शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
3
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
4
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
5
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
6
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
7
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
10
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
11
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
12
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
13
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
14
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
15
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
16
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
17
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
18
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
19
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...

बिनविरोध निवडणूक गरजेची

By admin | Updated: June 10, 2016 00:17 IST

जयसिंगपूर बाजार समिती : १९ जागांसाठी १५३ अर्ज; १३ जूनला छाननी

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडित असलेली जयसिंंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक समस्यांतून जात आहे़ शासन स्तरावर बाजार समितीबाबत उदासीनता आहे़ शिवाय निवडणुकीचा खर्च अशा सर्व बाबींचा विचार करता आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लावण्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध करण्याची गरज आहे़जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ३ जुलैला पंचवार्षिक निवडणूक होत आहे़ एकूण १९ जागांसाठी तब्बल १५३ अर्ज दाखल झाले़ इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्यामागे राजकीय प्रतिष्ठेचेच कारण पुढे आले आहे़ गत निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी झाली होती़ यामध्ये सर्व जागा जिंकून दिवंगत आमदार सा़ रे़ पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली होती़ शासनाच्या धोरणामुळे गेल्या पाच वर्षांतील बाजार समितीचा कारभार पाहता बाजार समितीच्या माध्यमातून म्हणावा तितका मोठा विकास झाला नसल्याचेच दिसून येते़ निवडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या परीने बाजार समितीचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे़ बाजार समिती सध्या अनेक अडचणींतून जात आहे़ शिवाय शासन पातळीवर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना दिसत नाहीत़ अशा कठीण परिस्थितीतून जात असलेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मात्र राजकीय ईर्ष्या लागली आहे़बाजार समितीचा जुना इतिहास पाहता त्यावेळी राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात ईर्ष्या असायची़ आर्थिक अडचणीतून जात असलेल्या बाजार समितीची सध्या निवडणूक लागली, तर सुमारे ८ ते १० लाख रुपये खर्च निवडणुकीवर अपेक्षित आहे़ अशा परिस्थितीत शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार उल्हास पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याची गरज आहे़ निवडणूक बिनविरोध झाली, तर खर्च वाचणार आहे़ यामुळे सर्वच थरांतील नव्या चेहऱ्यांना संधी देऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे़ राजकीय पक्षांनी एकत्र यावे : गतवैभव हवेसध्या होऊ घातलेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपमधील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ सर्व राजकीय पक्षांनी समविचाराने एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करून या संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज बनली आहे़