शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
4
राहुल गांधींना वाचन करण्याचा आदेश कसा द्यायचा? सावरकरांवरील याचिका हायकोर्टाने फेटाळली
5
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
6
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
7
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
8
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
9
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
10
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
11
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
12
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
13
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
14
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
15
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
16
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
17
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
18
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
19
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
20
Manglagauri 2025 Date: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..

इचलकरंजी वस्त्रोद्योगात अस्वस्थता

By admin | Updated: September 20, 2014 00:09 IST

कापड बाजारातील आर्थिक टंचाई : दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट

राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील यंत्रमाग उत्पादित कापडाचे घसरलेले भाव आणि कापड बाजारात निर्माण झालेली आर्थिक टंचाई यामुळे येथील वस्त्रोद्योगात अस्वस्थता पसरली आहे. आगामी दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट पडल्याने यंत्रमागधारक व कापड व्यापारी वर्ग हवालदिल झाले आहेत.गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून कापडाला चांगली मागणी आली आणि साध्या यंत्रमागापासून सेमी आॅटो व आॅटो लूमच्या उद्योजकांच्या कापडाला उत्तम दर मिळाला. जॉब वर्क (मजुरी) करणाऱ्या आॅटो यंत्रमागधारकांनाही प्रतीमीटर १६ ते १७ पैसे मजुरी मिळाली; पण मार्च २०१४ नंतर सेमी आॅटो व आॅटो लूम कारखानदारांचा पुन्हा जॉब रेट उतरला. त्याही परिस्थितीत काहीसा परवडणारा जॉब रेट मिळत असल्याने चार-पाच महिने आॅटो लूमचे कारखाने चालू राहिले.आॅटोलूमधारकांना पूर्वी प्रती वार्षिक सरासरी १६ ते १७ पैसे मीटरमागे मजुरी मिळत असे; पण यंदा मजुरीची सरासरी १३ ते १४ पैसेच राहिली आहे. त्यातच सध्या कापडाची मागणी एकदमच कमी झाली आणि जॉब रेट उतरला. सिमको लूमसाठी १३ ते १५ पैसे, रूटी-सीला ११ ते १३ पैसे, रॅपिअर लूमकरिता १० ते १३ पैसे व एअरजेट लूमसाठी १२ ते १४ पैसे प्रती मीटर मजुरी मिळत आहे. त्यामुळेच या लूमधारकांना दरररोज नुकसान सोसावे लागत आहे. शहर व परिसरात असलेल्या आॅटोलूमधारकांना दररोज पाच लाख रुपयांचा फटका बसत असल्याने खळबळ माजली आहे.दसरा-दिवाळीच्या हंगामातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असली, तरी निवडणुकीचा फारसा परिणाम कापड बाजारावर होणार नाही. कापड उद्योगातील बड्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील पैसा ‘रियल इस्टेट’कडे वळविला आहे. परपेठांमध्ये विकलेल्या कापडाचे पैसे (पेमेंट) उशिराने मिळत आहे. हा कालावधी वाढत जाऊन ऐन दिवाळीत आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. दसरा-दिवाळी सणामध्ये कामगारांना देण्यासाठी आणि घर खर्चाकरिता यंत्रमागधारक व कापड व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. मात्र, सध्या असलेल्या आर्थिक टंचाईने वस्त्रोद्योगामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर वस्त्रोद्योगामध्ये सुद्धा ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा उद्योजक व व्यापाऱ्यांना वाटत होती. तीन महिने होत आल,े तरी कापड बाजारातील परिस्थिती सुधारण्याऐवजी आर्थिक मंदी आल्याने उद्योजक, व्यापारी, व्याव्यावसायिक हवालदिल झाले आहेत.वस्त्रोद्योगात अस्वस्थताकापड बाजारातील आर्थिक टंचाई : दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावटराजाराम पाटील ल्ल इचलकरंजीयेथील यंत्रमाग उत्पादित कापडाचे घसरलेले भाव आणि कापड बाजारात निर्माण झालेली आर्थिक टंचाई यामुळे येथील वस्त्रोद्योगात अस्वस्थता पसरली आहे. आगामी दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट पडल्याने यंत्रमागधारक व कापड व्यापारी वर्ग हवालदिल झाले आहेत.गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून कापडाला चांगली मागणी आली आणि साध्या यंत्रमागापासून सेमी आॅटो व आॅटो लूमच्या उद्योजकांच्या कापडाला उत्तम दर मिळाला. जॉब वर्क (मजुरी) करणाऱ्या आॅटो यंत्रमागधारकांनाही प्रतीमीटर १६ ते १७ पैसे मजुरी मिळाली; पण मार्च २०१४ नंतर सेमी आॅटो व आॅटो लूम कारखानदारांचा पुन्हा जॉब रेट उतरला. त्याही परिस्थितीत काहीसा परवडणारा जॉब रेट मिळत असल्याने चार-पाच महिने आॅटो लूमचे कारखाने चालू राहिले.आॅटोलूमधारकांना पूर्वी प्रती वार्षिक सरासरी १६ ते १७ पैसे मीटरमागे मजुरी मिळत असे; पण यंदा मजुरीची सरासरी १३ ते १४ पैसेच राहिली आहे. त्यातच सध्या कापडाची मागणी एकदमच कमी झाली आणि जॉब रेट उतरला. सिमको लूमसाठी १३ ते १५ पैसे, रूटी-सीला ११ ते १३ पैसे, रॅपिअर लूमकरिता १० ते १३ पैसे व एअरजेट लूमसाठी १२ ते १४ पैसे प्रती मीटर मजुरी मिळत आहे. त्यामुळेच या लूमधारकांना दरररोज नुकसान सोसावे लागत आहे. शहर व परिसरात असलेल्या आॅटोलूमधारकांना दररोज पाच लाख रुपयांचा फटका बसत असल्याने खळबळ माजली आहे.दसरा-दिवाळीच्या हंगामातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असली, तरी निवडणुकीचा फारसा परिणाम कापड बाजारावर होणार नाही. कापड उद्योगातील बड्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील पैसा ‘रियल इस्टेट’कडे वळविला आहे. परपेठांमध्ये विकलेल्या कापडाचे पैसे (पेमेंट) उशिराने मिळत आहे. हा कालावधी वाढत जाऊन ऐन दिवाळीत आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. दसरा-दिवाळी सणामध्ये कामगारांना देण्यासाठी आणि घर खर्चाकरिता यंत्रमागधारक व कापड व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. मात्र, सध्या असलेल्या आर्थिक टंचाईने वस्त्रोद्योगामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर वस्त्रोद्योगामध्ये सुद्धा ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा उद्योजक व व्यापाऱ्यांना वाटत होती. तीन महिने होत आल,े तरी कापड बाजारातील परिस्थिती सुधारण्याऐवजी आर्थिक मंदी आल्याने उद्योजक, व्यापारी, व्याव्यावसायिक हवालदिल झाले आहेत.