शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

दिवसातून दोनच फेऱ्या; केवळ दोनशेची कमाई...

By admin | Updated: December 5, 2014 00:46 IST

मालवाहतूक अडचणीत : खानावळी, टी-स्टॉलचा व्यवसाय घटला

संतोष मिठारी - कोल्हापूर -महागलेले डिझेल, वाढलेल्या स्पर्धेमुळे घाईला आलेले मालवाहतूक करणारे अ‍ॅपे, टाटाएस आणि पिकअप, आदी वाहनधारक औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे अधिकच अडचणीत आले आहेत. दिवसभर स्टॉपवर थांबल्यानंतर कशातरी दोन फेऱ्या त्यांना मिळत आहेत. तसेच कामगार, ट्रकचालक यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खानावळी, टी-स्टॉलचा व्यवसाय घटला असून, त्यांची वसाहतींमधील संख्यादेखील बोटांवर मोजण्याइतकी राहिली आहे.शहरातील शिवाजी उद्यमनगरमधील उद्योगांना जागा अपुरी पडू लागल्याने पहिल्यांदा शिरोली आणि त्यानंतर गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित, जयसिंगपूर, आदी औद्योगिक वसाहतींचा विस्तार वाढला. छोट्या-मोठ्या उद्योग व कारखान्यांच्या माध्यमातून गेल्या आठ ते नऊ वर्षांत या वसाहतींचा व्याप वाढला. त्यावर औद्योगिक वसाहतींमध्ये मालवाहतूक करणे, खानावळी, टी-स्टॉल, आदी छोटे व्यवसाय सुरू झाले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तसेच फारसे बौद्धिक श्रम करावे लागत नसल्याने आठवी, दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, मध्येच शिक्षण सोडलेल्या मुलांनी मालवाहतुकीच्या व्यवसायाचा पर्याय निवडला. हे काम ते टेम्पो, अ‍ॅपे या वाहनांच्या माध्यमातून करू लागले. या व्यवसायात चांगले पैसे मिळत असल्याने २००५ पासून अ‍ॅपे, टाटाएस, पिकअप अशा वाहनधारकांची संख्या वाढत गेली. बँका, फायनान्स कंपन्यांकडून पैसे घेऊन अनेकांनी गाड्या घेतल्या. साहजिकच स्पर्धा वाढली; शिवाय त्यातच डिझेल, आॅईल महागले आणि आता मंदीची स्थिती सुरू झाली. सध्या पाच औद्योगिक वसाहतींमध्ये मालवाहतूक करणाऱ्या सुमारे आठशेंहून अधिक गाड्या आहेत. नऊ वर्षांपूर्वी दिवसाकाठी ६०० ते ७०० रुपयांची कमाई करणाऱ्या या वाहनधारकांना आता दिवसातून कशाबशा दोन फेऱ्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांची दिवसाची कमाई ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आली असून बँका, फायनान्स एजन्सी, आदींचे हप्ते भागविताना त्यांची कसरत सुरू आहे. व्यवसाय कमी असल्याने हप्ते वेळेवर भरता येत नाहीत. त्यामुळे काहींना तर कर्जाची मुद्दल लांबच; पण व्याज आणि दंडाची रक्कम भरताना नाकीनऊ आले आहेत. ‘कॉस्ट कटिंग’मुळे कंपन्यादेखील भाडे देताना ‘बार्गेनिंग’ करीत असून किमान व्याज, गाडीचा हप्ता जावा यासाठी कमी भाडे घेऊन व्यवसाय केला जात आहे. कामगार, ट्रकचालक यांच्या जेवण, नाष्ट्यासाठी असलेल्या खानावळी, टी-स्टॉल, नाष्टा सेंटर चालविणाऱ्यांचीदेखील स्थिती बिघडली आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये पावलोपावली असलेली त्यांची संख्या आता बोटांवर मोजण्याइतकी राहिली आहे.विमा, पासिंग नाहीचव्यवसायच नसल्याने अनेक रिक्षाचालकांनी आपल्या गाड्यांचे विमा, पासिंगदेखील केलेले नाही. कारण, दिवसभराच्या कमाईतून घरखर्च, डिझेल आणि बँकेच्या हप्त्यांसाठी पैसे बाजूला काढताना त्यांना कसरत करावी लागत आहे.५गेल्या चार-पाच वर्षांत गाड्याची संख्या वर्षागणिक वाढत गेल्याने व्यवसायात स्पर्धा वाढली. त्यात डिझेल,आॅईलच्या दरवाढीची भर पडली आणि त्याला मंदीचीही जोड मिळाली. मंदीची तीव्रता वाढली आहे. दिवाळीनंतर चित्र बदलेल असे वाटत होते. मात्र, त्याउलट स्थिती असून व्यवसाय थंडच आहे. - सुभाष पाटील(अध्यक्ष, शिवप्रतिष्ठान वाहतूक संघटना)सकाळी नऊला स्टॉपवर आलो की, सायंकाळी सातपर्यंत दोन ते तीनच फेऱ्या मिळतात. त्यातही ग्राहकाकडून भाडे कमी केले जात आहे. बँकेचे हप्ते, घरखर्च डोळ्यांसमोर येत असल्याने येईल ते, मिळेल त्याप्रमाणे भाडे घेऊन व्यवसाय करावा लागत आहे. मंदीच्या स्थितीमुळे स्थिती बिकट बनली आहे. - सचिन संकपाळ (रिक्षाचालक)