शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
3
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
5
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
6
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
7
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
8
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
9
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
10
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
11
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
12
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
13
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
14
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
15
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
16
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
17
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
18
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
19
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
20
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

कासारी नदीचे पाणी दूषित, आरोग्याचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवलूज वार्ताहर - दिगवडे ते कसबा ठाणे (ता. पन्हाळा) दरम्यानच्या कासारी नदीतील पाणी दूषित झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

यवलूज वार्ताहर - दिगवडे ते कसबा ठाणे (ता. पन्हाळा) दरम्यानच्या कासारी नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे. कासारी नदीवरील पुनाळ-तिरपण धरणापासून ते ठाणे-आळवे धरणापर्यंत कासारी नदीतील पाणी दूषित झाले असून पाण्यावर तेलकट रंगाचा काळपट तवंग दिसत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची परिसरातील लोकांची मागणी होत आहे.

पुनाळ-तिरपण धरणापासून ते ठाणे-आळवे धरणापर्यंतच्या कासारी नदी परिसरातील दिगवडे, पुशिरे, म्हाळुंगे, महाडिकवाडी, कसबा ठाणे, आळवे, कोतोली या गावांना नदीतून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. नदीतील दूषित पाण्यामुळे या गावांतील नागरिकांच्या व जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊन त्याचा घातक परिणाम होत असल्याने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

सध्या सर्वत्र कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव, वातावरणातील रोजचा बदल अशा विविध कारणांमुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत असताना अशातच नदीतील दूषित पाण्यामुळे परिसरातील लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना करून दूषित पाण्याऐवजी शुद्ध पाणी मिळावे, अशी लोकांची मागणी आहे.

चौकट –

दूषित पाण्याबद्दल लोकांच्या तक्रारी आल्यानंतर पाण्याची टाकी दोनवेळा स्वच्छ करून घेतली. तरीदेखील काही फरक पडला नाही. त्यामुळे कासारी नदीवर जावून पाणी बघितले असता ते दूषित आढळून आले. त्यामुळे यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

अनिष पाटील, सरपंच, कसबा ठाणे

फोटो ओळ –

कसबा ठाणे : येथील कासारी नदीमध्ये दिसत असलेले दूषित पाणी.