शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास दुणावणारा विजय-जिल्हा परिषद विश्लेषण कागल

By admin | Updated: February 24, 2017 21:45 IST

‘भाजप’च्या पदरी निराशा : मंडलिक आणि घाटगे गटाला आत्मपरीक्षण करायला लावणारा निकाल

जहाँगीर शेख -- कागल  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत गतवेळचे सत्ताधारी मंडलिक-संजय घाटगे गट शिवसेना म्हणून एकदिलाने एकत्र येऊन लढत असताना पाच वर्षांपूर्वी शाहू आघाडीच्या माध्यमातून मुश्रीफ गटाबरोबर आघाडी करून निवडणुकीत उतरलेला राजे गट ‘भाजप’ म्हणून स्वतंत्र लढत होता. असे असताना तालुक्यात आ. हसन मुश्रीफ गटाने तीन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समितीच्या जागा जिंकत तालुक्याच्या राजकारणात प्रबळ असल्याचे सिद्ध करून दाखविले. यामुळे मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास दुणावणारा हा निकाल ठरला आहे.कागल पालिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुश्रीफ गटाने हा स्वबळावर दुसरा विजय संपादन केला आहे. विशेष बाब ही की, पाच वर्षांपूर्वी आ. मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी तालुक्यात एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नव्हता. त्या तुलनेत ही कामगिरी मुश्रीफ गटाचा आत्मविश्वास वाढविणारी आहे. या निवडणुकीत समरजितसिंह घाटगेंनी सर्वांत जास्त आक्रमक प्रचार केला. नवा विचार मांडला. खरे तर प्रचाराचे रान त्यांनीच उठविले. असे असले तरी तालुक्यात भाजपच्या माध्यमातून राजे गटाची बांधणी करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. भविष्यात यशाची पायवाट तयार करणारी ही त्यांची निवडणूक आहे. संजय मंडलिक गटाने एक जिल्हा परिषद, चार पंचायत समितीच्या जागा जिंकल्या असल्या तरी वीरेंद्र मंडलिकांचा पराभव तोही १८० मतांनी झाला, ही सल या गटाला कायम राहील. तर संजय घाटगे गटाचे अमरीश घाटगे सहज विजयी झाले. ही या गटाला ताकद देणारी बाजू ठरणार आहे; पण पंचायत समितीची एकच जागा जिंकता आली. त्यामुळे संजय मंडलिक आणि संजय घाटगे गटाला आत्मपरीक्षण करायला लावणारा, आमदार हसन मुश्रीफ गटाला आत्मविश्वास देणारा, तर राजे गटाला स्वबळाच्या ‘नाऱ्याला’ बळ देणारा हा निकाल कागल तालुक्यात लागला आहे. यावरून कागलला ‘राजकीय विद्यापीठ’ का म्हणतात, हेच पुन्हा एकदा मतदारांनी स्पष्ट करून दाखविले आहे. राजे गट आणि तैनात फौज...राजे गटाचे कार्यकर्ते म्हणजे इंग्रजांच्या तैनाती फौजेसारखे आहेत, अशी टीका होत होती. नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगेंनी स्वबळावर निवडणुका लढवून तैनाती फौज ही संकल्पना मोडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ‘नाव राजे गटाचे पण मदत-पाठबळ दुसरीकडे’ देणाऱ्यांची ‘गोची’ झाली. या गटाने जर कोणाबरोबर युती केली असती तर एखाद दुसऱ्या जागी ‘कमळ’ फुललेही असते; पण गटाचे शुद्धीकरण झाले नसते.बहुरंगी लढतीचा फायदा-तोटातिसरा पर्याय देणाऱ्या भाजपमुळे शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादीचाही तोटा झाला आहे. तर तालुक्यात करणसिंह घाटगे (वंदूर) यांच्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसचा हात व्होटिंग मशीनवर कायम राहिला. शिवसेनेला भूषण पाटील, बाबगोंडा पाटील यांची भूमिका महागात पडली. हीच स्थिती अमरीश घाटगेंच्या बाबतीत पैलवान रवींद्र पाटील यांनी केली. अशा या तिरंगी लढतीत मुश्रीफ गटाने बाजी मारली आहे.