शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सत्तेसाठी आता ‘भाजता’चा प्रयोग

By admin | Updated: January 6, 2017 00:19 IST

निवडणूक रणांगण : भाजप, जनसुराज्य, ताराराणीची परस्परपूरक भूमिका

समीर देशपांडे --कोल्हापूर -कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून आता कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजता’चा प्रयोग रंगणार आहे. चिन्हांचा गोंधळ आणि नंतरचा घोडेबाजार रोखण्यासाठी आतापासूनच एकमेकांना पूरक भूमिका घेत हा प्रयोग रंगणार आहे. त्यामुळेच भाजपमध्ये यायचे नसेल तर ‘ताराराणी आघाडी’ किंवा ‘जनसुराज्य’मध्ये जावा, असा उघड सल्ला दिला जात आहे.राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पद असणारे मंत्री पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी चांगले नियोजन लावले; परंतु ते थोडक्यात चुकले. शिवसेना सोबत असती तर आता महापालिकेवर युतीचा झेंडा फडकला असता. आता जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्यासाठी दादा आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीपासून बेरजेचे राजकारण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाडिक यांची ताराराणी आघाडी सोबत असतानाही विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ला सोबत घेण्यात दादांना यश आले. आजऱ्यातून अण्णा-भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी, गडहिंग्लजमधून डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, चंदगडमधून गोपाळराव पाटील, कागलमधून शाहू समूहाचे नेते समरजितसिंह घाटगे, राधानगरीमधून जगदीश लिंग्रज, शिरोळमध्ये बहुजन विकास आघाडी, अशोक माने, हातकणंगलेमध्ये डॉ. अशोक चौगुले, गगनबावड्यात जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे अशी अनेक मंडळी भाजपसमवेत आणली गेली आहेत. काहीजण प्रवेश मार्गात आहेत. हातकणंगले तालुक्यातील वजनदार नेते अरुण इंगवले याच आठवड्यात जाहीर प्रवेश करत आहेत. केवळ भाजप-भाजप म्हणत बसलो तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मर्यादा आहेत याची जाणीव दादांना आहे. अशात ग्रामीण भागात शिवसेनेचे पाच आमदार असले तरी सेना भाजपसोबत येईल असे सध्याचे चित्र नाही. म्हणूनच महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीला सोबत घेणे, ‘जनसुराज्य’ला साथीला घेणे अशा पद्धतीने दोन्ही काँग्रेसच्या विरोधात ताकद वाढविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्यांना भाजपमध्ये येण्यासाठी अडचण आहे, त्यांना ताराराणी आघाडी किंवा जनसुराज्यचा पर्याय दिला जात आहे. त्यातून दोन गोष्टी साध्य होणार आहेत. एकतर तालुक्या-तालुक्यांत अशा महाआघाड्या करून गोंधळ वाढवून घेण्यापेक्षा या स्थानिक आघाड्या ‘भाजता’पैकी कुणाकडेही विलीन करून मर्यादित चिन्हे घेता येतात तसेच नंतरचा घोडेबाजार रोखण्यासाठी चिन्हांवर झालेली निवड पूरक ठरू शकते. कोणत्याही परिस्थितीत ६७ पैकी महाआघाडी म्हणून ५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून सध्या नियोजन सुरू असून, त्याचाच भाग म्हणून तालुक्यात जाऊन मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे....म्हणूनच महाआघाडी ‘ताराराणी’मध्ये अण्णा-भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी, ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे, सभापती विष्णुपंत केसरकर यांनी आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला सोबत घेऊन महाआघाडी केली होती. तिथे यश मिळाल्याने आता चराटी यांनी भाजपमध्ये यावे असा दबाव सुरू झाला; परंतु स्थानिक परिस्थिती पाहून चराटी थेट भाजपमध्ये सहभागी होणार नाहीत. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार भाजप नसेल तर मग जनसुराज्य किंवा ताराराणीचा पर्याय बघा, असे सांगितल्यानंतर ही आघाडी ‘ताराराणी’मध्ये विलीन करण्याचा निर्णय झाला.सुसूत्रता राखण्यासाठी पूरक भूमिकाप्रत्येक तालुक्यातील असंतुष्टांना एकत्र करून दोन्ही काँग्रेसविरोधात लढविण्याचा प्रयोग जरी यशस्वी झाला, तरी निवडणुकीनंतर अटीतटीच्या प्रसंगात माणसे ताब्यात ठेवणे अतिशय अवघड होते. त्यांना एकदा चिन्हाच्या कायदेशीर बंधनात अडकविले की मग विजयी सदस्य दुसरीकडे जाऊ शकत नाही, तसेच प्रचारासाठी, चिन्हासाठी समान पक्ष किंवा आघाडी सोयीची ठरते. याचा विचार करूनच एक तर भाजपमध्ये या, नाही तर ताराराणी, जनसुराज्यमध्ये जावा, अशी भूमिका घेतली जात आहे.