शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

परीक्षेबाबतच्या निर्णयाकडे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST

यावर्षीच्या सीबीएसई बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यांनी, तर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, ...

यावर्षीच्या सीबीएसई बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यांनी, तर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील एकूण एक लाख २३ हजार ५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा होऊन त्यांचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द केली; पण बारावीची परीक्षा घेण्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत अंतिम निर्णय सरकारने घेतलेला नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी रविवारी या परीक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये महत्त्वाच्या विषयाची परीक्षा घेणे अथवा परीक्षेचे स्वरूप बदलणे असे दोन पर्याय सांगितले आहेत. त्यावर राज्यांनी मंगळवार (दि. २५)पर्यंत सूचना सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पुढील निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले आहे. परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत येत्या दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाकडे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत.