शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोघा भाऊंची यारी... ‘साहेबांना’ भारी!

By admin | Updated: August 10, 2015 01:00 IST

शिराळा बाजार समिती : ‘दोघे एकत्र, तिसऱ्याचा पाडाव’ समीकरणावर शिक्कामोर्तब

विकास शहा -शिराळा -शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाने माजी आमदार मानसिंगराव नाईक व कॉँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख या दोन भाऊंची आघाडी विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या भाजपला भारी ठरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मतदारसंघात असो की तालुक्यात, कोणतेही दोन राजकीय गट एकत्र आले की, एकाचा पाडाव नक्की, हे सिद्ध झाले आहे. आता या यशामुळे दोन भाऊंनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्रित लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता भाजप विरुद्ध दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीची गाडी धावणार आहे.विधानसभा निवडणुकीत २००९ मध्ये दोन कॉँग्रेसची म्हणजे दोन भाऊंची एकी होती. त्यावेळी शिवाजीराव नाईक यांचा मानसिंगराव नाईक यांनी पराभव केला होता. मात्र २०१४ मध्ये तिन्ही गट वेगवेगळे लढले. यामध्ये मात्र शिवाजीराव नाईक यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर ही आजची बाजार समितीची पहिली निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले होते. अगोदर ही बाजार समिती इस्लामपूरशी संलग्न होती. २००९ मध्ये विभाजन होऊन ही बाजार समिती अस्तित्वात आली. यानंतर पहिली निवडणूक बिनविरोध होऊन कॉँग्रेस आघाडीचीच सत्ता आली. त्यानंतर ही पहिली निवडणूक होती.बाजार समितीची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ही निवडणूक बिनविरोधसाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले. भाजपला दोन जागा देण्याचा प्रस्ताव दोन्ही गटाकडून संमतही झाला. मात्र या दोन जागा कोणत्या, यावर चर्चा फिसकटली. माजी आमदार मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी) गटाला ११, सत्यजित देशमुख गटाला (काँग्रेस) ८ जागा अशी आघाडी झाली, तर आमदार शिवाजीराव नाईक गटाने १९ जागांसाठी ११ उमेदवार उभे केले. त्यामुळे आघाडीचे ८ उमेदवार विजयी होणार हे नक्की होते. सत्ताही आघाडीचीच येणार हेही निश्चित झाले होते.दोन कॉँग्रेसने तसेच भाजपने जोरदार प्रचार केला. प्रत्यक्ष भेटीवर जोर दिला. त्यामुळे ही निवडणूक पक्षाच्या व राजकीय गटांच्या अस्तित्वाची लढाई ठरली होती. कॉँग्रेसने पुढील पाच वर्षात व्यापारवाढ, शीतगृह उभारणी, गोदाम उभारणी, विविध प्रकल्प उभारणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपनेही विकासाचा जाहीरनामा प्रसिध्द केला. या निवडणूक प्रचारात एकमेकांच्या सहकारी संस्थांवर टीका करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मतदार ३१२८ असले तरी, विविध गटातून एकाच व्यक्तीस दोन-तीन विभागात मतदान करण्याचा हक्क आहे. त्यामुळे मतदानात १२९ अवैध मतदान झाले. कॉँग्रेस आघाडीस ४६५१, तर भाजपला २१७० म्हणजे कॉँग्रेस आघाडीला ६८ टक्के, तर भाजपला ३२ टक्के मते मिळाली.विधानसभा निवडणुकीत पक्षीय धोरणामुळे आम्हाला स्वतंत्र लढावे लागले, असे देशमुख यांनी सांगितले. मात्र आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही भाऊ एकत्रित उतरणार आहेत. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा आदेशही देण्यात आला. त्यामुळे विद्यमान आमदार नाईक यांना म्हणजेच भाजपला रोखण्याची तयारी आतापासूनच कॉँग्रेस आघाडीने सुरू केली आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुखही कोकरूड येथे मुक्कामी आहेत. त्यामुळे पुढील यापुढच्या निवडणुकांत कॉँग्रेस आघाडी विरुद्ध भाजप अशी अस्तित्वाची लढाई होणार आहे. घसरलेली गाडी रूळावर...तालुक्यातील राजकीय समीकरणे नेहमीच बदलत राहिली आहेत. स्थानिक निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत नेत्यांची सोयीनुसार भूमिका बदलत राहते. झालेल्या विधानसभेतही हाच प्रकार घडला. कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी न झाल्यामुळे तीनही गट स्वतंत्रपणे लढले. परिणामी शिवाजीराव नाईक यांचा विजय झाला. या निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसची पर्यायाने मानसिंगभाऊ व सत्यजितभाऊ यांची घसरलेली गाडी अजून सावरली नव्हती. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने ती पुन्हा रूळावर आली आहे. आता पुन्हा आघाडी करूनच स्थानिक निवडणुकांमध्ये शिवाजीराव नाईक यांना रोखण्याचा प्रयत्न असेल.