शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा दुदैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शाळा बंद असल्यामुळे निखिल हा बेकिनकेरे येथील मामाच्या घरी राहण्यास आला होता. मंगळवारी सकाळी ...

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शाळा बंद असल्यामुळे निखिल हा बेकिनकेरे येथील मामाच्या घरी राहण्यास आला होता. मंगळवारी सकाळी लोकेश व निखिल अन्य एका मित्राला घेऊन घराच्या पाठीमागे असलेल्या शिवारात खेळण्यासाठी गेले होते. ८ ते १० वर्षे वयोगटातील या मुलांपैकी लोकेश व निखिल खेळता खेळता पाय घसरून नजीकच्या विहिरीमध्ये पडले. त्यावेळी आसपास कोणीही नसल्यामुळे ही घटना समजण्यास उशीर झाला. मुले घरी न परतल्यामुळे शोध घेतला असता विहिरीत मृतदेह आढळले. या दुर्घटनेतून तिसरा मुलगा सुदैवाने बचावला.

विहिरीत मुले पडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सीपीआय राघवेंद्र हल्लुर पीएसआय ए. वाय. अविनाश, शिवानंद कौजलगी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत लोकेश पाटील यांच्या पश्चात आई -वडील, बहीण, आजी व काका-काकू तर निखिल बोंद्रे त्याच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

या शाळकरी मुलांच्या मृत्यूमुळे बेकिनकेरे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, बेकिनकेरे शिवार परिसरात अशा जवळपास १०-१५ धोकादायक विहिरी वापराविना तशाच पडून आहेत. कठडा नसलेल्या जमिनीलगत असणाऱ्या या विहिरी पाहणाऱ्यांच्या सहसा निदर्शनास येत नाहीत. परिणामी रात्रीच्या वेळी तर या विहिरी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. संबंधित विहिरी तत्काळ बुजवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

फोटो मयत मुलं 1. लोकेश पाटील 2.निखिल बोन्द्रे