शहरं
Join us  
Trending Stories
1
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
2
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
3
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटमधील 'डॉन'चा विक्रम मोडला
4
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
5
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
6
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
7
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
8
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
10
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
11
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
12
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
13
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
14
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
15
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
16
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
17
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
18
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
19
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
20
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?

बिनविरोध निवडणूक गरजेची

By admin | Updated: June 10, 2016 00:17 IST

जयसिंगपूर बाजार समिती : १९ जागांसाठी १५३ अर्ज; १३ जूनला छाननी

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडित असलेली जयसिंंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक समस्यांतून जात आहे़ शासन स्तरावर बाजार समितीबाबत उदासीनता आहे़ शिवाय निवडणुकीचा खर्च अशा सर्व बाबींचा विचार करता आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लावण्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध करण्याची गरज आहे़जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ३ जुलैला पंचवार्षिक निवडणूक होत आहे़ एकूण १९ जागांसाठी तब्बल १५३ अर्ज दाखल झाले़ इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्यामागे राजकीय प्रतिष्ठेचेच कारण पुढे आले आहे़ गत निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी झाली होती़ यामध्ये सर्व जागा जिंकून दिवंगत आमदार सा़ रे़ पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली होती़ शासनाच्या धोरणामुळे गेल्या पाच वर्षांतील बाजार समितीचा कारभार पाहता बाजार समितीच्या माध्यमातून म्हणावा तितका मोठा विकास झाला नसल्याचेच दिसून येते़ निवडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या परीने बाजार समितीचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे़ बाजार समिती सध्या अनेक अडचणींतून जात आहे़ शिवाय शासन पातळीवर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना दिसत नाहीत़ अशा कठीण परिस्थितीतून जात असलेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मात्र राजकीय ईर्ष्या लागली आहे़बाजार समितीचा जुना इतिहास पाहता त्यावेळी राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात ईर्ष्या असायची़ आर्थिक अडचणीतून जात असलेल्या बाजार समितीची सध्या निवडणूक लागली, तर सुमारे ८ ते १० लाख रुपये खर्च निवडणुकीवर अपेक्षित आहे़ अशा परिस्थितीत शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार उल्हास पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याची गरज आहे़ निवडणूक बिनविरोध झाली, तर खर्च वाचणार आहे़ यामुळे सर्वच थरांतील नव्या चेहऱ्यांना संधी देऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे़ राजकीय पक्षांनी एकत्र यावे : गतवैभव हवेसध्या होऊ घातलेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपमधील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ सर्व राजकीय पक्षांनी समविचाराने एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करून या संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज बनली आहे़