शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महसूल उत्पादनात गावाचा मोठा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST

मोहन सातपुते लोकमत न्यूज नेटवर्क, उचगाव : कोल्हापूर शहरालगतच्या परिसरात नागरी वस्त्यांचे प्रमाण वाढत असून विविध कॉलनी आकारास येत ...

मोहन सातपुते

लोकमत न्यूज नेटवर्क, उचगाव :

कोल्हापूर शहरालगतच्या परिसरात नागरी वस्त्यांचे प्रमाण वाढत असून विविध कॉलनी आकारास येत आहेत. बहुसंख्य लोकसंख्येने विस्तारलेली गावे आता उपनगराच्या हद्दीशी जोडली जात आहेत. महसुली गावांना शहरांच्या सुखसुविधाची गरज निर्माण झाल्याने उपनगरात घरबांधणीचे प्रमाण वाढले आहे. अनेक गरजू नोकरदार, व्यावसायिक, कामगार यांनी शहराशेजारील गावामध्येच राहणे पंसत केल्याने गावच्या महसूलमध्ये वाढ होत आहे.

करवीर तालुक्यातील मोरेवाडी, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, उचगांव, मुडशिंगी, गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, कंदलगाव, कोगील खु., कोगील बु. , कणेरी, कणेरीवाडी, विकासवाडी, पाचगाव, दऱ्याचे वडगाव, कळंबा, बालिंगा, नागदेववाडी,व डणगे, शिंगणापूर, शिरोली, नागाव, हालसवडे, नेर्ली तामगाव, फुलेवाडी या शहराशेजारील उपनगर समजल्या जाणाऱ्या गावांचा वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या दहा वर्षांत चेहरामोहराच बदलून गेला आहे.

त्याबरोबर उपनगराशी संलग्न असलेल्या गावातील जमिनी घेतल्या जात आहेत. जमीन व प्लाट नियमानुसार आहे का? त्याला संबंधित नगररचना विभागाची (टीपी) व महसूल विभागाची, संबंधित ग्रामपंचायतीची बांधकाम, पर्यावरण विभागाची तसेच दस्त नोंदणीवर रितसर परवानगी आहे का? ही जमीन किंवा प्लाटला तहसीलदार बिगरशेती वा जिल्हाधिकारी बिगरशेती अकृषक परवानगी आहे का? अशा अनेक प्रश्नांची विचारणा सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. शहराशेजारील ९० टक्के जमीन ही महसूल विभागाच्या खत्यारित आहे. त्यावर महसूल निमावलीनुसार गाव नमुना नंबर, रजिस्टर क्रमांक १ ते २१ खतावणीप्रमाणे नोंदी असाव्या लागतात. त्यालाच पसंती मिळत आहे.

चौकसवृत्तीने काही ग्राहक बिंदू नियमावलीवर बोट ठेवत जमीन व प्लॅाट घेत असल्याने उपनगरातील गावांना आता महसूलबरोबर जमिनींना सोन्याचा भाव मिळत आहे.

चौकट:-

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र-४ साठी तीनवेळा जमीन संपादित झाली.

महामार्गाशेजारील पेट्रोल पंप, कॉलेज आदींसारख्या संस्थांनीही खासगी स्वरूपात जमिनी संपादित केल्या. गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, उचगाव, शिरोली, नागाव यासारख्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखलेसुद्धा मिळालेले नाहीत. त्यात एमआयडीसीनेही दाखले दिले नाहीत.

चौकट: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रकल्पग्रस्तांचे दाखलेच देता येणार नाही असे सांगितले आहे. त्यादृष्टीने आताच्या महाविकास आघाडी सरकारकडून ज्याच्या त्याच्या जमिनी गेल्या त्या संबंधित शेतकऱ्यांना दाखले मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.