शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

शाळांमधील परिवहन समित्या कागदावरच

By admin | Updated: August 14, 2015 23:13 IST

महाविद्यालयीन परिसरात वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळेही अपघातात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक

देवाळे : पन्हाळा तालुक्यातील देवाळे, कसबा सातवे, बोरपाडळे, मोहरे, वारणा-कोडोली, सातवे-सावर्डे, आमतेवाडी-शिंदेवाडी, माळवाडी, कोतोली, पन्हाळा, वाघबीळ येथील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संस्थेची मर्यादा लागू असताना त्याचे राजरोस उल्लंघन होत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सुसाट वेगाने धावणारी वाहने विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालयांच्या स्तरावर परिवहन समित्या स्थापन करण्याचा आदेश मात्र कागदावरच आहे.पालकांना भाडे परवडत नसल्याने खर्चाशी मेळ घालण्याच्या हेतूने वाहनधारक विद्यार्थ्यांना वाहनामध्ये अक्षरशोंबत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा वाहनांचे अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. पालक खर्च वाचविण्यासाठी पाल्याचा जीव धोक्यात घालत आहेत. तसेच महाविद्यालयीन परिसरात वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळेही अपघातात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक केले आहे. शहर, ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग आणि नगरपालिका क्षेत्रातील शिक्षक मंडळावर असते. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर विद्यार्थ्यांच्या संख्येचे बंधन घालून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, विद्यार्थी वाहतूक रिक्षा चालकांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांना विविध योजनांचे लाभ मिळतील अशी तरतूद करावी, अशीही मागणी पालकवर्गातून होत आहे. (वार्ताहर)