शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

ॲन्टिजन किटमधील त्रुटी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST

कोल्हापूर : आरटीपीसीआरच्या तुलनेत रॅपिड ॲन्टिजन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त येत आहे, ॲन्टिजनमध्ये पॉझिटिव्ह असलेल्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह ...

कोल्हापूर : आरटीपीसीआरच्या तुलनेत रॅपिड ॲन्टिजन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त येत आहे, ॲन्टिजनमध्ये पॉझिटिव्ह असलेल्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे या दोन्ही किटमध्ये काय फरक आहे, त्रुटी आहेत का, याची तपासणी करावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केली. यावेळी त्यांनी कोरोनातील डेल्टा प्लस विषाणू व तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही निर्देश दिले.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार उपस्थित होत्या. मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय व गडहिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत. जिल्ह्यात 'कोरोनामुक्त गाव' अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्ण संख्या नियंत्रणात येऊ शकेल.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यात तपासण्या वाढवण्यात आल्या असून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याला रोज ५० हजार लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

--

अधिक लसींसाठी प्रयत्न

यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी लसीचे अधिक डोस मिळावेत यासाठी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच हाफकिन संस्थेच्या कार्यकारी संचालकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. मुंबई-पुण्याप्रमाणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या व बाधितांचे प्रमाण यानुसार लसीचे डोस मिळणे गरजेचे आहे. रोज ५० हजार डोस दिले तरी प्रशासन यंत्रणा लावून लसीकरण पूर्ण करेल, त्यानुसार लसीचा पुरवठा करावा अशी मागणी केली.

--

कोकणमुळे डेल्टा प्लसचा धोका

जिल्ह्यात अद्याप डेल्टा प्लस विषाणू असलेला कोरोना रुग्ण आढळलेला नाही. मात्र कोकणात याचे प्रमाण अधिक आहे. कोकण कोल्हापूरच्या जवळ असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. बंधने नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिक ये-जा करत असतात त्यामुळे कोल्हापूरला याचा धोका अधिक असून अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.

--

फोटे नं २५०६२०२१-कोल-कोरोना बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

--