शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
2
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
3
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
4
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
6
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
7
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
8
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
9
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
10
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
11
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
12
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
13
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
14
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
15
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
16
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
17
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
18
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
19
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
20
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार

मुख्यालयात अद्ययावत ‘सायबर लॅब’

By admin | Updated: August 17, 2016 00:05 IST

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : ६६ लाख रुपये खर्चून यंत्रणा

कोल्हापूर : आजच्या स्वातंत्र्यदिनी राज्यात ४४ ठिकाणी सायबर लॅब सुरू होत असून, अनेक सायबर गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगारांना जरब बसेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी (दि. १५) व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ६६ लाख रुपये खर्च करून पोलिस मुख्यालयात कार्यान्वित केलेल्या अद्ययावत सायबर लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हास्तरावर अद्ययावत सायबर लॅब कार्यान्वित झाल्याने अनेक सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस आणणे शक्य होणार असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, वाढत्या सायबर गुन्हेगारीला लगाम घालण्याचे काम सायबर लॅबद्वारे होईल. सायबर लॅबच्या माध्यमातून हार्ड डिस्क फॉरेन्सिक त्याचप्रमाणे मोबाईल फॉरेन्सिक तपास सहज शक्य होणार आहे. जिल्हा स्तरावर सायबर लॅब ही काळाची गरज असून यापुढील काळात हा उपक्रम अधिक प्रभावी आणि परिणामकारकपणे राबवावा. पोलिस दलाची संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच त्यांना अत्याधुनिक सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासही राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत तीन कोटी रुपये खर्चून सायबर लॅब उभारण्यात आल्या आहेत. सायबर लॅब प्रकल्पाबरोबरच सायबर गुन्ह्यांविषयी लोकांना विशेषत: शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.’ पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गडहिंग्लजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी आभार मानले. समारंभास वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यालयात अद्ययावत ‘सायबर लॅब’पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : ६६ लाख रुपये खर्चून यंत्रणाकोल्हापूर : आजच्या स्वातंत्र्यदिनी राज्यात ४४ ठिकाणी सायबर लॅब सुरू होत असून, अनेक सायबर गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगारांना जरब बसेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी (दि. १५) व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ६६ लाख रुपये खर्च करून पोलिस मुख्यालयात कार्यान्वित केलेल्या अद्ययावत सायबर लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हास्तरावर अद्ययावत सायबर लॅब कार्यान्वित झाल्याने अनेक सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस आणणे शक्य होणार असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, वाढत्या सायबर गुन्हेगारीला लगाम घालण्याचे काम सायबर लॅबद्वारे होईल. सायबर लॅबच्या माध्यमातून हार्ड डिस्क फॉरेन्सिक त्याचप्रमाणे मोबाईल फॉरेन्सिक तपास सहज शक्य होणार आहे. जिल्हा स्तरावर सायबर लॅब ही काळाची गरज असून यापुढील काळात हा उपक्रम अधिक प्रभावी आणि परिणामकारकपणे राबवावा. पोलिस दलाची संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच त्यांना अत्याधुनिक सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासही राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत तीन कोटी रुपये खर्चून सायबर लॅब उभारण्यात आल्या आहेत. सायबर लॅब प्रकल्पाबरोबरच सायबर गुन्ह्यांविषयी लोकांना विशेषत: शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.’ पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गडहिंग्लजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी आभार मानले. समारंभास वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)