शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

दिवसातून दोनच फेऱ्या; केवळ दोनशेची कमाई...

By admin | Updated: December 5, 2014 00:46 IST

मालवाहतूक अडचणीत : खानावळी, टी-स्टॉलचा व्यवसाय घटला

संतोष मिठारी - कोल्हापूर -महागलेले डिझेल, वाढलेल्या स्पर्धेमुळे घाईला आलेले मालवाहतूक करणारे अ‍ॅपे, टाटाएस आणि पिकअप, आदी वाहनधारक औद्योगिक क्षेत्रातील मंदीमुळे अधिकच अडचणीत आले आहेत. दिवसभर स्टॉपवर थांबल्यानंतर कशातरी दोन फेऱ्या त्यांना मिळत आहेत. तसेच कामगार, ट्रकचालक यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या खानावळी, टी-स्टॉलचा व्यवसाय घटला असून, त्यांची वसाहतींमधील संख्यादेखील बोटांवर मोजण्याइतकी राहिली आहे.शहरातील शिवाजी उद्यमनगरमधील उद्योगांना जागा अपुरी पडू लागल्याने पहिल्यांदा शिरोली आणि त्यानंतर गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित, जयसिंगपूर, आदी औद्योगिक वसाहतींचा विस्तार वाढला. छोट्या-मोठ्या उद्योग व कारखान्यांच्या माध्यमातून गेल्या आठ ते नऊ वर्षांत या वसाहतींचा व्याप वाढला. त्यावर औद्योगिक वसाहतींमध्ये मालवाहतूक करणे, खानावळी, टी-स्टॉल, आदी छोटे व्यवसाय सुरू झाले. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तसेच फारसे बौद्धिक श्रम करावे लागत नसल्याने आठवी, दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या, मध्येच शिक्षण सोडलेल्या मुलांनी मालवाहतुकीच्या व्यवसायाचा पर्याय निवडला. हे काम ते टेम्पो, अ‍ॅपे या वाहनांच्या माध्यमातून करू लागले. या व्यवसायात चांगले पैसे मिळत असल्याने २००५ पासून अ‍ॅपे, टाटाएस, पिकअप अशा वाहनधारकांची संख्या वाढत गेली. बँका, फायनान्स कंपन्यांकडून पैसे घेऊन अनेकांनी गाड्या घेतल्या. साहजिकच स्पर्धा वाढली; शिवाय त्यातच डिझेल, आॅईल महागले आणि आता मंदीची स्थिती सुरू झाली. सध्या पाच औद्योगिक वसाहतींमध्ये मालवाहतूक करणाऱ्या सुमारे आठशेंहून अधिक गाड्या आहेत. नऊ वर्षांपूर्वी दिवसाकाठी ६०० ते ७०० रुपयांची कमाई करणाऱ्या या वाहनधारकांना आता दिवसातून कशाबशा दोन फेऱ्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांची दिवसाची कमाई ३०० ते ४०० रुपयांपर्यंत आली असून बँका, फायनान्स एजन्सी, आदींचे हप्ते भागविताना त्यांची कसरत सुरू आहे. व्यवसाय कमी असल्याने हप्ते वेळेवर भरता येत नाहीत. त्यामुळे काहींना तर कर्जाची मुद्दल लांबच; पण व्याज आणि दंडाची रक्कम भरताना नाकीनऊ आले आहेत. ‘कॉस्ट कटिंग’मुळे कंपन्यादेखील भाडे देताना ‘बार्गेनिंग’ करीत असून किमान व्याज, गाडीचा हप्ता जावा यासाठी कमी भाडे घेऊन व्यवसाय केला जात आहे. कामगार, ट्रकचालक यांच्या जेवण, नाष्ट्यासाठी असलेल्या खानावळी, टी-स्टॉल, नाष्टा सेंटर चालविणाऱ्यांचीदेखील स्थिती बिघडली आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये पावलोपावली असलेली त्यांची संख्या आता बोटांवर मोजण्याइतकी राहिली आहे.विमा, पासिंग नाहीचव्यवसायच नसल्याने अनेक रिक्षाचालकांनी आपल्या गाड्यांचे विमा, पासिंगदेखील केलेले नाही. कारण, दिवसभराच्या कमाईतून घरखर्च, डिझेल आणि बँकेच्या हप्त्यांसाठी पैसे बाजूला काढताना त्यांना कसरत करावी लागत आहे.५गेल्या चार-पाच वर्षांत गाड्याची संख्या वर्षागणिक वाढत गेल्याने व्यवसायात स्पर्धा वाढली. त्यात डिझेल,आॅईलच्या दरवाढीची भर पडली आणि त्याला मंदीचीही जोड मिळाली. मंदीची तीव्रता वाढली आहे. दिवाळीनंतर चित्र बदलेल असे वाटत होते. मात्र, त्याउलट स्थिती असून व्यवसाय थंडच आहे. - सुभाष पाटील(अध्यक्ष, शिवप्रतिष्ठान वाहतूक संघटना)सकाळी नऊला स्टॉपवर आलो की, सायंकाळी सातपर्यंत दोन ते तीनच फेऱ्या मिळतात. त्यातही ग्राहकाकडून भाडे कमी केले जात आहे. बँकेचे हप्ते, घरखर्च डोळ्यांसमोर येत असल्याने येईल ते, मिळेल त्याप्रमाणे भाडे घेऊन व्यवसाय करावा लागत आहे. मंदीच्या स्थितीमुळे स्थिती बिकट बनली आहे. - सचिन संकपाळ (रिक्षाचालक)