शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वारणा नदी आमच्याच मालकीची

By admin | Updated: June 5, 2017 01:16 IST

वारणा नदी आमच्याच मालकीची

लोकमत न्यूज नेटवर्कदानोळी : वारणा नदी ही आमच्याच मालकीची असून, इचलकरंजीला पाण्याचा एकही थेंब न देण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. वारणा नदीकाठावरील प्रत्येक गावात बैठक घेऊन या योजनेचे गांभीर्य पटवून देणार आहे. असून, आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा वारणा कृती समितीने येथे दिला. आमदार सुरेश हाळवणकर यांनी गावातून नदी गेली म्हणजे मालक झाला काय या वक्तव्यास प्रत्युत्तर म्हणून रविवारी दानोळी येथे वारणा बचाव कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका जाहीर केली. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले, नदी काठावरील गावांनी गावठाणची जमीन आणि शेतकऱ्यांनी वडिलार्जित जमिनी देऊन धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे वारणा नदी आमच्याच मालकीची आहे. वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, ही योजना अनैसर्गिक असून, ती रद्द होईपर्यंत लढणार असून, त्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील वारणा नदीकाठावरील प्रत्येक गावात बैठक घेऊन या योजनेचे गांभीर्य पटवून देणार असून, आंदोलन आणखी तीव्र करणार आहे. याची सुरुवात आज, सोमवारपासून कोथळी, कवठेसार, हिंगणगाव, कुंभोज गावांत बैठकी घेणार आहे. सध्या शहरास पाणीपुरवठा होत असलेल्या पंचगंगा नदी आणि कृष्णा नदीस एकूण आठ नद्या मिळाल्या आहेत. अशा आठ नद्यांचे पाणी घेऊन सुद्धा थेट वारणेतून पाणी कशासाठी यासह सध्याची पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याचे सांगत असून, ती मुदतीपूर्व कालबाह्य झालीच कशी? यापूर्वी कालव्यामुळे फार मोठे नुकसान होणार असे सांगून कालवाही नको व वारणेचे पाणीही नको, अशी भूमिका इचलकरंजी शहराने घेतली होती. आता ते कोणत्या हक्काने पाणी मागतात, असे अनुत्तरित मुद्दे समितीचे उपाध्यक्ष केशव राऊत, बापूसो दळवी, मानाजी भोसले यांनी मांडले.दिवसाकाठी सोळा तासांचा पाणी उपसा परवाना आहे. पण, सध्या केवळ आठ तास वीज मिळते. भविष्यात महावितरणला अच्छे दिन आले तर सोळा तास पाणी उपसा करण्यात येईल. त्यावेळी आमच्या कोरड्या जमिनीस आम्हालाच पाणी दुसरीकडून आणावे लागेल, असे मत समितीने मांडले.बैठकीस उपसरपंच गब्रू गावडे, सुरेश कांबळे, संदीप हवालदार, सतीश मलमे, जंबू सकाप्पा, गुंडू दळवी, प्रवीण पवार, सुरेश माणगावे, उमेश केकले, सातगोंडा पाराज, अशोक आनंदा, धन्यकुमार भोसले, उदय होगले, रावसो खिचडे, प्रवीण पोवार, वसंत पिसे, अरुण होगले, दत्ता राजमाने, आदी उपस्थित होते.हाळवणकरांना राजकीय लाभमंत्री असताना प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहरास वारणेतून पाणी आणू असा विचार मांडला होता. पण, त्यावेळी हाळवणकरांनी काळम्मावाडीतून थेट पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता हाळवणकर आमदार असताना तेच पुन्हा वारणेतून पाणी नेण्यासाठी आक्रमक झाले आहेत. यावरून आमदार हाळवणकरांचे राजकीय लाभ दिसून येत आहेत.