शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

आगीमुळे जंगलातील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST

सदाशिव मोरे। आजरा : जंगलांना लावल्या जाणाऱ्या आगीमुळे आजरा तालुक्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वृक्षलागवडीप्रमाणे जंगलसंवर्धनाची गरज आहे. जंगलसंवर्धनासाठी ...

सदाशिव मोरे।

आजरा : जंगलांना लावल्या जाणाऱ्या आगीमुळे आजरा तालुक्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वृक्षलागवडीप्रमाणे जंगलसंवर्धनाची गरज आहे. जंगलसंवर्धनासाठी नागरिकांच्या प्रबोधनाचीही गरज आहे. जंगलातील आगीमुळे जंगली जनावरांचा चारा, पशू, पक्षी, प्राणी, कीटक व त्यांचा अधिवास होरपळून जात आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे व अतिसंवेदशील असणारे आजरा तालुक्यातील जंगल आगीमुळे नष्ट होत आहे.

वृक्षलागवडीबरोबर जंगलसंवर्धनाची लोकचळवळ उभी राहिली, तरच यापुढील काळात नागरिकांना मोकळा श्वास मिळणार आहे. जैवविविधता व निसर्गसौंदर्याने नटलेला आजरा तालुक्यातील परिसर आहे. भारतीय उपखंडात आढळणाऱ्या वनस्पतींपैकी ६९४ प्रजाती आजऱ्याच्या जंगलात सापडतात. सस्तन प्राण्यांच्या ४० पेक्षा जास्त प्रजाती व २,२२७ सपुष्प वनस्पतींच्या नोंदी आहेत. ६० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात.

हिरडा, ऐन, जांभूळ, दालचिनी, साग, आंबा, चंदन, सिसम, किंजळ, रानबाबूळ, खैर या वृक्षसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हत्ती, गवे, अस्वल, वाघ, बिबट्या, तरस, रानडुक्कर, कोल्हा यासारखे जंगली प्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत.

सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता व जंगलांना लावली जाणारी मानवनिर्मित आगीमुळे वनसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जंगलांचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन केले जात आहे. मात्र, आजरा तालुक्यातील १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील जैवविविधता मानवनिर्मित आगीत भस्मसात होत आहे, असे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या नागरिकांवर वन विभागांकडून कारवाईची गरज आहे.

फेब्रुवारी ते मेअखेर वन विभागाच्या प्रत्येक रेंजमध्ये कर्मचारी, वाढविणे, वनमित्रांची मदत घेऊन लागलेली आग तातडीने नियंत्रित आणणे, आग विझविण्यासाठी ब्लोअरचा वापर करणे, पाण्याच्या टँकरची उपलब्धता करणे गरजेचे आहे. आगीमुळे सरपटणारे प्राणी होरपळतात, तर काही प्राणी जायबंदी होऊन मृत्युमुखी पडतात. वणव्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते.

भविष्यकाळात मोकळा श्वास घेता यावा यासाठी जंगलसंवर्धनाची लोकचळवळ उभी करण्याची गरज आहे. आगीमुळे जंगलातील वृक्षसंपदेबरोबर खाजगी मालकीतील वृक्षसंपदाही नष्ट होत आहे.