शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

आरक्षण प्रक्रिया चुकीची झाल्याची सार्वत्रिक तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:20 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याची सार्वत्रिक तक्रार होत आहेे. त्यामुळे ही प्रक्रिया ...

कोल्हापूर : महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याची सार्वत्रिक तक्रार होत आहेे. त्यामुळे ही प्रक्रिया वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी नागरिकांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले, परंतु अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरे देण्याचे टाळले. मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन झालेल्या सर्व प्रक्रियेची लेखी माहिती देण्याची मागणी केली.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, आशिष कपडेकर यांनी प्रशासक बलकवडे यांची भेट घेऊन चुकीची पद्धत राबविली गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. लेखी माहितीची मागणी त्यांनी केली.

सोमवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या प्रारुप प्रभाग रचना सादरीकरण व प्रभाग आरक्षण सोडत यावर अनेक शंका घेत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला होता. पण ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्ही हरकती घ्या, आम्ही सुनावणी घेऊन त्यावर मार्ग काढू अशा पध्दतीने उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी चर्चा टाळली होती. परंतु उपस्थित असलेल्या नागरिकांचे त्यामुळे समाधान झालेले नाही.

प्रारुप प्रभाग रचना करताना २०११ ची लोकसंख्या गृहित धरण्यात आली असल्याचे सांगितले. तसे असेल तर लोकसंख्या वाढण्याचे काहीच कारण नाही आणि प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करताना प्रगणक गट बदलण्याचेही काही कारण नव्हते. एक प्रगणक गट साधारण ५०० ते ५५० लोकसंख्येचा असतो. प्रारुप तयार करताना प्रगणक गट फोडता येत नाहीत असे सांगितले गेले. तसेच फार मोठी प्रभाग रचना बदललेली नाही असेही सांगितले गेले. परंतु एक प्रगणक गट बदलला तर २०० ते २२५ मतांचा फरक पडतो. त्यामुळे करण्यात आलेले बदल महापालिकेच्या दृष्टीने मोठेच आहेत.

सोमवारी उलट सुलट प्रश्नांची सरबती सुरू झाल्यावर अधिकाऱ्यांकडून विसंगत उत्तरे यायला लागली. प्रारुप प्रभाग रचना करत असताना मधले प्रभाग फोडता येत नाहीत असे काही जाणकारांनी लक्षात आणून देताच उपायुक्त निखिल मोरे यांनी सर्व प्रभागात बदल करण्यात आल्याचे सांगितले. प्रशासक बलकवडे यांनी तसे झाले नाही म्हणून सांगितले.

अनुसुचित जातीचे आरक्षण निश्चित करताना लोकसंख्येची अट ग्राह्य मानली जाते याकडे लक्ष वेधले असताना राज्य निवडणुक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी लोकसंख्या नाही तर त्याची टक्केवारी विचारात घेतली जाते असे सांगितले. कोणत्या प्रभागात बदल केले आहेत अशी विचारणा केली तेंव्हा एकाही अधिकाऱ्यांने माहिती दिली नाही. प्रभागाचे सादरीकरण करण्यात आले आहे, ते पाहून तुम्हीच उत्तर शोधा असा पर्याय अधिकाऱ्यांनी सांगितला. त्यामुळे नागरीकांच्या मनात शंकाचे काहूर अधिकच निर्माण झाले.

प्रभाग कसे तयार केले?

- शहराची लोकसंख्या पाच लाख ४९ हजार २३६

- या लोकसंख्येला ८१ प्रभागाने भागले

- तेंव्हा एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी ६७८१ इतकी आली.

- प्रभाग लोकसंख्या निश्चित झाल्यावर १० टक्के कमी जास्त करण्याची मुभा.