दल लोकांच्या तक्रारी आल्यानंतर पाण्याची टाकी दोनवेळा स्वच्छ करून घेतली. तरीदेखील काही फरक पडला नाही. त्यामुळे कासारी नदीवर जावून पाणी बघितले असता ते दूषित आढळून आले. त्यामुळे यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

अनिष पाटील, सरपंच, कसबा ठाणे

फोटो ओळ –

कसबा ठाणे : येथील कासारी नदीमध्ये दिसत असलेले दूषित पाणी.