शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बंदी असूनही अवजड वाहनांची वाहतूक

By admin | Updated: March 28, 2017 00:08 IST

शिरढोण-कुरुंदवाड पुलास धोका : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

कुरुंदवाड : शिरढोण-कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंगा नदीवरील पंचगंगा पूल अवजड वाहतुकीसाठी असुरक्षित बनला आहे. त्यामुळे अवजड वाहनास बंदी असल्याचा फलक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आला आहे. या मार्गावरून एस.टी.बस वाहतूक बंद असली तरी वाळूचे ट्रक राजरोसपणे चालू आहेत. त्यामुळे सावित्री पुलाप्रमाणे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. शिरढोण-कुरुंदवाड दरम्यानच्या पंचगंंगा नदीवरील पुलाचे काम मुळातच निकृष्ट आणि नियोजनशून्य झाले आहे. रस्त्यापेक्षा पुलाची उंची खूपच कमी असल्याने पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली जातो. पुलाचे बुरुजाचे काम निकृष्ट झाले असून, अवघ्या पुलाच्या ३० ते ३२ वर्षांच्या वयातच बुरुजाचे दगड ढासळत आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल अशाच दुर्लक्षाने अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे राज्यातील सर्व जुन्या पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये हा पंचगंगा पूल अवजड वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचा अहवाल येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूस पुलावरून अवजड वाहनास बंदी असल्याचा फलक लावण्यात आला आहे. या आदेशामुळे या मार्गावरून एस.टी. वाहतूक बंद केल्याने प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. मात्र, ट्रक, ट्रॅक्टर, प्रमाणबाह्य वाळू भरून वाळूचे ट्रक राजरोसपणे चालू आहेत. त्यामुळे या अवजड वाहनामुळे दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ फलक लावून जबाबदारी संपते काय? असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत असून, या विभागाने पुलाची दुरुस्ती होईपर्यंत पहारेकरी ठेवावा, अशी मागणीही होत आहे. (वार्ताहर)