शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

नेत्यांची एकवाक्यता, सूक्ष्म नियोजनामुळेच विरोधी आघाडीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST

(सतेज पाटील यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या लढाईत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने देदीप्यमान विजय ...

(सतेज पाटील यांचा फोटो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या लढाईत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने देदीप्यमान विजय मिळविला. त्यामागे अनेक राजकीय कंगोरे असले, तरी नेत्यांमधील एकवाक्यता, सूक्ष्म नियोजन व त्यानुसार झपाटल्यासारखी पळालेली यंत्रणा हेच खरे कारण आहे. सर्वच नेत्यांची यंत्रणा ताकदीने प्रचारात काम करत असली तरी विशेषकरून पालकमंत्री सतेज पाटील यांची सहाशे जणांची टीम एकसंधपणे राबली. गेल्या दीड वर्षापासून ठरावधारकांची ओळख करून घेतल्यापासून ते मतदान केंद्रावर येईपर्यंत या टीमने काम केल्याचे फलित म्हणजे हा विजय आहे.

कोणत्याही लढाईची तयारी ही अगोदरच करावी लागते. केवळ तयारी करून उपयोग नाही, तर विरोधकांचे डावपेच, त्यावर प्रतिडाव करण्यासाठी राबणारी यंत्रणा उभी करून त्याची अंमलबजावणीही तितकीच नियोजनबद्ध झाली तरच शंभर टक्के यश मिळते. ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुसऱ्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीची तयारी केली. पाच वर्षे सत्तारूढ गटाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला सत्तारूढ गटाला मल्टीस्टेट, दूध दरवाढ व टँकर वाहतुकीसह इतर मुद्द्यांवर जखडून ठेवले होते. दुसऱ्या बाजूला सत्तारूढ गटातील नाराज मोहऱ्यांना आपल्या छावणीत आणण्याची व्यूहरचना आखली आणि त्यात यशस्वी झाले. डिसेंबर २०१९ ला ‘गोकुळ’साठी ठराव करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याअगोदर सहा महिने संबंधित दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्कात मंत्री सतेज पाटील यांची यंत्रणा होती. प्रत्येक तालुक्यात एक जबाबदार व्यक्ती व त्याला ताकद देणारी यंत्रणा उभी केली. गेली दोन वर्षे सहाशे जणांची टीम काम करीत होती.

याउलट, विरोधी आघाडीतील राबणाऱ्या व्यक्तींमध्ये ताळमेळ दिसत नव्हता. पॅनेलपेक्षा व्यक्तिगत मतासाठी बहुतांशी जणांनी ताकद लावल्याने सांघिक काम दिसले नाही. त्याचा फटका नवीन व कमी संपर्क असलेल्या उमेदवारांना बसला.

हे केले टीमने

ठरावधारक कोण, तो कोणाशी संबंधित ही यादी करायची

त्याला आपल्याकडे वळण्यासाठी कोणाचे वजन वापरावे

अशाप्रकाणे ठरावधारकांची कुंडली तयार केली.

पॅनेल बांधणीपूर्वी प्रत्येक तालुक्यातील नेत्यांशी, प्रत्येक ठरावधारकाच्या नावावर चर्चा.

तो कोणाकडे राहील, कोणाचे ऐकेल याची नेत्यांकडून खातरजमा

ठरावधारकाच्या पहिल्या भेटीपासून संपर्कात असणाऱ्या व्यक्तीवरच मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी