शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

नेत्यांची एकवाक्यता, सूक्ष्म नियोजनामुळेच विरोधी आघाडीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST

(सतेज पाटील यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या लढाईत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने देदीप्यमान विजय ...

(सतेज पाटील यांचा फोटो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या लढाईत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने देदीप्यमान विजय मिळविला. त्यामागे अनेक राजकीय कंगोरे असले, तरी नेत्यांमधील एकवाक्यता, सूक्ष्म नियोजन व त्यानुसार झपाटल्यासारखी पळालेली यंत्रणा हेच खरे कारण आहे. सर्वच नेत्यांची यंत्रणा ताकदीने प्रचारात काम करत असली तरी विशेषकरून पालकमंत्री सतेज पाटील यांची सहाशे जणांची टीम एकसंधपणे राबली. गेल्या दीड वर्षापासून ठरावधारकांची ओळख करून घेतल्यापासून ते मतदान केंद्रावर येईपर्यंत या टीमने काम केल्याचे फलित म्हणजे हा विजय आहे.

कोणत्याही लढाईची तयारी ही अगोदरच करावी लागते. केवळ तयारी करून उपयोग नाही, तर विरोधकांचे डावपेच, त्यावर प्रतिडाव करण्यासाठी राबणारी यंत्रणा उभी करून त्याची अंमलबजावणीही तितकीच नियोजनबद्ध झाली तरच शंभर टक्के यश मिळते. ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुसऱ्या दिवसापासून पुढच्या निवडणुकीची तयारी केली. पाच वर्षे सत्तारूढ गटाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला सत्तारूढ गटाला मल्टीस्टेट, दूध दरवाढ व टँकर वाहतुकीसह इतर मुद्द्यांवर जखडून ठेवले होते. दुसऱ्या बाजूला सत्तारूढ गटातील नाराज मोहऱ्यांना आपल्या छावणीत आणण्याची व्यूहरचना आखली आणि त्यात यशस्वी झाले. डिसेंबर २०१९ ला ‘गोकुळ’साठी ठराव करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याअगोदर सहा महिने संबंधित दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्कात मंत्री सतेज पाटील यांची यंत्रणा होती. प्रत्येक तालुक्यात एक जबाबदार व्यक्ती व त्याला ताकद देणारी यंत्रणा उभी केली. गेली दोन वर्षे सहाशे जणांची टीम काम करीत होती.

याउलट, विरोधी आघाडीतील राबणाऱ्या व्यक्तींमध्ये ताळमेळ दिसत नव्हता. पॅनेलपेक्षा व्यक्तिगत मतासाठी बहुतांशी जणांनी ताकद लावल्याने सांघिक काम दिसले नाही. त्याचा फटका नवीन व कमी संपर्क असलेल्या उमेदवारांना बसला.

हे केले टीमने

ठरावधारक कोण, तो कोणाशी संबंधित ही यादी करायची

त्याला आपल्याकडे वळण्यासाठी कोणाचे वजन वापरावे

अशाप्रकाणे ठरावधारकांची कुंडली तयार केली.

पॅनेल बांधणीपूर्वी प्रत्येक तालुक्यातील नेत्यांशी, प्रत्येक ठरावधारकाच्या नावावर चर्चा.

तो कोणाकडे राहील, कोणाचे ऐकेल याची नेत्यांकडून खातरजमा

ठरावधारकाच्या पहिल्या भेटीपासून संपर्कात असणाऱ्या व्यक्तीवरच मतदान केंद्रापर्यंत आणण्याची जबाबदारी