शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

शहर पूर्वपदाकडे, वाहनांची वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेला लॉकडाऊन काही प्रमाणात सरकारने शिथिल केल्याने दुसऱ्यादिवशी मंगळवारी शहर पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेला लॉकडाऊन काही प्रमाणात सरकारने शिथिल केल्याने दुसऱ्यादिवशी मंगळवारी शहर पुन्हा पूर्वपदावर येत राहिले. शहराचे अर्थचक्र फिरण्यास सुरुवात झाली. बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. वाहनांची वर्दळ वाढली. यामुळे शहरातील प्रमुख चौक, रस्ते गजबजलेले राहिले.

लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि वस्तू विक्रीची दुकाने सकाळी ११ ऐवजी दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा मिळाली. पावसाळा तोंडावर आला आहे. यामुळे पेरणीसाठी विविध प्रकारचे बियाणे आणि पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोट, ताडपत्री असे साहित्य खरेदीसाठी लगबग दिसत होती. दुकानदारांनीही सोशल डिस्टन्स ठेवून साहित्य देण्याचे नियोजन केले आहे.

येथील लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी भाजीपाला, फळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. लक्ष्मीपुरीतील धान्य, मिरची बाजारात पगारदार मंडळी पावसाळ्यासाठीचे धान्य खरेदी करताना दिसत होती.

चौकट

बस स्थानकातही...

एसटी महामंडळाने पन्नास टक्के प्रवासी क्षमतेसह बससेवा सुरू केली आहे. शहरांतर्गत विविध मार्गावर केएमटीही धावत आहेत. यामुळे दोन महिन्यांपासून थांबलेली बसची चाके धावू लागली आहेत. परिणामी बसस्थानकांत प्रवाशांची वर्दळ वाढल्याचे दिसत होते. सध्या प्रमुख मार्गावरीलच बससेवा सुरू असली तरी, प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्सही सुरू झाल्या आहेत.

खेळ आणि मॉर्निंग वॉक

सकाळच्या टप्प्यात मैदाने सुरू झाली आहेत. यावर पहाटे मॉर्निंग वॉकर्स मोठ्या संख्येने व्यायामासाठी आले होते. काही मैदानात खेळही सुरू होते. शिवाजी विद्‌यापीठ रस्ता, रंकाळा परिसरात सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. सलून, ब्युटीपार्लरच्या दुकानांतही वर्दळ वाढली होती.

शासकीय कार्यालयातही लोक

जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, करवीर तहसील, पंचायत समिती, महापालिकेतही विविध कामांसाठी अभ्यागत आले होते. जि. प.मध्ये सदस्य आणि त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आल्याने परिसर गर्दीने फुलून गेला होता. राष्ट्रीयीकृत बँकांसमोरची गर्दी कायम राहिली. पेन्शनचे पैसे काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक बँकेत आल्याचे दिसत होते.

रेडिमेड कपड्यांची दुकाने बंदच

नव्या नियमातही रेडिमेड कपडे, चप्पल, इलेक्ट्रॉनिक साहित्य, स्टेशनरीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. परिणामी ही दुकाने बंदच राहिली. परिणामी संबंधीत दुकानदारांमध्ये घालमेल वाढली होती. पावसाळा सुरू होण्याआधीच दुकानातील साहित्य विकण्याचे त्यांचे नियोजन कोलमडून पडले आहे.