शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

युनिक फार्मर आयडी; कोल्हापूर जिल्ह्यातील पावणेचार लाख शेतकरी झाले डिजिटल

By राजाराम लोंढे | Updated: April 12, 2025 15:57 IST

‘ॲग्रिस्टॅक’ची ७८ टक्के नोंदणी : शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास सुलभ

राजाराम लोंढेकोल्हापूर : शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला ‘ॲग्रिस्टॅक’ योजनेच्या माध्यमातून युनिक फार्मर आयडी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल ३ लाख ७६ हजार ९९२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, हे शेतकरी आता डिजिटल झाले आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७८ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, त्यांना शासकीय लाभ मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहोचविण्यासाठी ॲग्रिस्टॅक ही संकल्पना आणली आहे. शेतकऱ्याची स्वत:ची सगळी माहिती एकत्रित उपलब्ध होणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा वेगळा आधार आयडी (क्रमांक) आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक "युनिक फार्मर आयडी" तयार केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "ॲग्रिस्टॅक" योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या युनिक फार्मर आयडी आणि त्यांच्या लँड रेकॉर्डला जोडण्याची (लिंक करण्याची) मोहीम सुरू केली.विशेष बाब म्हणजे भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ याच "युनिक फार्मर आयडी"च्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी ही भविष्यात हे युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे.फार्मर आयडीमुळे हे मिळणार..

  • पीएम किसान सन्मान योजनेचे अनुदान मिळविणे
  • किसान क्रेडिट कार्ड बनविणे
  • पीक विमा काढणे, त्या अंतर्गत परतावा मिळविणे यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक.
  • सरकारने जाहीर केलेली पिकांची नुकसानभरपाई मिळविणे.
  • पीक व शेती विषयक सर्वेक्षण करून घेणे.

‘ॲग्रिस्टॅक’मुळे ही माहिती मिळणार..सरकारलाही या युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याची कुठे किती जमीन आहे. कोणता शेतकरी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत आहे. चालू हंगामात राज्यातील किती शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले आहे, याची माहिती एका क्लिक वर मिळणार आहे.

काय आहे ॲग्रिस्टॅक?ॲग्रिस्टॅक ही एक डिजिटल पायाभूत सुविधा आहे, जी सरकारद्वारे विकसित केली जात आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची माहिती आणि शेतजमिनीची नोंदणी करणे, तसेच कृषी क्षेत्रातील विविध भागधारकांना एकत्र आणणे आहे. या माध्यमातून शेतीशी संबंधित सेवा अधिक सोप्या आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

ॲग्रिस्टॅक योजनेचे फायदे :पारदर्शकता : शेतकऱ्यांच्या माहितीचा डेटाबेस तयार झाल्याने कृषी क्षेत्रातील गैरव्यवहार कमी होतील.सोयीसुविधा : शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि इतर सेवेची माहिती सहज मिळेल.डिजिटल शेती : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल.शेतीचा विकास : शेती क्षेत्राचा विकास आणि उत्पादकता वाढेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी