शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावच्या शाळेतील झाडांना सांडपाण्याचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 00:46 IST

पर्यावरण रक्षणाचे धडे : विद्यार्थीच बनले जलमित्र, पाण्याच्या पुनर्वापरावर भर

संदीप आडनाईक--कोल्हापूर  कळंबा व पाचगावच्या मध्यावर असणाऱ्या माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मिलिंद कोपार्डेकर यांच्या प्रोत्साहनातून शाळेच्या परिसरातील झाडांना विद्यार्थ्यांच्या एका चमूने चक्क सांडपाण्याचे सिंचन करून ही झाडे जगविण्याचा आटापिटा सुरू केला आहे. या प्रयत्नातून या गटाने आगळ्यावेगळ्या जलचळवळीत स्वत:ला झोकून दिले आहे. हा गट गिरगावातील एका टेकडीवरील झाडांनाही पाणी देण्याचे काम करत खऱ्या अर्थाने जलमित्र बनला आहे. कळंबा परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्यानंतर तीन वर्षांपूर्वीच शाळेतील झाडांना पाणी देण्याबाबत त्यांनी विचार सुरू केला. एका रविवारी त्यांनी विद्यार्थ्यांना कळंबा तलावातून बादलीने पाणी आणण्याची कल्पना मांडली. तेव्हा आठवीतील विद्यार्थ्यांनी खांद्यावरुन घागरीने तसेच बादलीने एकमेकांच्या साखळीद्वारे हे पाणी झाडांना घालण्यात आले. तेव्हापासून या विद्यार्थ्यांचे हे मिशन बनले. आजही हा उपक्रम अव्याहतपणे सुरु आहे. दहावीत असणारे हे विद्यार्थी या जलचळवळीचा भाग बनले आहेत. विद्यार्थी जेवल्यानंतर एका बादलीत हात धुतात, तेच पाणी झाडांना घालतात. हा प्रयोग ते घरीही करुन पाणी वाचवू लागले. २0१२ मध्ये शाळेचा नादुरुस्त बोअर दुरुस्त करुन त्याचे पाणी झाडांना देवू लागले. आज त्याचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पुन्हा कोपार्डेकर यांनी एका घरातील वाया जाणारे सांडपाणी झाडांना देण्याची कल्पना मांडली. शिपाई शंकर पुनपाळ यांच्या मदतीने व मुख्याध्यापक व्ही. बी. ठाकूर यांच्या प्रोत्साहनातून या घरातील सांडपाणी एका तीन बाय तीन बाय तीनच्या खडड्यात साठविण्यात आले. त्यानंतर कोळसा, खडी व पिंजर वापरुन हे सांडपाणी दुसऱ्या खड्यात सोडण्यात आले. सांडपाणी असल्यामुळे विद्यार्थी हातमोजे घालून हे पाणी झाडांना देतात. रोेज ४५ बादल्या पाणी १0 ते १५ झाडांना घालण्यात येते.कोपार्डेकर सरांची प्रेरणा --कळंबा-पाचगाव येथील माध्यमिक विद्यालयात मिलिंद कोपार्डेकर हे २00८ पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्र हे त्यांच्या अध्ययनाचे विषय, परंतु चाकोरीबाहेर जाऊन त्यांनी शाळेत अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. त्यात सहकारी शिक्षक, शिपाईही सहभागी झाले आहेत. चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमध्येही ते सहभागी आहेत. या चळवळीत ते केवळ सहभागी नाहीत, तर शाळेत त्यांनी हा उपक्रम स्वतंत्रपणे सुरू केला आहे. पंधरा विद्यार्थ्यांचा वसा -दहावीमधील १0 ते १५ विद्यार्थ्यांचा हा गट गेली तीन वर्षे या परिसरातील झाडांना पाणी घालण्याचे काम करत आहे. निखिल जाधव, प्रथमेश आवळे, ओंकार कुंभार, रत्नम उसूळकर, कार्तिक रेडेकर, आदर्श कडोलकर, आदित्य पानगळे, सिद्धार्थ वाघमारे, प्रेम पाटील, आदींचा हा गट जलचळवळीसाठी कार्यरत आहे. त्यांना शिक्षक दीपक कांबळे, सुलभा आलेकर, वैशाली साळोखे, लक्ष्मण लोहार, प्रकाश पाटील, रमेश गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांचे सहकार्य असते. गिरगावाताील एका टेकडीवर एका संस्थेने काही वर्षांपूर्वी झाडे लावली, पण त्याला हेच विद्यार्थी पाणी देत आहेत. शिवाय परिसरातील पाचशे झाडांना ते दररोज पाणी देत आहेत. कळंबा तलावातील जलचर सर्वेक्षणही याच गटाने केले होत. मिलिंद यादव यांच्या चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीशी हे विद्यार्थी संबंधित आहेत.