शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

गावे बदलली, पण राजकारण नाही

By admin | Updated: December 26, 2016 00:54 IST

मोहन पाटील : निमशिरगाव येथे २० वे मराठी साहित्य संमेलन ; ग्रंथदिंडी, काव्यमैफील, परिसंवाद उत्साहात

 

जयसिंगपूर : प्रत्येक साहित्यातून माणसाला वेगवेगळी प्रेरणा मिळते व ही प्रेरणा माणूस जिवंत राहण्यासाठी उपयोगी ठरते. सध्याची व्यवस्था ही कमकुवत बनली असून, यावर लेखकांनी न दबता आवाज उठविला पाहिजे. असत्यपणा पालखीत न बसविता लेखकांनी काय करावे, याचे आचरण केले पाहिजे. तसेच जनतेला काय मिळेल या भावनेचा विचार करणे गरजेचे आहे. सध्याच्या युगात गावे बदलली आहेत; पण परिवर्तन झाले नाही. त्यामुळे जात, तिढे, राजकारण बदलले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाध्यक्ष प्रा. मोहन पाटील यांनी केले. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे साहित्य सुधा कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंचाच्या वतीने २० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी पार पडले. प्रारंभी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन केले. यावेळी प्रा. पाटील बोलत होते. यावेळी उद्घाटक पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सध्या संमेलनाला देणगी देणारे अनेक आहेत; मात्र श्रोते भेटणे अवघड झाले आहे. गावगाड्यातील शेतकऱ्यांना माझी भाषा तलवारीच्या पात्यागत वाटत असली, तरी ती साहित्यांच्या संस्कारातून घडली आहे. यावेळी स्वागताध्यक्ष ‘शरद’चे संचालक अनिल बागणे होते. स्वागत प्रा. पद्माकर पाटील व प्रास्ताविक शांताराम कांबळे यांनी केले. दरम्यान, जयसिंगपूरच्या नूतन नगराध्यक्षा डॉ. नीता माने व मंत्री खोत यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी मानपत्र वाचन गोमटेश पाटील यांनी केले. समर्पण वाचन नियुक्ती साजणे यांनी केले. यावेळी शेतकरी राजा पुरस्कार चवगोंडा साकाप्पा दानोळे यांना देण्यात आला. साहित्यरत्न पुरस्कार विजय चोरमारे (मुंबई), देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार समाजरत्न पुरस्कार सुरेश शिपूरकर यांना देण्यात आला. यावेळी डॉ. महावीर अक्कोळे, सुरेश कांबळे, पद्माकर पाटील, रावसाहेब पुजारी, शांतीनाथ पाटील, डॉ. सुकुमार मगदूम, डॉ. श्रीवर्धन पाटील, बी. एल. कांबळे, डॉ. सुभाष अडदंडे, विठ्ठल मोरे, पी. पी. पाटील उपस्थित होते. रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले. आण्णांच्या जीवनपटाचा आढावा घ्या स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे कार्य राज्यात उल्लेखनीय आहे. त्यामुळे पुढील साहित्य संमेलनात त्यांच्या जीवनपटाचा आढावा घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन साहित्य संमेलन समितीकडे आमदार उल्हास पाटील यांनी केले. काव्यमैफील दुपारच्या सत्रात आप्पासाहेब खोत-कोडोली यांनी कथाकथन केले, तर ‘काव्यमैफील’ प्रा. डॉ. चंद्रकांत ऊर्फ राजू पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विजय बेळंके, बाळासाहेब बाबर, डी. बी. चिपरगे, अस्मिता इनामदार, डॉ. अनिता खेबुडकर, अभिजित पाटील, रमेश ढाले यांच्यासह कवींनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी) नोटाबंदी मूर्खपणा दुसऱ्या सत्रात ‘नोटाबंदी अर्थकारण की राजकारण’ या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, हे साहित्य संमेलन क्रांतिकारक आहे. सध्या नोटाबंदीमुळे देशात अर्थव्यवस्था गंभीर बनली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेविना शासनाने हे धोरण राबविल्यामुळे नोटाबंदीचा निर्णय मूर्खपणाचा आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘चिदंबरम्’ यांच्या बातमीचा आढावा वारंवार आपल्या मार्गदर्शनात त्यांनी केला.