शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

जिल्हा परिषद सत्तेसाठी आता ‘भाजता’चा प्रयोग

By admin | Updated: January 6, 2017 00:19 IST

निवडणूक रणांगण : भाजप, जनसुराज्य, ताराराणीची परस्परपूरक भूमिका

समीर देशपांडे --कोल्हापूर -कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून आता कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजता’चा प्रयोग रंगणार आहे. चिन्हांचा गोंधळ आणि नंतरचा घोडेबाजार रोखण्यासाठी आतापासूनच एकमेकांना पूरक भूमिका घेत हा प्रयोग रंगणार आहे. त्यामुळेच भाजपमध्ये यायचे नसेल तर ‘ताराराणी आघाडी’ किंवा ‘जनसुराज्य’मध्ये जावा, असा उघड सल्ला दिला जात आहे.राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पद असणारे मंत्री पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी चांगले नियोजन लावले; परंतु ते थोडक्यात चुकले. शिवसेना सोबत असती तर आता महापालिकेवर युतीचा झेंडा फडकला असता. आता जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्यासाठी दादा आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीपासून बेरजेचे राजकारण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाडिक यांची ताराराणी आघाडी सोबत असतानाही विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ला सोबत घेण्यात दादांना यश आले. आजऱ्यातून अण्णा-भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी, गडहिंग्लजमधून डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, चंदगडमधून गोपाळराव पाटील, कागलमधून शाहू समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे, राधानगरीमधून जगदीश लिंग्रज, शिरोळमध्ये बहुजन विकास आघाडी, अशोक माने, हातकणंगलेमध्ये डॉ. अशोक चौगुले, गगनबावड्यात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे अशी अनेक मंडळी भाजपसमवेत आणली गेली आहेत. काहीजण प्रवेश मार्गात आहेत. हातकणंगले तालुक्यातील वजनदार नेते अरुण इंगवले याच आठवड्यात जाहीर प्रवेश करत आहेत. केवळ भाजप-भाजप म्हणत बसलो तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मर्यादा आहेत याची जाणीव दादांना आहे. अशात ग्रामीण भागात शिवसेनेचे पाच आमदार असले तरी सेना भाजपसोबत येईल असे सध्याचे चित्र नाही. म्हणूनच महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीला सोबत घेणे, ‘जनसुराज्य’ला साथीला घेणे अशा पद्धतीने दोन्ही काँग्रेसच्या विरोधात ताकद वाढविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्यांना भाजपमध्ये येण्यासाठी अडचण आहे, त्यांना ताराराणी आघाडी किंवा जनसुराज्यचा पर्याय दिला जात आहे. त्यातून दोन गोष्टी साध्य होणार आहेत. एकतर तालुक्या-तालुक्यांत अशा महाआघाड्या करून गोंधळ वाढवून घेण्यापेक्षा या स्थानिक आघाड्या ‘भाजता’पैकी कुणाकडेही विलीन करून मर्यादित चिन्हे घेता येतात तसेच नंतरचा घोडेबाजार रोखण्यासाठी चिन्हांवर झालेली निवड पूरक ठरू शकते. कोणत्याही परिस्थितीत ६७ पैकी महाआघाडी म्हणून ५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून सध्या नियोजन सुरू असून, त्याचाच भाग म्हणून तालुक्यात जाऊन मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे....म्हणूनच महाआघाडी ‘ताराराणी’मध्ये अण्णा-भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, सभापती विष्णुपंत केसरकर यांनी आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला सोबत घेऊन महाआघाडी केली होती. तिथे यश मिळाल्याने आता चराटी यांनी भाजपमध्ये यावे असा दबाव सुरू झाला; परंतु स्थानिक परिस्थिती पाहून चराटी थेट भाजपमध्ये सहभागी होणार नाहीत. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार भाजप नसेल तर मग जनसुराज्य किंवा ताराराणीचा पर्याय बघा, असे सांगितल्यानंतर ही आघाडी ‘ताराराणी’मध्ये विलीन करण्याचा निर्णय झाला.सुसूत्रता राखण्यासाठी पूरक भूमिकाप्रत्येक तालुक्यातील असंतुष्टांना एकत्र करून दोन्ही काँग्रेसविरोधात लढविण्याचा प्रयोग जरी यशस्वी झाला, तरी निवडणुकीनंतर अटीतटीच्या प्रसंगात माणसे ताब्यात ठेवणे अतिशय अवघड होते. त्यांना एकदा चिन्हाच्या कायदेशीर बंधनात अडकविले की मग विजयी सदस्य दुसरीकडे जाऊ शकत नाही, तसेच प्रचारासाठी, चिन्हासाठी समान पक्ष किंवा आघाडी सोयीची ठरते. याचा विचार करूनच एक तर भाजपमध्ये या, नाही तर ताराराणी, जनसुराज्यमध्ये जावा, अशी भूमिका घेतली जात आहे.