शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

टस्कर हटविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: March 4, 2015 00:42 IST

वाकिघोलमध्ये वनकर्मचारी कार्यरत : पिके वाचविण्यासाठी धडपड

राधानगरी : राधानगरी अभयारण्याच्या वाकिघोल परिसरात आलेल्या टस्कराने घेतलेल्या एका बळीमुळे येथील नागरिकांबरोबर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही झोप उडाली आहे. दिवसभर जंगलात दडणारा हत्ती रात्री गावाजवळच्या शेतात घुसतो. तो मानवी वस्तीत येऊ नये म्हणून वन्यजीवचे कर्मचारी पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस गस्त घालत आहेत. शेतकरीही पिके वाचविण्यासाठी धडपडत आहेत.मागील काही वर्षांत येथील गव्यामुळे होणाऱ्या नुकसानीला येथील शेतकरी वैतागले आहेत. उन्हाळभर दररोज रात्री गव्यांना हुसकावण्याचे कामच शेतकऱ्यांना लागले आहे. गव्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे तसेच माणसेही जखमी झाली आहेत. काहींना प्राणही गमवावा लागला आहे. बिबट्याने पाळीव जनावरे मारण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. या सर्व त्रासांमुळे शेतकऱ्यांमध्ये वनविभागाबद्दल मुळातच असंतोष आहे. हत्तीच्या आगमनामुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे. हत्तीच्या हल्ल्यात बळी पडलेल्या बाळकू आरेकर यांचा मृतदेह ताब्यात घेताना हा असंतोष प्रकट झाला होता. त्याचा उद्रेक होऊ नये यासाठी वन्यजीव विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस धडपडत आहेत. यापूर्वी सात वर्षांपूर्वी आलेल्या टस्करानेही असाच धुमाकूळ घातला होता. तो थेट हसणे, राधानगरीजवळच्या परिसरात आला होता. त्याचा माग काढण्यासाठी गस्त घालताना एका वनमजुराला प्राणाला मुकावे लागले होते. त्यामुळे गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका आहे. तरीही दिवसभर जंगलात असणारा हत्ती रात्री मानवी वस्तीत घुसू नये यासाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. येथील कर्मचाऱ्यांबरोबर चांदोली, कोयना येथील कर्मचारीही यासाठी नेमण्यात आले आहेत.त्यामुळे यासाठी वन्यजीव विभागाने हत्ती हटाव मोहीम हाती घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सिंधुदुर्गात ही मोहीम यशस्वी झाली आहे; पण हा परिसर अभयारण्यात येतो. त्यामुळे काही कायदेशीर अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. हत्तीला विरोध म्हणून नव्हे, तर माणसांच्या जगण्यासाठी तरी याबाबत वन्यजीव विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)वाकिघोल परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात उसाचे पीक उभे आहे. शिवाय केळी, उसाची लावण, खोडवा अशी हिरवे पिके असल्याने हत्तीला ती पर्वणीच आहे. जवळच काळम्मावाडी धरणाचे पाणी असल्याने या परिसरातून हा हत्ती सहजासहजी जाण्याची शक्यता कमी आहे.