शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

सरनोबत यांच्यामुळेच रखडले विविध प्रकल्प

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

सचिन चव्हाण : प्रशासनाविरुद्ध लढणार

कोल्हापूर : स्थायी समिती सभापतिपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत थेट पाईपलाईन, ‘केएमटी’ची १०४ नव्या बसेसची खरेदी, कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र, १५३ कर्मचाऱ्यांना कायम करणे, आदी योजना मार्गी लावल्याचे समाधान आहे. मात्र, एलईडी स्ट्रीट लाईटसह मल्टिलेव्हल कार पार्किंग, नवीन प्रशासकीय इमारत, रंकाळा संवर्धन, पर्यटन विकास हे विषय निव्वळ प्रशासकीय ढिलेपणामुळे मागे राहिले. या सर्वांसाठी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हेच जबाबदार आहेत, असा आरोप स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.सचिन चव्हाण यांचा स्थायी समिती सभापतीचा कार्यकाल ३१ डिसेंबरला संपला. नवीन सभापतीची निवड उद्या, शुक्रवारी होत आहे. तत्पूर्वी, चव्हाण यांनी एक वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. प्रशासकीय ढीलेपणामुळे अनेक प्रकल्प कागदावरच राहिल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.चव्हाण म्हणाले, ‘केएमटी’ वाचविण्यासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेच्या बजेटमधून दिले. १०४ बसेस आल्यानंतरही वडापवर ठोस कारवाईशिवाय ‘केएमटी’ला ऊर्जितावस्था अशक्य आहे. ‘केएमटी’ फायद्यात यावी, यासाठी यापुढेही प्रयत्न करणार आहे. रंकाळा तलाव संवर्धन, पर्यटन विकास, पार्किंग व्यवस्था, नवीन अद्यायावत शासकीय इमारत, आदी मोठे प्रकल्प नेत्रदीप सरनोबत यांच्या ढिसाळ कारभारामुळेच रेंगाळले आहेत. स्थायी सभापतिपदाच्या कारकिर्दीबाबत अत्यंत समाधानी असून भविष्यात पक्ष व नेते जी जबाबदारी देतील ती पूर्ण करू, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. (प्रतिनिधी)चार वर्षातील प्रकल्प सांगा अन् बक्षीस मिळवाअभियंता सरनोबत यांनी गेल्या चार वर्षांत मार्गी लावलेला एक प्रकल्प सांगा, अन् बक्षीस मिळवा, असे आवाहनही सचिन चव्हाण यांनी केले.