शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
7
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
8
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
9
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
10
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
11
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
12
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
13
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
14
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
15
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
16
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
17
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
18
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
19
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
20
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक

नेत्यांच्या राबणुकीला मतदारांनी दिला न्याय

By admin | Updated: February 24, 2017 00:41 IST

सर्वच पक्षांना जल्लोषाची संधी : भाजप, शिवसेना नेत्यांचे नियोजन ठरले यशस्वी

कोल्हापूर : सर्व पक्षांच्या नेत्यांच्या राबणुकीला मतदारांनी न्याय दिल्याचे प्रातिनिधिक चित्र जिल्हा परिषदेच्या निकालानंतर समोर आले आहे. त्यातही शिवसेना आणि भाजपने जाणीवपूर्वक केलेले नियोजन यशस्वी झाल्याचे एकूण विजयी सदस्यांची संख्या पाहता दिसून येते. गेल्यावेळी ३० सदस्यांच्या बळावर जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’ला सोबत घेऊन सत्ता संसार करणाऱ्या काँग्रेसच्या विजयासाठी यावेळीही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले आहे. पी. एन. यांच्या चिरंजीवाचा विवाह याचदरम्यान आल्याने त्यांना जिल्हाभर फिरता आले नाही. त्यामुळे त्यांनी नंतर ‘करवीर’वर लक्ष केंद्रित केले. मात्र, सतेज पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात फिरून उमेदवारी देण्यापासून ते प्रचारसभा घेण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडली. मात्र, काँग्रेसचे दोन नेते जयवंतराव आवळे आणि प्रकाश आवाडे यांच्यातील वाद मिटवता आला नाही. काँग्रेसचे बहुतांशी उमेदवार या दोघांना मानणारे आहेत.राष्ट्रवादीच्या निवडणुकीची धुरा प्रामुख्याने आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यावर होती. माजी खासदार निवेदिता माने, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी काही ठिकाणी भाजपच्या ‘सोयीची भूमिका’ घेतली असतानाही आणि प्रतिकूल वातावरण जाणवत होते. मात्र, टप्प्या-टप्प्याने अनेकजण राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानेही मुश्रीफ हे जिल्हाभर काम करू शकले नाहीत हे वास्तव आहे. त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच अडकून पडावे लागले. महसूलमंत्री भाजपचे चंद्रकांतदादा पाटील यांनी जनसुराज्य आणि ताराराणी आघाडीला सोबत घेत चांगली आखणी केली होती. माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, आमदार अमल महाडिक, संघटनमंत्री बाबा देसाई यांच्यावर ‘दादां’नी जबाबदारी टाकून ते सांगली आणि साताऱ्याच्या प्रचारासाठीही फिरत होते. ‘भाजता’ची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, नंतर अनेक जागांवर पर्याय नसल्याने भाजपला मिळतील ते उमेदवार उभे करावे लागले तरीही भाजपने काँग्रेसच्या बरोबरीने जागा मिळविल्या. भाजपच्या सामूहिक प्रयत्नांचेच हे यश आहे. मावळत्या सभागृहात भाजपचे ३ उमेदवार होते. तेथून १४ पर्यंतची भाजपने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. दुसरीकडे शिवसेनेला फारसे कुणी गांभीर्याने घेत नसल्याचे प्रारंभी चित्र होते. मात्र, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांनी अतिशय शांतपणे, फारसा गाजावाजा न करता नियोजन केले होते. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, संजय मंडलिक, संजय घाटगे यांच्या प्रयत्नांना यश येत शिवसेना सहा जागांवरून या सभागृहात दहा जागांवर पोहोचली. मुंबई महापालिकेच्या संघर्षामुळे शिवसेना आणि भाजप हे समीकरण आधी जमले नाही. मात्र, अशी युती झाली असती तर या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असते.काँग्रेसतर्फे सतेज पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात फिरून प्रचाराची धुरा सांभाळली राष्ट्रवादीच्या निवडणुकीची धुरा प्रामुख्याने आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांच्यावर होती.चंद्रकांतदादा पाटील यांनी जनसुराज्य आणि ताराराणी आघाडीला सोबत घेत चांगली आखणी केली होती. जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव यांनी अतिशय शांतपणे, फारसा गाजावाजा न करता नियोजन केले होते.