शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उदगावला स्वतंत्र बसस्थानकाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST

शुभम गायकवाड उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) हे गाव सांगली-कोल्हापूर महामार्गालगत आहे. गावची लोकसंख्या २२ हजार असून शासकीय कर्मचारी, ...

शुभम गायकवाड

उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) हे गाव सांगली-कोल्हापूर महामार्गालगत आहे. गावची लोकसंख्या २२ हजार असून शासकीय कर्मचारी, खासगी कामगार, विद्यार्थी व इतर वाहतूक असल्याने कायमस्वरूपी गजबजलेली परिस्थिती असलेले बसस्थानक आहे. नेहमीचा रहदारीचा रस्ता असल्याने कित्येकदा या मार्गावर अपघात झाले आहेत. त्यामुळे गावासाठी स्वतंत्र बसस्थानक असावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सध्याचे बसस्थानक हे अगदीच तोकडे असून बसथांब्यासाठी खास अशी जागा नाही. गेली २० वर्षे ते धूळ खात पडले होते. २०१५ मध्ये ड्रीम फौंडेशनच्या माध्यमातून त्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु बस तसेच इतर खासगी वाहने मुख्य रस्त्यावरच उभी असतात. तेथूनच प्रवाशांची चढउतार असते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखी स्थिती आहे. स्वतंत्र बसस्थानकाला मुख्य रस्त्यावरच हनुमान पाणीपुरवठ्यासमोर मोठी जागा उपलब्ध आहे. तिथे बसस्थानक झाल्यास कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज, सांगली येथून येणाऱ्या बसेससाठी थांबा मिळेल. त्यामुळे उदगावला सगळ्या बसेसचा थांबा असावा, ही मागणी आपोआपच पूर्ण होणार आहे.

चौकट -लांब पल्ल्याच्या बसेसचा नेहमीच अन्याय

उदगाव येथे एकही लांब पल्ल्याची बस थांबत नाही. तसेच सांगली, कोल्हापूरला जाणाऱ्या लाल फलक असलेल्या बसेसही थांबत नाहीत. त्या प्रश्नावर तीन ते चार वेळा रास्ता रोको, आंदोलने झाली आहेत. प्रशासनाने लेखी पत्र देऊनही गाड्या थांबत नसल्याने उदगाव थांबा नेहमीच वादात राहिला आहे.

...............

कोट - उदगावला स्वतंत्र बसस्थानक व्हावे यासाठी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना भेटून मागणी करणार आहोत. पाणीपुरवठासमोर बसस्थानक झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवाशी, वाहतूकधारकांना शिस्त लागणार आहे.

- सागर कदम, संस्थापक ड्रीम फौंडेशन

फोटो - ०६१२२०२०-जेएवाय-०२

फोटो ओळ - मुख्य रस्त्यावरच प्रवाशांची चढ-उतार असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात उदगाव-कोल्हापूर मुख्य रस्त्यालगत उपलब्ध असणारी जागा.