शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शाळांमधील परिवहन समित्या कागदावरच

By admin | Updated: August 14, 2015 23:13 IST

महाविद्यालयीन परिसरात वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळेही अपघातात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक

देवाळे : पन्हाळा तालुक्यातील देवाळे, कसबा सातवे, बोरपाडळे, मोहरे, वारणा-कोडोली, सातवे-सावर्डे, आमतेवाडी-शिंदेवाडी, माळवाडी, कोतोली, पन्हाळा, वाघबीळ येथील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर संस्थेची मर्यादा लागू असताना त्याचे राजरोस उल्लंघन होत आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सुसाट वेगाने धावणारी वाहने विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा, महाविद्यालयांच्या स्तरावर परिवहन समित्या स्थापन करण्याचा आदेश मात्र कागदावरच आहे.पालकांना भाडे परवडत नसल्याने खर्चाशी मेळ घालण्याच्या हेतूने वाहनधारक विद्यार्थ्यांना वाहनामध्ये अक्षरशोंबत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा वाहनांचे अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. पालक खर्च वाचविण्यासाठी पाल्याचा जीव धोक्यात घालत आहेत. तसेच महाविद्यालयीन परिसरात वेगाने वाहन चालविण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. यामुळेही अपघातात वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक केले आहे. शहर, ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग आणि नगरपालिका क्षेत्रातील शिक्षक मंडळावर असते. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर विद्यार्थ्यांच्या संख्येचे बंधन घालून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, विद्यार्थी वाहतूक रिक्षा चालकांचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांना विविध योजनांचे लाभ मिळतील अशी तरतूद करावी, अशीही मागणी पालकवर्गातून होत आहे. (वार्ताहर)