शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महसूल उत्पादनात गावाचा मोठा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST

मोहन सातपुते लोकमत न्यूज नेटवर्क, उचगाव : कोल्हापूर शहरालगतच्या परिसरात नागरी वस्त्यांचे प्रमाण वाढत असून विविध कॉलनी आकारास येत ...

मोहन सातपुते

लोकमत न्यूज नेटवर्क, उचगाव :

कोल्हापूर शहरालगतच्या परिसरात नागरी वस्त्यांचे प्रमाण वाढत असून विविध कॉलनी आकारास येत आहेत. बहुसंख्य लोकसंख्येने विस्तारलेली गावे आता उपनगराच्या हद्दीशी जोडली जात आहेत. महसुली गावांना शहरांच्या सुखसुविधाची गरज निर्माण झाल्याने उपनगरात घरबांधणीचे प्रमाण वाढले आहे. अनेक गरजू नोकरदार, व्यावसायिक, कामगार यांनी शहराशेजारील गावामध्येच राहणे पंसत केल्याने गावच्या महसूलमध्ये वाढ होत आहे.

करवीर तालुक्यातील मोरेवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, उचगांव, मुडशिंगी, गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, कंदलगाव, कोगील खु., कोगील बु. , कणेरी, कणेरीवाडी, विकासवाडी, पाचगाव, दऱ्याचे वडगाव, कळंबा, बालिंगा, नागदेववाडी,व डणगे, शिंगणापूर, शिरोली, नागाव, हालसवडे, नेर्ली तामगाव, फुलेवाडी या शहराशेजारील उपनगर समजल्या जाणाऱ्या गावांचा वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या दहा वर्षांत चेहरामोहराच बदलून गेला आहे.

त्याबरोबर उपनगराशी संलग्न असलेल्या गावातील जमिनी घेतल्या जात आहेत. जमीन व प्लाट नियमानुसार आहे का? त्याला संबंधित नगररचना विभागाची (टीपी) व महसूल विभागाची, संबंधित ग्रामपंचायतीची बांधकाम, पर्यावरण विभागाची तसेच दस्त नोंदणीवर रितसर परवानगी आहे का? ही जमीन किंवा प्लाटला तहसीलदार बिगरशेती वा जिल्हाधिकारी बिगरशेती अकृषक परवानगी आहे का? अशा अनेक प्रश्नांची विचारणा सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. शहराशेजारील ९० टक्के जमीन ही महसूल विभागाच्या खत्यारित आहे. त्यावर महसूल निमावलीनुसार गाव नमुना नंबर, रजिस्टर क्रमांक १ ते २१ खतावणीप्रमाणे नोंदी असाव्या लागतात. त्यालाच पसंती मिळत आहे.

चौकसवृत्तीने काही ग्राहक बिंदू नियमावलीवर बोट ठेवत जमीन व प्लॅाट घेत असल्याने उपनगरातील गावांना आता महसूलबरोबर जमिनींना सोन्याचा भाव मिळत आहे.

चौकट:-

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र-४ साठी तीनवेळा जमीन संपादित झाली.

महामार्गाशेजारील पेट्रोल पंप, कॉलेज आदींसारख्या संस्थांनीही खासगी स्वरूपात जमिनी संपादित केल्या. गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, उचगाव, शिरोली, नागाव यासारख्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखलेसुद्धा मिळालेले नाहीत. त्यात एमआयडीसीनेही दाखले दिले नाहीत.

चौकट: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रकल्पग्रस्तांचे दाखलेच देता येणार नाही असे सांगितले आहे. त्यादृष्टीने आताच्या महाविकास आघाडी सरकारकडून ज्याच्या त्याच्या जमिनी गेल्या त्या संबंधित शेतकऱ्यांना दाखले मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.