शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव पालिका घरोघरी देणार कचराकुंड्या

By admin | Updated: December 10, 2015 01:03 IST

महिन्यात अंमलबजावणी : सहा हजार घरांना देणार प्रत्येकी दोन कुंड्या, लोकसहभागातून कुंड्या संकलनाचे नियोजन

सुहास जाधव- पेठवडगाव --‘स्वच्छ भारत’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वडगाव पालिकेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. पालिकेने पुढाकार घेत लोकसहभागातून कचराकुंड्या मिळाव्यात, याचे नियोजन केले आहे. शहरातील सुमारे सहा हजार घरांना प्रत्येकी दोन कचराकुंड्या पुरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कचराकुंड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जाईल, तसेच पालिकेच्या घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन केले जाणार आहे.जिल्ह्यासह राज्यातील या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर राबविण्यात येणार आहे. पालिकेने एक दिवसा आड घंटागाडीद्वारे घरातून कचरा संकलन अभियान यशस्वीपणे राबविले आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून नागरिकांत कचराकुंड्या देण्यासाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.सध्या शहरात तीन घंडागाड्या व उर्वरित शहरातील कचरा दोन ट्रॅक्टरमधून संकलित करण्यात येतो. हा कचरा ओला व सुका एकत्रित असतो. हा कचरा डेपोत संकलित केला जातो. या पार्श्वभूमीवर शहरातील ओला कचरा थेट घरातून वेगळा करून संकलित करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे. या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट, गांडूळ खत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरात प्रत्यक्षात सुमारे सात हजार मिळकतधारक आहेत. यात रहिवासी विभागातील सहा हजार घरे आहेत. यातील प्रत्येक घरात कचराकुंड्या वितरित केल्या जाणार आहेत. दोन वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक त्यांचे संकलन करणार आहेत. तशी सुविधा कचरा उचलणाऱ्या अ‍ॅपे रिक्षा (घंटागाडी) वाहनामध्ये करण्यात येणार आहे.लोकसहभागातून कचराकुंड्या मिळाव्यात, यासाठी पालिका प्रशासनाने चाचपणी केली आहे. त्यास शहरातील काही बॅँकांनी तत्काळ प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत सहा हजार कचराकुंड्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.उत्पन्नात भर पडण्यासाठी खताचे नियोजनस्वच्छतेच्यादृष्टीने कचरा उठाव यशस्वी झालेले आहे. पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी, यासाठी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट, गांडूळ खताचे नियोजन पालिकेने केलेले आहे. तरी नागरिक, बॅँका, पतसंस्था, विविध संस्था, सामाजिक संस्था, तरुण मंडळे व दानशूर व्यक्तींनी लोकसहभागातून कचराकुंडी दान उपक्रमास सहकार्य करावे. पाच लिटरच्या कुंड्या देण्याचे नियोजन केले असून, कुंड्या दान करण्यासाठी पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी नागेंद्र मुत्तेकर यांनी केले आहे.