शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘वालचंद’साठी मंत्रिपद धुडकावले

By admin | Updated: January 15, 2017 01:10 IST

संजयकाका पाटील : जशास तसे उत्तर देणे हा नाईलाज होता!

सांगली : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय वाचविण्याचा विषय ज्यावेळी चर्चेत होता, त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या. अनेक राजकीय नेत्यांनी, तज्ज्ञांनी मला या प्रकरणात न पडण्याबाबत सांगितले, तरीही मंत्रिपदाची संधी धुडकावून मी ‘वालचंद’ वाचविण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी दिले. येथील वालचंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, महाविद्यालयाशी संबंधित काही लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावेळी गुंडगिरीच्या माध्यमातून काही लोकांनी महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. हा विषय पेटला असताना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी काही लोकांनी मला वेड्यासारखे न वागण्याची सूचना केली. माझेही विचार काहीवेळ बदलले. कोणाच्या महाविद्यालयात किती लक्ष घालायचे आणि तिकडे आपण डावावर लागायचे, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. त्यानंतर महाविद्यालयाचा एकूण प्रवास आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याची ख्याती लक्षात घेतल्यानंतर जिल्'ाचे वैभव म्हणून ‘वालचंद’च्या विषयात लक्ष घालण्याचा निर्णय मी घेतला. मंत्रिपदाच्या संधीची कोणतीही पर्वा केली नाही. सुरुवातीला चांगुलपणा दाखविण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने नाईलाजास्तव महाविद्यालयात येऊन जशाच तसे उत्तर द्यावे लागले. एक चांगली संस्था गुंडगिरीच्या जोरावर आणि खोट्या कागदपत्राच्या जोरावर कोणीतरी गिळंकृत करू पाहात होते. आता त्यांना विरोध केला नसता, तर भविष्यात अशाच गोष्टींच्या जोरावर ते यशस्वी झाले असते. महाविद्यालयाचे नुकसान होत असल्याने न्यायालयीन निर्णयाची वाट पाहणेही आम्हाला तोपर्यंत शक्य नव्हते. आता कोणतीही अडचण महाविद्यालयासमोर नाही. अशा महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये माझ्यासारख्या राजकीय व्यक्तीने सहभागी होणे योग्य की अयोग्य, हे मला माहीत नाही, पण हे महाविद्यालय आम्हाला सांगलीचे वैभव वाटते. आता ते ख्यातीप्रमाणे पुढे जात आहे. माजी विद्यार्थ्यांनी धन नाही दिले तरी चालेल, पण तन आणि मन तेवढे महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. राजकारणी शिक्षणसम्राटांकडून धनवंतांनाच प्रवेशवालचंद महाविद्यालय ही गुणवत्तेवर आधारित शिक्षण देणारी संस्था आहे. खरेतर आम्हा राजकारण्यांच्या संस्थांचा गुणवत्तेशी फारसा संबंध येत नाही. धनवंत बापाच्या पोरांना प्रवेश देऊन आम्ही शिक्षणसम्राट होतो. मात्र, येथे तसे नसल्याने ‘वालचंद’बद्दल माझ्या मनात आदरभाव आहे, असे संजयकाका पाटील म्हणाले.