शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या-विमुक्त समाजातर्फे दंडवत

By admin | Updated: June 17, 2015 00:41 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर अनोखा मोर्चा : विविध मागण्यांसाठी उघड्या अंगानिशी काठ्या बडवत आक्रोश

कोल्हापूर : स्वत:चे गाव नाही की राहते घर. जन्माच्या नोंदी झालेल्या नाहीत की महसुली पुरावे नाहीत. शाळेलाच गेलो नाही, तर शाळा सोडल्याचा दाखला कोण देणार, गाव-घर नसल्याने रेशनकार्ड नाही, अशा बिकट स्थितीत जीवन जगणाऱ्या जिल्ह्यातील भटक्या समाजाला न्याय मिळावा म्हणून गेली काही वर्षे लढा सुरू आहे; पण सरकारी बाबू न्याय द्यायला तयार नाहीत. त्यामुळे भटक्या-विमुक्त समाजातील संतप्त नागरिकांनी मंगळवारी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दंडवत आंदोलनाने आक्रोश केला. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली.जिल्ह्यात ठिकठिकाणी सरकारी गावरानात अतिक्रमण करून राहत असलेल्या भटक्या-विमुक्त समाजाच्या नागरिकांना राहत्या जागा मालकी हक्काने द्याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भटक्या-विमुक्त मुक्ती आंदोलन संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. गेल्या अनेक वर्षांपासून मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून उघड्या अंगाने दंडवत घालत रस्त्यावर काठ्या बडवीत आक्रोश केला. बिंदू चौक येथून हा मोर्चा सुरू झाला. मोर्चात सुमारे तीनशेंहून अधिक महिला-पुरुष सहभागी झाले होते. दुपारच्या वेळी भर उन्हात भटक्या-विमुक्त समाजातील असंख्य तरुण दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्यावर उघड्या अंगाने दंडवत घालत होते. तापलेल्या रस्त्यांवर घातले जाणारे दंडवत पाहून येणारे जाणारे शहरवासीय हळहळत होते. मोर्चा बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महानगरपालिका, सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी दोन वाजता पोहोचला. या मोर्चामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पोलिसांना अन्य मार्गांनी वाहतूक वळवावी लागली. मोर्चात संतप्त घोषणाबाजी करण्यात येत होती. ‘एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’, ‘भटक्या विमुक्तांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा अडविल्यानंतर घोषणाबाजीला अधिकच जोर चढला. मोर्चासमोर भटक्या - समाज मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष भीमराव साठे यांनी आपल्या भाषणात आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली. नंतर उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांना निवेदन देण्यात आले. पारगाव, टोप, नागाव, कसबा वडगाव, मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथे गायरानांत वास्तव्यास असणाऱ्या भटक्या समाजातील नागरिकांना घरांसाठी हक्काची जमीन द्यावी, भटक्या विमुक्तांना मूळ गाव नाही, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले या कोणत्याही बाबी उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ही जाचक अट शिथिल करून स्थानिक चौकशी ग्राह्य मानावी; तसेच शासन निर्णयानुसार गोपाळ, नंदिवाले, नाथपंथी, डवरी, गोसावी या समाजातील अशिक्षितांना घरकुल योजनेकामी जातीचे दाखले देण्यात यावेत, दारिद्र्यरेषेखालीलची अट शिथिल करून कुटुंब बेघर असल्यास स्थानिक चौकशी करून घरकुल योजनेचा लाभ मिळावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)'रुपयाचा कढीपत्ता सरकार झालं बेपत्ता'‘एक रुपयाचा कढीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता’ या घोषणेबरोबरच दंडवत मोर्चा लक्षवेधी ठरला.पारगाव, टोप, नागांव, कसबा वडगाव, मौजे तासगाव (ता. हातकणंगले) येथे गायरानांत वास्तव्यास असणाऱ्या भटक्यांना घरांसाठी हक्काची जमीन द्यावी.दारिद्र्यरेषेखालीलची अट शिथिल करून कुटुंब बेघर असल्यास स्थानिक चौकशी करून घरकुल योजनेचा लाभ मिळावा.भटक्या विमुक्तांना मूळ गाव नाही, जन्माचे दाखले, शाळा सोडल्याचे दाखले या कोणत्याही बाबी उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे ही जाचक अट शिथिल करून स्थानिक चौकशी ग्राह्य मानावी.शासन निर्णयानुसार गोपाळ, नंदिवाले, नाथपंथी, डवरी, गोसावी या समाजातील अशिक्षितांना घरकुल योजनेच्या लाभासाठी जातीचे दाखले द्यावेत.