शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गावे बदलली, पण राजकारण नाही

By admin | Updated: December 26, 2016 00:54 IST

मोहन पाटील : निमशिरगाव येथे २० वे मराठी साहित्य संमेलन ; ग्रंथदिंडी, काव्यमैफील, परिसंवाद उत्साहात

 

जयसिंगपूर : प्रत्येक साहित्यातून माणसाला वेगवेगळी प्रेरणा मिळते व ही प्रेरणा माणूस जिवंत राहण्यासाठी उपयोगी ठरते. सध्याची व्यवस्था ही कमकुवत बनली असून, यावर लेखकांनी न दबता आवाज उठविला पाहिजे. असत्यपणा पालखीत न बसविता लेखकांनी काय करावे, याचे आचरण केले पाहिजे. तसेच जनतेला काय मिळेल या भावनेचा विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या युगात गावे बदलली आहेत; पण परिवर्तन झाले नाही. त्यामुळे जात, तिढे, राजकारण बदलले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाध्यक्ष प्रा. मोहन पाटील यांनी केले. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे साहित्य सुधा कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंचाच्या वतीने २० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी पार पडले. प्रारंभी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन केले. यावेळी प्रा. पाटील बोलत होते. यावेळी उद्घाटक पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सध्या संमेलनाला देणगी देणारे अनेक आहेत; मात्र श्रोते भेटणे अवघड झाले आहे. गावगाड्यातील शेतकऱ्यांना माझी भाषा तलवारीच्या पात्यागत वाटत असली, तरी ती साहित्यांच्या संस्कारातून घडली आहे. यावेळी स्वागताध्यक्ष ‘शरद’चे संचालक अनिल बागणे होते. स्वागत प्रा. पद्माकर पाटील व प्रास्ताविक शांताराम कांबळे यांनी केले. दरम्यान, जयसिंगपूरच्या नूतन नगराध्यक्षा डॉ. नीता माने व मंत्री खोत यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी मानपत्र वाचन गोमटेश पाटील यांनी केले. समर्पण वाचन नियुक्ती साजणे यांनी केले. यावेळी शेतकरी राजा पुरस्कार चवगोंडा साकाप्पा दानोळे यांना देण्यात आला. साहित्यरत्न पुरस्कार विजय चोरमारे (मुंबई), देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार सुरेश शिपूरकर यांना देण्यात आला. यावेळी डॉ. महावीर अक्कोळे, सुरेश कांबळे, पद्माकर पाटील, रावसाहेब पुजारी, शांतीनाथ पाटील, डॉ. सुकुमार मगदूम, डॉ. श्रीवर्धन पाटील, बी. एल. कांबळे, डॉ. सुभाष अडदंडे, विठ्ठल मोरे, पी. पी. पाटील उपस्थित होते. रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले. आण्णांच्या जीवनपटाचा आढावा घ्या स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कार्य राज्यात उल्लेखनीय आहे. त्यामुळे पुढील साहित्य संमेलनात त्यांच्या जीवनपटाचा आढावा घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन साहित्य संमेलन समितीकडे आमदार उल्हास पाटील यांनी केले. काव्यमैफील दुपारच्या सत्रात आप्पासाहेब खोत-कोडोली यांनी कथाकथन केले, तर ‘काव्यमैफील’ प्रा. डॉ. चंद्रकांत ऊर्फ राजू पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विजय बेळंके, बाळासाहेब बाबर, डी. बी. चिपरगे, अस्मिता इनामदार, डॉ. अनिता खेबुडकर, अभिजित पाटील, रमेश ढाले यांच्यासह कवींनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी) नोटाबंदी मूर्खपणा दुसऱ्या सत्रात ‘नोटाबंदी अर्थकारण की राजकारण’ या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, हे साहित्य संमेलन क्रांतिकारक आहे. सध्या नोटाबंदीमुळे देशात अर्थव्यवस्था गंभीर बनली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेविना शासनाने हे धोरण राबविल्यामुळे नोटाबंदीचा निर्णय मूर्खपणाचा आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘चिदंबरम्’ यांच्या बातमीचा आढावा वारंवार आपल्या मार्गदर्शनात त्यांनी केला.