शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास दुणावणारा विजय-जिल्हा परिषद विश्लेषण कागल

By admin | Updated: February 24, 2017 21:45 IST

‘भाजप’च्या पदरी निराशा : मंडलिक आणि घाटगे गटाला आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल

जहाँगीर शेख -- कागल  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत गतवेळचे सत्ताधारी मंडलिक-संजय घाटगे गट शिवसेना म्हणून एकदिलाने एकत्र येऊन लढत असताना पाच वर्षांपूर्वी शाहू आघाडीच्या माध्यमातून मुश्रीफ गटाबरोबर आघाडी करून निवडणुकीत उतरलेला राजे गट ‘भाजप’ म्हणून स्वतंत्र लढत होता. असे असताना तालुक्यात आ. हसन मुश्रीफ गटाने तीन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समितीच्या जागा जिंकत तालुक्याच्या राजकारणात प्रबळ असल्याचे सिद्ध करून दाखविले. यामुळे मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास दुणावणारा हा निकाल ठरला आहे.कागल पालिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुश्रीफ गटाने हा स्वबळावर दुसरा विजय संपादन केला आहे. विशेष बाब ही की, पाच वर्षांपूर्वी आ. मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी तालुक्यात एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नव्हता. त्या तुलनेत ही कामगिरी मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास वाढविणारी आहे. या निवडणुकीत समरजितसिंह घाटगेंनी सर्वांत जास्त आक्रमक प्रचार केला. नवा विचार मांडला. खरे तर प्रचाराचे रान त्यांनीच उठविले. असे असले तरी तालुक्यात भाजपच्या माध्यमातून राजे गटाची बांधणी करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. भविष्यात यशाची पायवाट तयार करणारी ही त्यांची निवडणूक आहे. संजय मंडलिक गटाने एक जिल्हा परिषद, चार पंचायत समितीच्या जागा जिंकल्या असल्या तरी वीरेंद्र मंडलिकांचा पराभव तोही १८० मतांनी झाला, ही सल या गटाला कायम राहील. तर संजय घाटगे गटाचे अमरीश घाटगे सहज विजयी झाले. ही या गटाला ताकद देणारी बाजू ठरणार आहे; पण पंचायत समितीची एकच जागा जिंकता आली. त्यामुळे संजय मंडलिक आणि संजय घाटगे गटाला आत्मपरीक्षण करायला लावणारा, आमदार हसन मुश्रीफ गटाला आत्मविश्वास देणारा, तर राजे गटाला स्वबळाच्या ‘नाऱ्याला’ बळ देणारा हा निकाल कागल तालुक्यात लागला आहे. यावरून कागलला ‘राजकीय विद्यापीठ’ का म्हणतात, हेच पुन्हा एकदा मतदारांनी स्पष्ट करून दाखविले आहे. राजे गट आणि तैनात फौज...राजे गटाचे कार्यकर्ते म्हणजे इंग्रजांच्या तैनाती फौजेसारखे आहेत, अशी टीका होत होती. नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगेंनी स्वबळावर निवडणुका लढवून तैनाती फौज ही संकल्पना मोडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ‘नाव राजे गटाचे पण मदत-पाठबळ दुसरीकडे’ देणाऱ्यांची ‘गोची’ झाली. या गटाने जर कोणाबरोबर युती केली असती तर एखाद दुसऱ्या जागी ‘कमळ’ फुललेही असते; पण गटाचे शुद्धीकरण झाले नसते.बहुरंगी लढतीचा फायदा-तोटातिसरा पर्याय देणाऱ्या भाजपमुळे शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचाही तोटा झाला आहे. तर तालुक्यात करणसिंह घाटगे (वंदूर) यांच्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचा हात व्होटिंग मशीनवर कायम राहिला. शिवसेनेला भूषण पाटील, बाबगोंडा पाटील यांची भूमिका महागात पडली. हीच स्थिती अमरीश घाटगेंच्या बाबतीत पैलवान रवींद्र पाटील यांनी केली. अशा या तिरंगी लढतीत मुश्रीफ गटाने बाजी मारली आहे.