शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

खंडाळा तालुक्यात वीज कोसळून दोन शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:19 IST

शिरवळ (जि. सातारा) : कवठे (ता. खंडाळा) येथील वेताळाचा माळ नावाच्या शिवारात रविवारी दुपारी झोपडीवर वीज कोसळून दोन शेतकरी ...

शिरवळ (जि. सातारा) : कवठे (ता. खंडाळा) येथील वेताळाचा माळ नावाच्या शिवारात रविवारी दुपारी झोपडीवर वीज कोसळून दोन शेतकरी जागीच ठार झाले आहे. शशिकांत दादासाहेब लिमन (वय ३५, रा. झगलवाडी, ता. खंडाळा) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (६०, रा. कवठे, ता. खंडाळा) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे झगलवाडीसह कवठे गावावर शोककळा पसरली आहे.

रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शशिकांत लिमन, खाशाबा जाधव हे भुईमुगाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. दुपारी एकच्या दरम्यान शेतामधील झोपडीवजा खोपीमध्ये शशिकांत लिमन व खाशाबा जाधव हे जेवणाकरिता बसले होते. याचवेळी खाशाबा जाधव यांची पत्नी व मुलगा हे दोघे झोपडीच्या बाजूला बसले होते. यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडात होत पाऊस सुरू झाला. दरम्यान, १.३० वाजण्याच्या दरम्यान अचानकपणे विजांचा मोठा आवाज होत विजांचा लोळ जेवणाकरिता बसलेल्या शशिकांत लिमन व खाशाबा जाधव यांच्या झोपडीवर पडला. यात शशिकांत लिमन व खाशाबा जाधव दोघेही ठार झाले.

--------------------------

साताऱ्याला वळवाने पाऊण तास झोडपले...

सातारा : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वळवाचा पाऊस होत असून, रविवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहर आणि परिसराला झोडपले. जवळपास पाऊण तास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस पडत होता. या पावसामुळे शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता. तसेच पाऊस झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

--------------------------

कोल्हापुरात हलक्या सरी

कोल्हापूर : दिवसभराच्या कडक उष्णतेच्या झळा आणि घामांच्या धारांवर रविवारी चारनंतर आलेल्या वादळी पावसाच्या हलक्या सरींनी गारव्याची फुंकर घातली. ढगांच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने कुठे तुरळक, तर कुठे काहीशा जोरदार सरींचा वर्षाव झाला.

--------------------------

सांगली जिल्ह्यात वळवाच्या पावसाने पुन्हा हानी

सांगली : जिल्ह्यात शनिवारी व रविवारी वळीव पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी शेतीचे, विजेच्या तारांचे नुकसान झाले आहे.

मिरज पूर्व भागात शनिवारी रात्री पाऊस झाला. वादळी वाऱ्याने विजेची तार पत्र्यावर पडल्याने शेडमधील शेळी ठार झाली. विजयनगर येथील केळीच्या बागा, द्राक्षबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी पुन्हा शिराळा तालुक्यातील चरण, चांदोली परिसरात, तसेच वाळवा तालुक्यातील पेठ येथे पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गेला आठवडाभर वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस, तसेच गारपीटही होत आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारीही जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगांची दाटी होती.