ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा --राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशी ओळख असणाऱ्या हत्तीवडे-मलिग्रे उत्पादक गटात कारखाना स्थापनेपासून विष्णुपंत केसरकर यांचे वर्चस्व वेळोवेळी सिद्ध झाले आहे. यावेळी केसरकर यांनी राष्ट्रवादीविरोधात थेट आघाडीच तयार केल्याने या गटात पुन्हा एकदा केसरकरांचे राष्ट्रीय काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीचे नेटके आवाहन उभे ठाकले आहे.पंधरा दिवसांपूर्वी केसरकरांनी पाच-सहा हजार ग्रामस्थ व सभासदांना एकत्र करून शक्तिप्रदर्शन केले होते. राष्ट्रवादी काँगे्रसमधून कुरघोडीचे राजकारण होत असल्याचा आरोप करीत थेट रवींद्र आपटे, अशोकअण्णा चराटी यांच्यासोबत हातमिळवणी केली. केसरकर आपल्यासोबत राहणार असा दावा करणारी राष्ट्रवादी मात्र, यामुळे या गटात अडचणीत आली आहे.इतर गटांच्या तुलनेत हा गट लहान आहे. फक्त १३ गावे आणि ४०६६ मतदान अशी या गटाची रचना आहे. स्व. वसंतराव देसाई विकास आघाडीने मोठी मतदार संख्या असणाऱ्या किणे, हत्तीवडे व सुळे येथून उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत.राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीतून अॅड. लक्ष्मण गुडूळकर, अनिल फडके व आनंदा बुगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँगे्रस, जयवंतराव शिंपी गट आणि श्रीमती अंजनाताई रेडेकर गट अशी ही विभागणी आहे. दोन्ही बाजूने नाराजांची संख्याही मोठी आहे. प्राधान्याने विद्यमान संचालक राजू जाधव व नागोजी पाटील यांना प्रमुख आघाडीत स्थान दिलेले नाही. संभाजी पाटील (हत्तीवडे), संदीप केसरकर यांचे देखील नाव ऐनवेळी गायब झाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या नाराजांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे.राष्ट्रवादी राष्ट्रीय काँगे्रसने किणे व हत्तीवडे ही दोन मोठी गावे बाजूला ठेवली, तर मलिग्रे येथून स्व. देसाई आघाडीला उमेदवारी देता आलेली नाही.या गटात नंदिनी बाभूळकर, संग्राम कुपेकर, संध्यादेवी कुपेकर यांच्यासह अनेक बडी मंडळी प्रचाराचा धुरळा उडविणार आहेत.
विष्णुपंतांचे दोन्ही काँगे्रसला नेटके आवाहन
By admin | Updated: May 12, 2016 00:55 IST