शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

कारवाईच्या भीतीने व्यापारी नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

कोल्हापूर : कोरोनासंबंधीचे निर्बंध झुगारुन दुकाने सुरु केल्यास प्रशासनाकडून कारवाई होईल या भीतीने शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु करण्याचा आपला ...

कोल्हापूर : कोरोनासंबंधीचे निर्बंध झुगारुन दुकाने सुरु केल्यास प्रशासनाकडून कारवाई होईल या भीतीने शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु करण्याचा आपला निर्धार सोडून दिला. त्यापेक्षा मागील दाराने व्यवसाय सुरु केला तर कारवाई टळेल आणि आपला व्यवसाय देखील होईल अशी सामंजस्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते.

कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग गेल्या एक महिन्यापासून कायम असून रोज सरासरी १५०० ते २००० पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे पॉझिटिव्हीचा दर कमी येत असल्याचे दिसत असले तरी परिस्थिती गंभीरच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील निर्बंध उठविण्याच्या मन:स्थितीत नाही. तरीही मागच्या आठवड्यात व्यापारी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी यांनी दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला होता.

त्यामुळे पाच दिवस प्रायोगिक तत्त्वावर सरसकट सर्वच दुकाने सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत उघडण्यास परवानगी दिली. परंतु या पाच दिवसात रुग्णसंख्या काही कमी होताना दिसली नाही. त्यामुळे सोमवारपासून प्रशासनाने पुन्हा निर्बंध घातले. काही व्यापारी दुकाने सुरु करा असा आग्रह धरत होते; परंतु बहुतांशी व्यापारी कारवाई होण्यापेक्षा आणखी काही दिवस प्रतीक्षा केलेली बरी म्हणून आपले व्यवसाय, दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

मात्र तरीही काही ठिकाणी बंद दाराआडून किंवा मागील दारातून व्यवसाय सुरु ठेवले आहेत. त्याकडे जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाचेही थोडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येते.

फोटो क्रमांक - १३०७२०२१-कोल-बाजारपेठ

ओळ - कोल्हापूर शहरातील विविध रस्त्यावर नागरिकांची गर्दी झालेले पाहायला मिळते. कोरोनाचे संकट झुगारुन मंगळवारीसुद्धा गर्दी कायम होती.