शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

उद्धव-चंद्रकांतदादांमध्ये घडला शब्दांविना संवाद

By admin | Updated: March 4, 2017 00:58 IST

दुरावा कायम : बेळगावमध्ये नजरानजर

कोल्हापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूरचा मुक्काम रद्द करून मुंबईला जाण्यासाठी बेळगावला निघाले. तेथून ते विमानाने मुंबईला जाणार होते. गाड्या सुसाट बेळगावच्या विमानतळावर आल्या. गाडीतून उद्धव ठाकरे खाली उतरले तर समोर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. ‘कसं काय, कुठून आलात.’ बाकी चर्चा न करता ठाकरे विमानतळावर गेले आणि चंद्रकांतदादा कोल्हापूरकडे येण्यासाठी रवाना झाले. दोघांमधील ‘शब्दां’विना संवादाची चर्चा शुक्रवारी कोल्हापुरात सुरू होती. ठाकरे गुरुवारी विवाह समारंभासाठी आले होते. ते मुक्कामही करणार होते. मात्र, नियोजनात बदल होऊन त्यांनी रात्रीच मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे कोल्हापूरला उतरलेले विमानही बेळगावला गेले होते. विवाह समारंभानंतर ठाकरे थेट बेळगावला जायला निघाले. गाड्या बेळगाव विमानतळावर येताच अचानक समोर चंद्रकांतदादा पाटील दिसले. मात्र, एकमेकांची मिनिटभर चौकशी करून ठाकरे आत गेले तर पाटील बाहेर पडले.इकडे शुक्रवारी दिवसभर ठाकरे यांनी चंद्रकांतदादांना टाळल्याची चर्चा सुरू झाली. मुंबई महापालिकेच्या सत्तेचा तिढा सुटला नसताना या दोघांमध्ये कोल्हापूरमध्ये काही चर्चा होईल असे वाटत असतानाच ठाकरे यांचा मुक्काम रद्द झाल्याने ‘भेट झाली मात्र चर्चा नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली. भाजप-सेना युती २०० टक्के होणारबेळगाव विमानतळावर शुक्रवारी रात्री उद्धव आणि आमची भेट झाली. अतिशय चांगल्या वातावरणात आम्ही एकमेकांची चौकशी केली. मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांनी मला टाळल्याच्या चर्चेत काही तथ्य नाही. इतकेच नव्हे तर मुंबईत भाजप-शिवसेनेची २०० टक्के युती होणार याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला.