शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

आरक्षण प्रक्रिया चुकीची झाल्याची सार्वत्रिक तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:20 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याची सार्वत्रिक तक्रार होत आहेे. त्यामुळे ही प्रक्रिया ...

कोल्हापूर : महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याची सार्वत्रिक तक्रार होत आहेे. त्यामुळे ही प्रक्रिया वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी नागरिकांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले, परंतु अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरे देण्याचे टाळले. मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन झालेल्या सर्व प्रक्रियेची लेखी माहिती देण्याची मागणी केली.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, आशिष कपडेकर यांनी प्रशासक बलकवडे यांची भेट घेऊन चुकीची पद्धत राबविली गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. लेखी माहितीची मागणी त्यांनी केली.

सोमवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या प्रारुप प्रभाग रचना सादरीकरण व प्रभाग आरक्षण सोडत यावर अनेक शंका घेत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला होता. पण ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्ही हरकती घ्या, आम्ही सुनावणी घेऊन त्यावर मार्ग काढू अशा पध्दतीने उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी चर्चा टाळली होती. परंतु उपस्थित असलेल्या नागरिकांचे त्यामुळे समाधान झालेले नाही.

प्रारुप प्रभाग रचना करताना २०११ ची लोकसंख्या गृहित धरण्यात आली असल्याचे सांगितले. तसे असेल तर लोकसंख्या वाढण्याचे काहीच कारण नाही आणि प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करताना प्रगणक गट बदलण्याचेही काही कारण नव्हते. एक प्रगणक गट साधारण ५०० ते ५५० लोकसंख्येचा असतो. प्रारुप तयार करताना प्रगणक गट फोडता येत नाहीत असे सांगितले गेले. तसेच फार मोठी प्रभाग रचना बदललेली नाही असेही सांगितले गेले. परंतु एक प्रगणक गट बदलला तर २०० ते २२५ मतांचा फरक पडतो. त्यामुळे करण्यात आलेले बदल महापालिकेच्या दृष्टीने मोठेच आहेत.

सोमवारी उलट सुलट प्रश्नांची सरबती सुरू झाल्यावर अधिकाऱ्यांकडून विसंगत उत्तरे यायला लागली. प्रारुप प्रभाग रचना करत असताना मधले प्रभाग फोडता येत नाहीत असे काही जाणकारांनी लक्षात आणून देताच उपायुक्त निखिल मोरे यांनी सर्व प्रभागात बदल करण्यात आल्याचे सांगितले. प्रशासक बलकवडे यांनी तसे झाले नाही म्हणून सांगितले.

अनुसुचित जातीचे आरक्षण निश्चित करताना लोकसंख्येची अट ग्राह्य मानली जाते याकडे लक्ष वेधले असताना राज्य निवडणुक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी लोकसंख्या नाही तर त्याची टक्केवारी विचारात घेतली जाते असे सांगितले. कोणत्या प्रभागात बदल केले आहेत अशी विचारणा केली तेंव्हा एकाही अधिकाऱ्यांने माहिती दिली नाही. प्रभागाचे सादरीकरण करण्यात आले आहे, ते पाहून तुम्हीच उत्तर शोधा असा पर्याय अधिकाऱ्यांनी सांगितला. त्यामुळे नागरीकांच्या मनात शंकाचे काहूर अधिकच निर्माण झाले.

प्रभाग कसे तयार केले?

- शहराची लोकसंख्या पाच लाख ४९ हजार २३६

- या लोकसंख्येला ८१ प्रभागाने भागले

- तेंव्हा एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी ६७८१ इतकी आली.

- प्रभाग लोकसंख्या निश्चित झाल्यावर १० टक्के कमी जास्त करण्याची मुभा.