शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

बारावी परीक्षेस यंदा सव्वा लाख विद्यार्थी

By admin | Updated: February 19, 2015 00:21 IST

शनिवारपासून प्रारंभ : भरारी पथकांची राहणार करडी नजर

कोल्हापूर : शासनाच्या नव्या सूचनांनुसार बारावीच्या परीक्षेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाने तयारी पूर्ण केली आहे. यावर्षी १ लाख २३ हजार ७९३ विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. शनिवारी (दि. २१) मराठीच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ होईल. विभागातील १३५ परीक्षा केंद्रे त्यासाठी सज्ज झाली आहेत.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण १३४ परीक्षा केंद्रांवर जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था केली आहे. ‘कॉपीमुक्त’ परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात सात भरारी पथके कार्यरत असणार आहेत. कोल्हापूर शहरात ११ परीक्षा केंद्रे आहेत. विभागातून एकूण ३ हजार २२५ हे खासगी विद्यार्थी (१७ क्रमांकाचा अर्ज भरलेले) आणि ६ हजार ८०१ इतके पुनर्परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. दरम्यान, महाविद्यालयांमध्ये २ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षा बुधवारी संपल्या. पूर्वतयारी, प्रवेशपत्रांच्या वितरणाची महाविद्यालयांमध्ये लगबग सुरू आहे. तीन दिवसांनी पहिला पेपर असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यासात गुंतल्या आहेत. (प्रतिनिधी)परीक्षा केंद्रे अशी...जिल्हापरीक्षा केंद्रे विद्यार्थी (हजारांत)कोल्हापूर५३४२२२६सांगली४०३६१६१सातारा४२३८६०५विद्यार्थी...शाखा विद्यार्थीविज्ञान ४८१९६कला ४३८५०वाणिज्य २४१५३एमसीव्हीसी ६२३४यावर्षी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वाचन, आकलन करण्यासाठी दिली जाणार आहे. परीक्षेबाबत कोल्हापूर विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आदींच्या संघटनांच्या बैठका घेतल्या आहेत. तसेच विजेची आणि पाण्याची व्यवस्था परीक्षा केंद्रांवर केली आहे. - शरद गोसावी, कोल्हापूर विभागीय सचिव,राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ