शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावच्या शाळेतील झाडांना सांडपाण्याचे सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 00:46 IST

पर्यावरण रक्षणाचे धडे : विद्यार्थीच बनले जलमित्र, पाण्याच्या पुनर्वापरावर भर

संदीप आडनाईक--कोल्हापूर  कळंबा व पाचगावच्या मध्यावर असणाऱ्या माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक मिलिंद कोपार्डेकर यांच्या प्रोत्साहनातून शाळेच्या परिसरातील झाडांना विद्यार्थ्यांच्या एका चमूने चक्क सांडपाण्याचे सिंचन करून ही झाडे जगविण्याचा आटापिटा सुरू केला आहे. या प्रयत्नातून या गटाने आगळ्यावेगळ्या जलचळवळीत स्वत:ला झोकून दिले आहे. हा गट गिरगावातील एका टेकडीवरील झाडांनाही पाणी देण्याचे काम करत खऱ्या अर्थाने जलमित्र बनला आहे. कळंबा परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्यानंतर तीन वर्षांपूर्वीच शाळेतील झाडांना पाणी देण्याबाबत त्यांनी विचार सुरू केला. एका रविवारी त्यांनी विद्यार्थ्यांना कळंबा तलावातून बादलीने पाणी आणण्याची कल्पना मांडली. तेव्हा आठवीतील विद्यार्थ्यांनी खांद्यावरुन घागरीने तसेच बादलीने एकमेकांच्या साखळीद्वारे हे पाणी झाडांना घालण्यात आले. तेव्हापासून या विद्यार्थ्यांचे हे मिशन बनले. आजही हा उपक्रम अव्याहतपणे सुरु आहे. दहावीत असणारे हे विद्यार्थी या जलचळवळीचा भाग बनले आहेत. विद्यार्थी जेवल्यानंतर एका बादलीत हात धुतात, तेच पाणी झाडांना घालतात. हा प्रयोग ते घरीही करुन पाणी वाचवू लागले. २0१२ मध्ये शाळेचा नादुरुस्त बोअर दुरुस्त करुन त्याचे पाणी झाडांना देवू लागले. आज त्याचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पुन्हा कोपार्डेकर यांनी एका घरातील वाया जाणारे सांडपाणी झाडांना देण्याची कल्पना मांडली. शिपाई शंकर पुनपाळ यांच्या मदतीने व मुख्याध्यापक व्ही. बी. ठाकूर यांच्या प्रोत्साहनातून या घरातील सांडपाणी एका तीन बाय तीन बाय तीनच्या खडड्यात साठविण्यात आले. त्यानंतर कोळसा, खडी व पिंजर वापरुन हे सांडपाणी दुसऱ्या खड्यात सोडण्यात आले. सांडपाणी असल्यामुळे विद्यार्थी हातमोजे घालून हे पाणी झाडांना देतात. रोेज ४५ बादल्या पाणी १0 ते १५ झाडांना घालण्यात येते.कोपार्डेकर सरांची प्रेरणा --कळंबा-पाचगाव येथील माध्यमिक विद्यालयात मिलिंद कोपार्डेकर हे २00८ पासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्र हे त्यांच्या अध्ययनाचे विषय, परंतु चाकोरीबाहेर जाऊन त्यांनी शाळेत अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत. त्यात सहकारी शिक्षक, शिपाईही सहभागी झाले आहेत. चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीमध्येही ते सहभागी आहेत. या चळवळीत ते केवळ सहभागी नाहीत, तर शाळेत त्यांनी हा उपक्रम स्वतंत्रपणे सुरू केला आहे. पंधरा विद्यार्थ्यांचा वसा -दहावीमधील १0 ते १५ विद्यार्थ्यांचा हा गट गेली तीन वर्षे या परिसरातील झाडांना पाणी घालण्याचे काम करत आहे. निखिल जाधव, प्रथमेश आवळे, ओंकार कुंभार, रत्नम उसूळकर, कार्तिक रेडेकर, आदर्श कडोलकर, आदित्य पानगळे, सिद्धार्थ वाघमारे, प्रेम पाटील, आदींचा हा गट जलचळवळीसाठी कार्यरत आहे. त्यांना शिक्षक दीपक कांबळे, सुलभा आलेकर, वैशाली साळोखे, लक्ष्मण लोहार, प्रकाश पाटील, रमेश गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांचे सहकार्य असते. गिरगावाताील एका टेकडीवर एका संस्थेने काही वर्षांपूर्वी झाडे लावली, पण त्याला हेच विद्यार्थी पाणी देत आहेत. शिवाय परिसरातील पाचशे झाडांना ते दररोज पाणी देत आहेत. कळंबा तलावातील जलचर सर्वेक्षणही याच गटाने केले होत. मिलिंद यादव यांच्या चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीशी हे विद्यार्थी संबंधित आहेत.