शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सीमा भागातील बस वाहतूक पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:22 IST

कोल्हापूर : सीमाभागाचा वाद पुन्हा उफळून आल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून एसटी महामंडळाची महाराष्ट्र-कर्नाटक ही बससेवा बंद करण्यात आली होती. ...

कोल्हापूर : सीमाभागाचा वाद पुन्हा उफळून आल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून एसटी महामंडळाची महाराष्ट्र-कर्नाटक ही बससेवा बंद करण्यात आली होती. ही बससेवा गुरुवारी दुपारपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ७ बसेस बेळगावकडे सोडण्यात आल्या. तर आज, शुक्रवारपासूनही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

सीमा भागात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या बेळगाव जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसेसवर स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली. त्यानंतर सीमावाद पुन्हा उफाळला. शनिवारी (दि. १३) कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर-स्वारगेट (पुणे) या मार्गावर धावणारी एसटी बस फलाटवर उभी होती. त्यावर एका कन्नडीगाने दगडफेक केली. त्यामुळे शनिवारपासून कोल्हापूर, बेळगावकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या. या मार्गावर १५ बसेसद्वारे ८० फेऱ्या या मार्गावर होत असत. मात्र, त्या सहा दिवसांपासून बंद झाल्यामुळे सुमारे ४२ लाखांचे नुकसान झाले आहे. याशिवाय हजारो प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागला. त्यातून अनेकांच्या खिशाला अर्थिक चाट लागला तो वेगळाच. त्यामुळे ही सेवा पूर्ववत होणे सीमाभागातील प्रवाशांकरिता गरजेचे होते. सेवा सुरू झाल्याबद्दल या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

स्थानकासह परिसरातील व्यवसायावर परिणाम

गेले काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे कोल्हापुरातून सातारा, पुणे, औरंगाबाद,नागपूर, मुंबई या शहरांमध्ये जाणाऱ्या बसेसवर परिणाम झाला आहे. या जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या भाविक प्रवाशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकासह परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, हाॅटेल व अन्य व्यवसायावर परिणाम झाला आहे.

त्यात गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापुरातून कर्नाटककडे जाणाऱ्या राज्य शासनाच्या एसटी बसेसची सेवाही बंद झाल्यामुळे या व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला. आता शुक्रवारपासून ही सेवा पूर्ववत होणार असल्यामुळे या विक्रेत्यांनाही काही अशी दिलासा मिळाला आहे.