शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आरक्षण प्रक्रिया चुकीची झाल्याची सार्वत्रिक तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:20 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याची सार्वत्रिक तक्रार होत आहेे. त्यामुळे ही प्रक्रिया ...

कोल्हापूर : महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याची सार्वत्रिक तक्रार होत आहेे. त्यामुळे ही प्रक्रिया वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी नागरिकांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले, परंतु अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरे देण्याचे टाळले. मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन झालेल्या सर्व प्रक्रियेची लेखी माहिती देण्याची मागणी केली.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, आशिष कपडेकर यांनी प्रशासक बलकवडे यांची भेट घेऊन चुकीची पद्धत राबविली गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. लेखी माहितीची मागणी त्यांनी केली.

सोमवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या प्रारुप प्रभाग रचना सादरीकरण व प्रभाग आरक्षण सोडत यावर अनेक शंका घेत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला होता. पण ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्ही हरकती घ्या, आम्ही सुनावणी घेऊन त्यावर मार्ग काढू अशा पध्दतीने उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी चर्चा टाळली होती. परंतु उपस्थित असलेल्या नागरिकांचे त्यामुळे समाधान झालेले नाही.

प्रारुप प्रभाग रचना करताना २०११ ची लोकसंख्या गृहित धरण्यात आली असल्याचे सांगितले. तसे असेल तर लोकसंख्या वाढण्याचे काहीच कारण नाही आणि प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करताना प्रगणक गट बदलण्याचेही काही कारण नव्हते. एक प्रगणक गट साधारण ५०० ते ५५० लोकसंख्येचा असतो. प्रारुप तयार करताना प्रगणक गट फोडता येत नाहीत असे सांगितले गेले. तसेच फार मोठी प्रभाग रचना बदललेली नाही असेही सांगितले गेले. परंतु एक प्रगणक गट बदलला तर २०० ते २२५ मतांचा फरक पडतो. त्यामुळे करण्यात आलेले बदल महापालिकेच्या दृष्टीने मोठेच आहेत.

सोमवारी उलट सुलट प्रश्नांची सरबती सुरू झाल्यावर अधिकाऱ्यांकडून विसंगत उत्तरे यायला लागली. प्रारुप प्रभाग रचना करत असताना मधले प्रभाग फोडता येत नाहीत असे काही जाणकारांनी लक्षात आणून देताच उपायुक्त निखिल मोरे यांनी सर्व प्रभागात बदल करण्यात आल्याचे सांगितले. प्रशासक बलकवडे यांनी तसे झाले नाही म्हणून सांगितले.

अनुसुचित जातीचे आरक्षण निश्चित करताना लोकसंख्येची अट ग्राह्य मानली जाते याकडे लक्ष वेधले असताना राज्य निवडणुक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी लोकसंख्या नाही तर त्याची टक्केवारी विचारात घेतली जाते असे सांगितले. कोणत्या प्रभागात बदल केले आहेत अशी विचारणा केली तेंव्हा एकाही अधिकाऱ्यांने माहिती दिली नाही. प्रभागाचे सादरीकरण करण्यात आले आहे, ते पाहून तुम्हीच उत्तर शोधा असा पर्याय अधिकाऱ्यांनी सांगितला. त्यामुळे नागरीकांच्या मनात शंकाचे काहूर अधिकच निर्माण झाले.

प्रभाग कसे तयार केले?

- शहराची लोकसंख्या पाच लाख ४९ हजार २३६

- या लोकसंख्येला ८१ प्रभागाने भागले

- तेंव्हा एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी ६७८१ इतकी आली.

- प्रभाग लोकसंख्या निश्चित झाल्यावर १० टक्के कमी जास्त करण्याची मुभा.