शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

वृक्षगणनेचा ‘पत्ताच’ नाही

By admin | Updated: July 8, 2016 00:59 IST

उद्यान विभाग : बिल अदा करूनही माहिती देण्यास असमर्थता; ढपल्याची शक्यता

कोल्हापूर : प्रत्येक पाच वर्षांनी शहरातील वृक्षांची गणना करणे कायद्याने बंधनकारक असताना महानगरपालिकेने गेल्या सहा वर्षांत वृक्षगणना केली किंवा नाही याची माहिती उघड करण्यात उद्यान विभागाने असमर्थता दाखविली आहे. एका ठेकेदाराने अर्धवट काम केल्यामुळे दुसऱ्या ठेकेदाराकडून वृक्षांची गणना करून घेण्यात आली; परंतु माहिती उघड न केल्यामुळे काम चोखपणे झाले की नाही, याची शंका येऊ लागली आहे. उद्यान विभागासह अन्य अधिकाऱ्यांनीही वृक्षगणनेबाबत तोंडावर बोट ठेवल्यामुळे या कामातही ढपला पाडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कामात केवळ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने त्याबाबत पर्यावरण कार्यकर्त्यांनाच नाही, तर खुद्द महानगरपालिकेने स्थापन केलेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या सभेतही ही माहिती मागूनसुद्धा सादर केलेली नाही. उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच कायद्याने प्रत्येक पाच वर्षांनी शहरातील वृक्षगणना करणे आवश्यक आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे ही गणना केली असे दाखविले जाते; परंतु प्रत्यक्षात त्याचा तपशील कधीही बाहेर येत नाही. सहा वर्षांपूर्वी वृक्षगणनेचे सुर्वे कन्सल्टंटना काम देण्यात आले. त्यांनी ४० प्रभागांचे काम पूर्ण केल्यानंतर अहवालात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. झुडपांनाही त्यांनी वृक्ष म्हणून गणले गेल्याची बाब पुढे आली. त्यांना अहवाल दुरुस्त करून द्या, असे प्रशासनाने सांगितले. त्यावेळी त्यांनी काम अर्धवट सोडले. एका ठेकेदाराने काम सोडल्यानंतर मुंबईतील दुसऱ्या ठेकेदाराकरवी हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना ३२ प्रभागांतील काम देण्यात आले. त्यांनी काम पूर्ण केले की नाही, अहवाल दिला की नाही, याचा कोणताही तपशील अद्याप दिलेला नाही.शहरात कोणत्या ठिकाणी किती वृक्ष आहेत, त्यांची जात कोणती आहे, उंची किती आहे, घेर किती आहे, धोकादायक वृक्ष कोठे आहेत याचे सर्वेक्षण करण्यात येते. त्याचा अहवाल तयार झाला की त्या आधारावर वृक्षलागवडीचे धोरण निश्चित करण्यात येते; पण असा अहवालच प्रसिद्ध झाला नसल्याने धोरण ठरलेले नाही. ७० ते ८० लाख खर्च शहरात अंदाजे सात लाख वृक्ष असल्याची माहिती सांगण्यात येते. प्रत्येक वृक्षाची गणना करून माहिती संकलित करण्यासाठी पहिल्या ठेकेदारास आठ रुपये ५० पैसे, तर दुसऱ्या ठेकेदारास १० रुपये ४० पैसे दिले असल्याची माहिती पुढे आली आहे. या हिशेबाने या वृक्षगणनेवर ७० ते ८० लाख रुपये खर्च झाले असण्याची शक्यता आहे; पण त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही.